शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबईला निघालेल्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई व उपविभागातून १,२०० जादा गाड्या जिल्ह्यात आल्या होत्या. मात्र परतीच्या प्रवासासाठी एस.टी. ला मागणी वाढली आहे. आतापर्यंत १,००९ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २६७ ग्रुप बुकिंग गाड्यांचा समावेश आहे.

मुंबर्ई, ठाणे, पालघर येथून कोकणात १,२०० जादा गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीसाठी जादा गाड्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑनलाईन आरक्षण असलेल्या ७४२, ग्रुप बुकिंगच्या २६७ गाड्यांचा समावेश आहे. यावर्षी गौरी गणपतीचा सण चार दिवस साजरा करण्यात आला. पाचव्या दिवशी गौरीसह गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन झाल्यानंतर त्याच दिवसापासून मुंबईकर परतीच्या मार्गाला लागणार असल्याने दि. १४ पासून २१ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंडणगड आगारातून ८२, दापोली १४३, खेड १०३, चिपळूण १७८, गुहागर १३१, देवरूख १२९, रत्नागिरी ९९, लांजा ८४, राजापूर ५९ मिळून एकूण १,००९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून आणखी गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

...................

गतवर्षी १,२०० जादा गाड्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी मुळातच गणेशोत्सवासाठी आलेल्या एस. टी.ची संख्या अधिक आहे. त्यामुळे परतीच्या गाड्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जात आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत जादा गाड्यांना मागणी असून, या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी