शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महिलांची संख्या अजून अल्पच

By admin | Updated: November 26, 2014 00:01 IST

अन्य क्षेत्रात आघाडीवर : गाव विकासासाठी सहभाग महत्त्वाचा

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -गावाची वाटचाल शांततेकडून समृध्दीकडे व्हावी, या उदात्त हेतूने शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. जेणेकरून गावातील तंटे गावपातळीवरच मिटतील. आज बहुतांश क्षेत्रामध्ये महिलांनी स्वत:चे वर्चस्व सिध्द केले आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना महिला दिसून येत आहेत. परंतु तंटामुक्त गाव मोहिमेत भगिनींचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील तंटामुक्त समिती अध्यक्षपदाच्या निवडीवर नजर टाकल्यास ८० टक्के पुरूष, तर अवघे २० टक्के प्रमाण महिलांचे दिसून येते. १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाली. आता या मोहिमेने व्यापक स्वरूप धारण केले आहे. गावातील तंटे सोडविणे एवढेच या मोहिमेचे उद्दिष्ट राहिलेले नाही. जिल्ह्यातील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढ्याच महिलांना संधी मिळाली आहे. स्त्री - पुरूष समानतेच्या गोष्टी केल्या जात असताना पुरूषप्रधान संस्कृतीने तंटामुक्त समितीत आपले वर्चस्व अजूनही कायम ठेवले आहे. व्यसनमुक्ती, सहकारी पतसंस्था, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय उत्सव, मिरवणुका पार पाडणे, यामध्ये पुरूषांबरोबर महिलांचा सहभाग असतो. तंटामुक्त समितीमध्ये ५० टक्के महिलांना सहभागी करून घेतले, तर ही मोहीम यशस्वी होण्यास नक्की हातभार लागेल.कुटुंबात होणारी भांडणे, सासू -सुनेचे, नवरा - बायकोचे व महिलांची भांडणे नित्याची आहेत. परंतु संबंधित महिलांच्या व्यथा समजून घेऊन त्या सोडविण्यात महिला यशस्वीरित्या ठरू शकतात. या मोहिमेत गावातील महिला मंडळे, बचत गट, डॉक्टर, वकील, शिक्षिका, अंगणवाडीसेविका, ग्रामसेविकांना समाविष्ट करून घेण्याची तरतूद आहे. परंतु नामधारी महिलांना सहभागी करून घेत अधिकची वर्णी पुरूषवर्गाची असते. त्याऐवजी तंटामुक्त समितीत ५० टक्के पुरूषांबरोबर ५० टक्के महिलांना सहभागी करून घेतले तर तंटे सोडवून गाव शांततेकडे वाटचाल करील. सध्या तंटामुक्त समित्यांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये किंबहुना अशा समितीवर काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरू शकेल. मात्र त्यासाठी महिलांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे.