शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

निगेटिव्ह लोक ‘लाखमोलाचे’, पाॅझिटिव्ह असणाऱ्यांपेक्षा सहा पट संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दीड लाख एकूण कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी २०,२७८ लोक कोरोनाबाधित झाल्याने ...

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दीड लाख एकूण कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी २०,२७८ लोक कोरोनाबाधित झाल्याने जिल्हाभरातून चिंता व्यक्त होत असली तरीही आतापर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांच्या सहापट म्हणजे १ लाख २३ हजार जण निगेटिव्ह आले आहेत. तसेच आतापर्यंत १३ हजार ६५९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून, ज्या व्यक्ती कोरोनासंबंधित खबरदारी घेत आहेत, त्या व्यक्तीही कोरोनापासून दूर राहण्यात यशस्वी होत आहेत.

गेल्या १८ मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या भरमसाट वाढली होती. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. या काळात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे नागरिकांचे बाहेर फिरणे कमी झाले होते. त्याचबरोबर कोरोनाच्या धसक्याने लोक मास्क, सॅनिटायझर यांचा सातत्याने वापर करत होते. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत कोरोना रुग्णसंख्या वाढली असली तरीही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आरोग्य यंत्रणेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे रुग्णसंख्या लगेचच कमी झाली. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले.

या काळात शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केल्याने अनेक कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. यातून कोरोनाबरोबरच इतर आजार असलेलेही पुढे आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाले. त्यांनतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारीही अगदी ९५ पर्यंत गेली. त्यामुळे आता लवकरच जिल्हा कोरोनामुक्तीकडे जाईल, असा दिलासा वाटत होता. मात्र, त्यानंतर लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी कोरोनाविषयक आवश्यक त्या खबरदारीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा जानेवारी - फेब्रुवारीपासून संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा मोठा दिसत असल्यामुळे हजारो जणांच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आलेल्याकडे तसेच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येकडे दुर्लक्ष होत आहे.

जिल्ह्यात आता कोरोना चाचण्यांची संख्या दररोज १५०० पेक्षा अधिक होत आहेत. जिल्हा रुग्णालयाची कोरोना प्रयोगशाळा २४ तास सुरू आहे. पाॅझिटिव्ह येणाऱ्यांपेक्षा निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेणारे त्यापासून मुक्त राहत आहेत. तसेच बरे होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे, या बाबी जिल्ह्याला दिलासा देणाऱ्या आहेत.

एकाच दिवसांत ४७२ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्हा रुग्णालयाच्या मंगळवारच्या अहवालानुसार, जिल्ह्यात दिवसभरात ६६२ रुग्ण पाॅझिटिव्ह आले तर ११ जणांचा मृत्यू झाला. मात्र, या दिवसभरात ४९७ लोक कोरोनामुक्त झाले, तर १११३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत आवश्यक ती खबरदारी घेतल्याने तब्बल १ लाख २३ हजार ३८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

निगेटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण ८६ टक्के

निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८६ टक्के असून, १४ टक्के बाधित होत आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या ६८ टक्के, तर मृत्यूचा दर २.९८ टक्के इतका आहे.