शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आता मत प्रवाहाचा महापूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST

कोकण परिसरात पावसामुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या गंभीर घटना आणि विविध ठिकाणी आलेला महापूर या विषयावर तज्ज्ञांची विविध मते ...

कोकण परिसरात पावसामुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या गंभीर घटना आणि विविध ठिकाणी आलेला महापूर या विषयावर तज्ज्ञांची विविध मते समोर येत आहेत. कोणी सांगत आहे की, अजून धरणे बांधा, कोणी सांगत आहे नदीला भिंती बांधू नयेत, कोणी सांगत आहे की पाणी दुसरीकडे वळवा, असे विविध मत प्रवाह नित्य समोर येत आहेत. यामुळे सामान्य नागरिक संभ्रमित होत आहेत. मुळात या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संशोधनाची गरज आहे. केवळ वरवरचे अंदाज न बांधता सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील नदीच्या उगमापासून ते मुखापर्यंतचा मागील ५० वर्षांचा अभ्यास करून तज्ज्ञांनी एकत्र येऊन मत मांडायला हवे. तरच या परिस्थितीतून मार्ग काढणे सोयीचे होईल. त्यासाठी नदीच्या पात्राची रुंदी व खोली, तिचे पाणलोट क्षेत्र, यास येऊन मिळणारे नाले, पऱ्या ओहोळ, या क्षेत्रात होणारा पाऊस, नदीची जलवाहन क्षमता, जलवहनाचा वेग व आज निसर्गावर झालेले मानवी अतिक्रमण, नासधूस, नदी पत्रातील गाळ व यामुळे संपूर्ण नदीवर झालेले भौगोलिक परिणाम आणि इतके पाणी असूनही कमी होत चाललेला भूगर्भातील जलसाठा याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम अत्यावश्यक ३३ टक्के आरक्षित वनजमिनी, मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, जमिनीची धूप, भूस्खलन, डोंगराला पडणाऱ्या भेगा यामुळे नदीच्या पात्रात, प्रवाहात व खोलीवर झालेले फार मोठे दुष्परिणाम, विकासाच्या नावाखाली नदीकिनारी आवश्यक हरितपट्ट्याचे संकुचितीकरण व नष्ट करण्याचा प्रयत्न, नदीवरील अतिक्रमण या सर्वांचा सखोल विचार होऊन एकत्रित मत प्रदर्शित होणे गरजेचे आहे, असे वाटते. कारण २००५ च्या पुरात आम्ही जागे झालो होतो. आता तब्बल १६ वर्षांनी जागे झालेलो आहोत. गेली अनेक वर्षे या विषयावर बोंब मारणारे लोक आताच्या परिस्थितीपुढे तर आणखी हतबल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड व राजापूर या शहरांच्या बाबतीत दरवर्षीच ही हतबलता पाहायला मिळत आहे. पूर ओसरताच येथेही अनेक मतप्रवाह पुन्हा एकदा नव्याने पुढे येऊ लागले आहेत. प्रत्येक बांधकाम व इमारतीसाठी भरावाऐवजी स्टील पार्किंग हवी, ग्रामीण व शहरी भागात डोंगरापासून किती अंतरावर वस्ती असावी याचीही नियमावली तयार करण्याचा विचार केला जात आहे. परंतु असे नियम बनवताना त्यांची अंमलबजावणी कितपत होईल याचाही विचार करावा लागणार आहे. कारण कोकणातील बहुतांशी बाजारपेठा पूररेषेतच वसल्या आहेत आणि त्याला लागूनच डोंगर उतार आहे. त्यामुळे या अशा नियमावलीची अंमलबजावणी झाली, तर ‘ना तळ्यात ना मळ्यात’ अशी काहीशी परिस्थिती निर्माण होणार आहे. २०१९ पासून तर या भागात सतत भूस्खलनच्या घटना घडत आहेत. कधी डोंगरकडेला असलेल्या वस्तीवर, तर कधी पश्चिम घाटातील कोकण भागाला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडत आहे. यातून आर्थिक हानी होत असतानाच आता जीवित हानीलाही सामोरे जावे लागत आहे. खेड तालुक्यातील पोसरे व चिपळूण तालुक्यातील पेढे येथील घटना ताजी आहे. याशिवाय चिपळुणात दसपटी विभागातील तिवरे, आकले, तिवडी तसेच दुर्गवाडी-मंजुत्री मार्गावर भूस्खलनाच्या ज्या पद्धतीने घटना घडल्या आहेत, त्या पाहिल्यानंतर त्यातील खऱ्या अर्थाने गंभीरता लक्षात येते. तेव्हा या संपूर्ण परिस्थिती व घटनांचा अंदाज घेण्यासाठी नुसता मत प्रवाह कामी येणार नाही. त्यासाठी व्यापक स्वरूपाच्या संशोधनात्मक प्रकल्प अहवालाची गरज आहे. त्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा. परंतु त्याआधी कोकणातील राजकीय नेत्यांची भूमिका व मानसिकताही तितकीच महत्त्वाची आहे.

- संदीप बांद्रे