शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सक्रिय रुग्णांची संख्या घटली, ६३१ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. बुधवारी दिवसभरात ६३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ६६,४९९ ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. बुधवारी दिवसभरात ६३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ६६,४९९ रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात २८२ बाधित रुग्ण सापडले असून, आता रुग्णसंख्या ७०,७९३ झाली आहे. जिल्ह्यात १३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, कोरोना बळींची संख्या २०३३ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले असले, तरी मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याखेरीज चिपळुणात ३ रुग्णांचा, तर मंडणगड, दापोली, गुहागर आणि राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्यूचा दर २.८७ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, ते प्रमाण ९३.९३ टक्के आहे. एकूण मृतांपैकी पन्नाशी व पन्नाशीपेक्षा जास्त वयोगटातील १,७०४, तर इतर आजारपण असलेले ७४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात ७,४३३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २८२ रुग्ण सापडले आहेत. मंडणगड तालुक्यात दिवसभरात एकही रुग्ण सापडला नाही. दापोली तालुक्यात १९, खेडमध्ये १६, गुहागरात २३, चिपळुणात ४५, संगमेश्वरात २९, रत्नागिरीत ८७, लांजात ३१ आणि राजापुरात ३२ रुग्ण सापडले. सध्या १,४७५ रुग्ण लक्षणे नसलेले आणि ५२४ रुग्ण लक्षणे असलेले आहेत.