शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

आता पिकांचे होणार सर्वेक्षण

By admin | Updated: September 6, 2016 23:42 IST

एकात्मिक कीड व्यवस्थापन : सततच्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. यावर्षी सुरूवातीपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. सततच्या पावसामुळे कीडरोग तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षी अल्प पर्जन्यमानामुळे भात पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना सावध करून उपाय-योजनेसाठी कृषी विभागाने एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे.गरवे, निमगरवे तसेच संकरीत भात पिकाची लागवड करण्यात येते. गरवे भात फुलोऱ्यास आले आहे. निमगरवे भात फुलोऱ्यास येण्याच्या अवस्थेत आहे. संकरीत भात तयार होण्यास अद्याप अवकाश आहे. गरव्या पिकासाठी पावसाचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे. पहाटेच्या वेळेचा तर पाऊस पिकास नुकसानग्रस्त ठरू शकतो. शिवाय उन्हाचा कडाका वाढला तरी पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ढगाळ वातावरणात पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे यांसारख्या कीडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. एकूणच बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम व त्यावेळी शेतकऱ्यांनी तत्काळ कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करावी, याबाबत माहिती कृषी पर्यवेक्षक, निरीक्षक माहिती देणार आहेत. भातपिकाच्या पाहणीबरोबर भातकापणीचा आढावा घेण्यात येणार आहे. मोबाईल अ‍ॅप कृषी विभागाने सुरू केले असून, कापणी व पिकाचा आढावा, माहिती मोबाईलव्दारे संकलित केली जाणार आहे. कीडरोग व्यवस्थापनाबद्दल विद्यापीठातील तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. सद्यस्थितीत पीक परिस्थिती उत्तम असल्याची माहिती कृषी अधीक्षक जगताप यांनी दिली. मात्र, अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पाऊस असतो. अनेकवेळा कापणीच्या हंगामात पावसाचे प्रमाण वाढते व शेतकऱ्यांचे नुकसान होते. कापलेले भातपीक पाण्यात राहिल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे.जिल्ह्यात किरकोळ कीड व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून उपाययोजना करण्यासाठी भाग पाडल्याने कीडरोग आटोक्यात आहे. भविष्यात पीक वाचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जगताप : आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजारपेक्षा जास्त मिमी पाऊसरत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्र भातपीक, तर २१ हजार हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३६ पर्यवेक्षक, २५० निरीक्षक भातशेतीचे सर्वेक्षण करणार आहेत.