शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

आता नागरिकांचे हेलपाटे वाचणार

By admin | Updated: November 28, 2014 00:09 IST

आठ दिवसांत ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू

रत्नागिरी : पोलीस विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांचा वेळ वाचावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारील नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी येत्या आठ दिवसांत ‘नागरी सुविधा केंद्र’ सुरू केले जाणार आहे. याठिकाणी नागरिकांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्यानंतर त्याचा निपटारा किती दिवसात होणार, हे त्याचवेळी अर्जदारास कळणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या नागरी सुविधा केंद्रात पासपोर्ट पडताळणी, विद्यार्थीसंबंधित कागदपत्रांची पडताळणी, पोलीस क्लियरन्स, हॉटेलला व पेट्रोलपंपाना लागणारे नाहरकत दाखले, सायबर कॅफे परवाना या गोष्टी नागरिकांना ठराविक मुदतीत मिळाल्या पाहिजेत, याची दक्षता घेतली जाणार आहेत. या कामांसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्र लागणार आहेत, हे पहिल्यांदाच सांगितले जाणार आहे. सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केल्याची तारीख विशेष रजिस्टरमध्ये दाखल होणारच, परंतु त्याचवेळी हे काम पूर्ण होऊन कोणत्या दिवशी मिळेल, हेसुध्दा त्याचवेळी संबंधित अर्जदाराला कळणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा दिनांक व पूर्तता दिनांक अशा स्वतंत्र रजिस्टरमधील नोंदीवरून पूर्तता दिवसाच्या चार दिवस आधी या कामांचा पाठपुरावा घेतला जाणार आहे, असे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले. पोलिसांच्या कामांसाठी १०९३ नंबरने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी, रखडलेल्या कामांबाबत तातडीने दखल घेणे, सोडवणूक करणे शक्य होणार आहे. रत्नागिरीप्रमाणे पोलिसांसाठी कर्मचाऱ्यांसाठी चिपळुुणात ग्राहक भांडार सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात पती-पत्नीमधील वाद-विवादाचे प्रमाण अधिक असून, त्याबाबत पोलीस दक्षता विभागाकडून चांगले काम सुरू आहे. रत्नागिरी, राजापूरसह आता खेडमध्येही महिला बालकल्याण केंद्र सुरू होत आहे, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)