शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

आता पिकांचे होणार सर्वेक्षण

By admin | Updated: September 6, 2016 23:42 IST

एकात्मिक कीड व्यवस्थापन : सततच्या पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. यावर्षी सुरूवातीपासून पर्जन्यमान चांगले राहिले आहे. सततच्या पावसामुळे कीडरोग तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गतवर्षी अल्प पर्जन्यमानामुळे भात पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना सावध करून उपाय-योजनेसाठी कृषी विभागाने एकात्मिक कीड व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे.गरवे, निमगरवे तसेच संकरीत भात पिकाची लागवड करण्यात येते. गरवे भात फुलोऱ्यास आले आहे. निमगरवे भात फुलोऱ्यास येण्याच्या अवस्थेत आहे. संकरीत भात तयार होण्यास अद्याप अवकाश आहे. गरव्या पिकासाठी पावसाचे प्रमाण कमी असणे गरजेचे आहे. पहाटेच्या वेळेचा तर पाऊस पिकास नुकसानग्रस्त ठरू शकतो. शिवाय उन्हाचा कडाका वाढला तरी पिकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ढगाळ वातावरणात पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे यांसारख्या कीडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. एकूणच बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम व त्यावेळी शेतकऱ्यांनी तत्काळ कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करावी, याबाबत माहिती कृषी पर्यवेक्षक, निरीक्षक माहिती देणार आहेत. भातपिकाच्या पाहणीबरोबर भातकापणीचा आढावा घेण्यात येणार आहे. मोबाईल अ‍ॅप कृषी विभागाने सुरू केले असून, कापणी व पिकाचा आढावा, माहिती मोबाईलव्दारे संकलित केली जाणार आहे. कीडरोग व्यवस्थापनाबद्दल विद्यापीठातील तज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. सद्यस्थितीत पीक परिस्थिती उत्तम असल्याची माहिती कृषी अधीक्षक जगताप यांनी दिली. मात्र, अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पाऊस असतो. अनेकवेळा कापणीच्या हंगामात पावसाचे प्रमाण वाढते व शेतकऱ्यांचे नुकसान होते. कापलेले भातपीक पाण्यात राहिल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे.जिल्ह्यात किरकोळ कीड व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून उपाययोजना करण्यासाठी भाग पाडल्याने कीडरोग आटोक्यात आहे. भविष्यात पीक वाचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)जगताप : आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजारपेक्षा जास्त मिमी पाऊसरत्नागिरी जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्र भातपीक, तर २१ हजार हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३० हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३६ पर्यवेक्षक, २५० निरीक्षक भातशेतीचे सर्वेक्षण करणार आहेत.