शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईला निघालेल्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई व उपविभागातून १,२०० जादा गाड्या जिल्ह्यात आल्या होत्या. मात्र परतीच्या प्रवासासाठी एस.टी. ला मागणी वाढली आहे. आतापर्यंत १,००९ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २६७ ग्रुप बुकिंग गाड्यांचा समावेश आहे.

मुंबर्ई, ठाणे, पालघर येथून कोकणात १,२०० जादा गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीसाठी जादा गाड्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑनलाईन आरक्षण असलेल्या ७४२, ग्रुप बुकिंगच्या २६७ गाड्यांचा समावेश आहे. यावर्षी गौरी गणपतीचा सण चार दिवस साजरा करण्यात आला. पाचव्या दिवशी गौरीसह गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन झाल्यानंतर त्याच दिवसापासून मुंबईकर परतीच्या मार्गाला लागणार असल्याने दि. १४ पासून २१ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंडणगड आगारातून ८२, दापोली १४३, खेड १०३, चिपळूण १७८, गुहागर १३१, देवरूख १२९, रत्नागिरी ९९, लांजा ८४, राजापूर ५९ मिळून एकूण १,००९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून आणखी गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

...................

गतवर्षी १,२०० जादा गाड्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी मुळातच गणेशोत्सवासाठी आलेल्या एस. टी.ची संख्या अधिक आहे. त्यामुळे परतीच्या गाड्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जात आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत जादा गाड्यांना मागणी असून, या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी