शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

निगेटिव्ह लोक ‘लाखमोलाचे’, पाॅझिटिव्ह असणाऱ्यांपेक्षा सहा पट संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दीड लाख एकूण कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी २०,२७८ लोक कोरोनाबाधित झाल्याने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दीड लाख एकूण कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी २०,२७८ लोक कोरोनाबाधित झाल्याने जिल्हाभरातून चिंता व्यक्त होत असली तरीही आतापर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांच्या सहापट म्हणजे १ लाख २३ हजार जण निगेटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत १३ हजार ६५९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून, ज्या व्यक्ती कोरोनासंबंधित खबरदारी घेत आहेत, त्या व्यक्तीही कोरोनापासून दूर राहण्यात यशस्वी होत आहेत.

गेल्या १८ मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या भरमसाट वाढली होती. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. या काळात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे नागरिकांचे बाहेर फिरणे कमी झाले होते. त्याचबरोबर कोरोनाच्या धसक्याने लोक मास्क, सॅनिटायझर यांचा सातत्याने वापर करत होते. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत कोरोना रुग्णसंख्या वाढली असली तरीही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आरोग्य यंत्रणेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे रुग्णसंख्या लगेचच कमी झाली. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले.

या काळात शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केल्याने अनेक कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. यातून कोरोनाबरोबरच इतर आजार असलेलेही पुढे आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाले. त्यांनतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारीही अगदी ९५ पर्यंत गेली. त्यामुळे आता लवकरच जिल्हा कोरोनामुक्तीकडे जाईल, असा दिलासा वाटत होता. मात्र, त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी कोरोनाविषयक आवश्यक त्या खबरदारीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा जानेवारी - फेब्रुवारीपासून संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा मोठा दिसत असल्यामुळे हजारो जणांच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेल्याकडे तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येकडे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यात आता कोरोना चाचण्यांची संख्या दररोज १५०० पेक्षा अधिक होत आहेत. जिल्हा रुग्णालयाची कोरोना प्रयोगशाळा २४ तास सुरू आहे. पाॅझिटिव्ह येणाऱ्यांपेक्षा निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेणारे त्यापासून मुक्त राहत आहेत. तसेच बरे होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे, या बाबी जिल्ह्याला दिलासा देणाऱ्या आहेत.

एकाच दिवसांत ४७२ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्हा रुग्णालयाच्या मंगळवारच्या अहवालानुसार, जिल्ह्यात दिवसभरात ६६२ रुग्ण पाॅझिटिव्ह आले तर ११ जणांचा मृत्यू झाला. मात्र, या दिवसभरात ४९७ लोक कोरोनामुक्त झाले, तर १११३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत आवश्यक ती खबरदारी घेतल्याने तब्बल १ लाख २३ हजार ३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण ८६ टक्के

निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८६ टक्के असून, १४ टक्के बाधित होत आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या ६८ टक्के, तर मृत्यूचा दर २.९८ टक्के इतका आहे.