शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला निघालेल्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असले तरी घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मुंबई व उपविभागातून १,२०० जादा गाड्या जिल्ह्यात आल्या होत्या. मात्र परतीच्या प्रवासासाठी एस.टी. ला मागणी वाढली आहे. आतापर्यंत १,००९ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २६७ ग्रुप बुकिंग गाड्यांचा समावेश आहे.

मुंबर्ई, ठाणे, पालघर येथून कोकणात १,२०० जादा गाड्यातून २४,८५८ मुंबईकर गावी आले आहेत. मुंबईकरांना परतीसाठी जादा गाड्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामध्ये ऑनलाईन आरक्षण असलेल्या ७४२, ग्रुप बुकिंगच्या २६७ गाड्यांचा समावेश आहे. यावर्षी गौरी गणपतीचा सण चार दिवस साजरा करण्यात आला. पाचव्या दिवशी गौरीसह गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन झाल्यानंतर त्याच दिवसापासून मुंबईकर परतीच्या मार्गाला लागणार असल्याने दि. १४ पासून २१ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मंडणगड आगारातून ८२, दापोली १४३, खेड १०३, चिपळूण १७८, गुहागर १३१, देवरूख १२९, रत्नागिरी ९९, लांजा ८४, राजापूर ५९ मिळून एकूण १,००९ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असून आणखी गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

...................

गतवर्षी १,२०० जादा गाड्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी मुळातच गणेशोत्सवासाठी आलेल्या एस. टी.ची संख्या अधिक आहे. त्यामुळे परतीच्या गाड्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी जादा गाड्यांची उपलब्धता करून दिली जात आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत जादा गाड्यांना मागणी असून, या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी