शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रूग्णांची संख्या वाढली; डॉक्टरांची घटली

By admin | Updated: September 17, 2016 23:56 IST

जिल्हा रुग्णालय : वातावरणातील बदलामुळे आजारांना बळ

रत्नागिरी : सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे साथीच्या आजारांना बळ मिळाले आहे. गेले दोन दिवस जिल्हा शासकीय रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. परंतु, या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर व तज्ज्ञांची संख्या कमी आहे. एका बाजूला रुग्णांचा संख्येत वाढ होतेय तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांची संख्या घटताना दिसत आहे. फिजिशीयन डॉक्टरांचा शोध डोकेदुखी ठरत आहे.हायटेक होण्याचा मार्गावर असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला सध्या अनेक समस्यांनी घेरले असल्याचे दिसत आहे. डॉक्टरांची समस्या, तज्ज्ञ नाही तसेच अन्य अत्यावश्यक सुविधाही बंद असल्याने रुग्णांना रिपोर्ट करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे अत्यंत कमी मनुष्यबळात शासकीय रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. परंतु, याचा त्रास मात्र रुग्णांना होत आहे. त्याबरोबर डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त कामकाज करावे लागत आहे.गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी साथीच्या आजारांना बळ मिळाले आहे. त्यामुळे रुग्णाचा संख्येतही दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाची २०० रुग्णांची क्षमता आहे. मात्र, सध्या याठिकाणी २१२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे काही रुग्णांवर जमिनीवर बेड टाकून उपचार केले जात आहेत. अपुऱ्या डॉक्टर संख्येमुळे रुग्णांचे हाल होत आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३० पदे भरण्यात आली आहेत. परंतु, त्यातील ८ डॉक्टर गैरहजर तर २ निलंबित आहेत. त्यामुळे केवळ २० डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा जाणवत असून, १९ पदे मंजूर असताना तब्बल १४ पदे अद्यापही रिक्त आहेत. निव्वळ ५ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांमागे धावपळ करावी लागत आहे. त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचाही समावेश आहे. (वार्ताहर)अपुऱ्या संख्येतही चांगल्या सेवेचा प्रयत्नजिल्हा शासकीय रुग्णालयात ४० टक्के मनुष्यबळ असतानासुध्दा येथील डॉक्टर व कर्मचारी जोमाने काम करत आहेत आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांकडून त्याबाबत फार मोठ्या तक्रारी आलेल्या नाहीत.