शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आता आमदारही घेणार गाव दत्तक

By admin | Updated: September 7, 2016 23:53 IST

संसद आदर्श ग्राम योजना : उदय सामंत ओरी, कोंड्येचा विकास करणार

शोभना कांबळे --रत्नागिरी --संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदारांनंतर आता विधानसभेचे आमदारही गाव दत्तक घेऊन त्या गावांचा विकास करणार आहेत. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे ओरी (ता. रत्नागिरी) आणि कोंड्ये (ता. संगमेश्वर) अशी दोन गावे दत्तक घेणार असून, दापोलीचे आमदार संजय कदम हे तालुक्यातील हर्णे गाव दत्तक घेणार आहेत.आता आमदारांनीही आपापल्या विधानसभा मतदार संघातील गाव निवडून ते विकासासाठी दत्तक घ्यावे, असे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार रत्नागिरी - संगमेश्वर मतदार संघाचे आमदार उदय सामंत यांनी ओरी (ता. रत्नागिरी) आणि कोंड्ये (ता. संगमेश्वर) ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. तर दापोलीचे आमदार संजय कदम यांनी हर्णे (ता. दापोली) हे गाव दत्तक घेतले आहे. राजापूर - लांजाचे आमदार राजन साळवी, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी अजून दत्तक गावे निवडली नसल्याने हे तीन आमदार कोणती गावे निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गावे दत्तक घेतल्यानंतर या गावांच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे सुचविली जाणार असून, आमदार निधीच्या माध्यमातून ही गावे विकसीत केली जाणार आहेत. त्यामुळे आता अशा गावांचा विकास दृष्टीक्षेपात आला आहे. उर्वरित आमदारांनीही दुर्गम भागातील गावे निवडून त्यांचा विकास केला तर खऱ्याअर्थाने ही खेडी स्वयंपूर्ण होतील व त्या गावांमध्ये विकासात्मक कामेही होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावांचा विकास व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संसद आदर्श ग्राम योजना राबविली जात आहे. याअंतर्गत खासदारांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात गावे दत्तक घेतली आहेत. या दत्तक गावांचा विकास खासदारांच्या निधीतून करण्यात येणार आहे. खासदारांनी दत्तक घेतलेली गावेपहिल्या टप्प्यातील गावेअमर साबळे : आंबडव (ता. मंडणगड)गजानन कीर्तीकर : आसूद (ता. दापोली)हुसेन दलवाई : रामपूर (ता. चिपळूण)पियुष गोयल : गोळवली (ता. संगमेश्वर)दुसऱ्या टप्प्यातील गावेअनंत गीते : पालशेत (ता. गुहागर)विनायक राऊत : बुरंबाड (ता. संगमेश्वर)गजानन कीर्तीकर : जालगाव (ता. दापोली)