शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

गोंधळाबाबत प्रशासनाला नोटीस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती ...

रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५९ व ६० (ब) चा वापर करून जिल्हा प्रशासनावर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल, असा इशारा भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.

मंगळवारी ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांना मिस्त्री हायस्कूलमध्ये दुपारी ही लस मिळणार होती. दुसरा डोस असल्याने पूर्वनोंदणी नव्हती. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून केंद्रावर गर्दी केली. उन्हामध्ये नागरिक उभे होते. प्रचंड गोंधळ आणि गर्दीचे वातावरणात होते. २०० डोस उपलब्ध होणार होते, प्रत्यक्षात ४०० पेक्षा अधिक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी गेले. त्यामुळे खूप गोंधळ झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार नागरिकांच्या त्रासाचे कारण बनत आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये कोणताही समन्वय नाही. लसीकरणातील अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेतलेल्या नाहीत. उन्हापासून त्रास होतो म्हणून साधा मंडप घालण्याची व्यवस्थाही प्रशासन करीत नाही, हे दुर्दैव आहे. वारंवार मागणी करून त्यात बदल होत नाही. कारण प्रशासनावर अंकुश ठेवणारी राजकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. पालकमंत्र्यांनी दुर्लक्षित केलेला हा दुर्दैवी जिल्हा आहे. पूर्वनियाेजनाचा अभाव, जबाबदाऱ्यांची अस्पष्ट वाटणी, जनतेच्या अडचणींची दखल न घेता कागदोपत्री काम करण्याची पद्धती या साऱ्यामुळे जनतेला त्रास होत आहे, अशी खंत त्यांनी मांडली आहे.

गावोगावी नेटवर्क नाही, जुन्या लोकांना नोंदणी प्रक्रियेची तांत्रिक माहिती नाही, अशा लोकांना मार्गदर्शन नाही, लसीची नेमकी उपलब्धता किती, याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक नाही. असा सर्व अधांतरी व स्वैर कारभार सुरू आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल. भारतीय जनता पार्टी यासंदर्भात अत्यंत गंभीर असून, जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. आंदोलन करता येत नसले तरी कायद्याची दारे उघडी आहेत. आम्ही तो मार्ग जनतेसाठी अवलंबू, असा इशारा ॲड. पटवर्धन यांनी दिला आहे.