शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रायपाटण पुलासाठी आता आक्रमक पवित्रा

By admin | Updated: March 31, 2016 00:03 IST

पूलनिर्माण समिती : चार वाड्यांचा दळवळणाचा प्रश्न

राजापूर : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे लोटली तरी रायपाटण गावातील अर्जुना नदीपलिकडच्या चार वाड्यांकडे जाण्यासाठी दळणवळणाची सुविधा नसल्याने त्या परिसरातील जनतेला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. संपर्कांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अर्जुना नदीवर वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असा पूल बांधावा, अशी मागणी सातत्याने सुरु आहे. आता पूल निर्माण समितीची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे पुलासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याकामी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. चंदुभाई देशपांडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.रायपाटणच्या मध्यावरून अर्जुना नदीचे दोन भाग झाले असून, नदीच्या पलिकडे एकूण पाच वाड्या आहेत. त्यापैकी गांगणवाडीत जाण्यासाठी आता कायमस्वरुपी वाहतुकीचा पूल झाला असून, उर्वरित चार वाड्यांचा दळणवळणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यांना कोणतीच सुविधा नाही. त्या वाड्यांमध्ये बागवाडी, गाडेवाडी, कदमवाडी व बौध्दवाडी यांचा समावेश आहे. या चार वाड्यांची लोकसंख्या सुमारे तेराशे इतकी आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या चारही वाड्यांची होणारी परवड कायम राहिली आहे. एवढ्या कालावधीत ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करुनही शासनाला हा प्रश्न काही सोडवता आलेला नाही. त्यामुळे त्या चार वाड्यांची गैरसोय होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बांधावरुन कसातरी मार्ग निघतो. पण, खरी समस्या पावसाळ्यात उद्भवते. नाही म्हणायला एक फूट ब्रीज त्या वाडीकडे जाण्याकडे असून, तो धोकादायक ठरला आहे. यापूर्वी बांधकाम विभागाने त्या पुलाचा वापर न करण्याबाबत रायपाटण ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे, अशी स्थिती असतानाच त्या चार वाड्यांतील जनतेने दैनंदिन गरजांसाठी काय करायचे? दररोजचा बाजाररहाट, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, शासकीय कामे यासाठी नदीपलिकडेच यावे लागते. ग्रामस्थांना भोगाव्या लागणाऱ्या अनंत अडचणी लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते व येळवण गावचे सुपुत्र प्रा. चंदुभाई देशपांडे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गावचे ग्रामस्थ दादा कोलते यांच्या घरी रायपाटण गावात एक बैठक झाली. त्यावेळी गावातील त्या चार वाड्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. समस्त ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा प्रश्न किती भयानक आहे, याची जाणीव झाली आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर प्रथम सर्वांनी पूल निर्माण कमिटी स्थापन करा, अशी सूचना प्रा. देशपांडे यांनी दिली. त्यानुसार कमिटी स्थापन करण्यात आली. अनाजी पाटणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष महादेव रोडे, सचिव प्रसाद पळसुलेदसाई, खजिनदार महेश गांगण यांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून आबा शेट्ये, विलास शेट्ये, संजय निखार्गे, प्रकाश पाटणकर, रमेश बागवे, विठोबा माटल, विलास कोलते, रवींद्र पाटणकर, सीताराम खाड्ये, गजानन खाड्ये, मनोहर खोचाडे, वसत कदम, सल्लागार म्हणून भिकू कोलते, प्रभाकर देसाई यांची निवड करण्यात आली. यापुढील पुलाबाबतचा पाठपुरावा व त्याबाबतची कामे चंदूभाई देशपांडे यांच्या सूचनेनुसार होणार आहेत. (प्रतिनिधी)जनतेचे हाल : आई-मुलाचे गेले प्राणपक्का रस्ता नसल्याने वेळेवर उपचार झाले नाहीत, यामुळे आई व एका मुलाला प्राण गमवावा लागलेला आहे. शासनाला एवढ्या वर्षांत हा प्रश्न काही सोडवता आलेला नाही. त्यामुळे रायपाटण गावातील नदीपलिकडच्या त्या चार वाड्यांतील जनतेचे हाल होत आहेत.