शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळाबाबत प्रशासनाला नोटीस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती ...

रत्नागिरी : लसीकरणाबाबत मंगळवारी रत्नागिरीत झालेला गोंधळ हा ढिसाळ कारभारामुळे झाला आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५९ व ६० (ब) चा वापर करून जिल्हा प्रशासनावर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल, असा इशारा भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिला आहे.

मंगळवारी ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांना मिस्त्री हायस्कूलमध्ये दुपारी ही लस मिळणार होती. दुसरा डोस असल्याने पूर्वनोंदणी नव्हती. त्यामुळे नागरिकांनी सकाळपासून केंद्रावर गर्दी केली. उन्हामध्ये नागरिक उभे होते. प्रचंड गोंधळ आणि गर्दीचे वातावरणात होते. २०० डोस उपलब्ध होणार होते, प्रत्यक्षात ४०० पेक्षा अधिक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी गेले. त्यामुळे खूप गोंधळ झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

प्रशासनाचा ढिसाळ कारभार नागरिकांच्या त्रासाचे कारण बनत आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये कोणताही समन्वय नाही. लसीकरणातील अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेतलेल्या नाहीत. उन्हापासून त्रास होतो म्हणून साधा मंडप घालण्याची व्यवस्थाही प्रशासन करीत नाही, हे दुर्दैव आहे. वारंवार मागणी करून त्यात बदल होत नाही. कारण प्रशासनावर अंकुश ठेवणारी राजकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. पालकमंत्र्यांनी दुर्लक्षित केलेला हा दुर्दैवी जिल्हा आहे. पूर्वनियाेजनाचा अभाव, जबाबदाऱ्यांची अस्पष्ट वाटणी, जनतेच्या अडचणींची दखल न घेता कागदोपत्री काम करण्याची पद्धती या साऱ्यामुळे जनतेला त्रास होत आहे, अशी खंत त्यांनी मांडली आहे.

गावोगावी नेटवर्क नाही, जुन्या लोकांना नोंदणी प्रक्रियेची तांत्रिक माहिती नाही, अशा लोकांना मार्गदर्शन नाही, लसीची नेमकी उपलब्धता किती, याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक नाही. असा सर्व अधांतरी व स्वैर कारभार सुरू आहे. यात तात्काळ सुधारणा झाली नाही, तर कायदेशीर कारवाईसाठी राज्य शासनाकडे नोटीस पाठविली जाईल. भारतीय जनता पार्टी यासंदर्भात अत्यंत गंभीर असून, जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. आंदोलन करता येत नसले तरी कायद्याची दारे उघडी आहेत. आम्ही तो मार्ग जनतेसाठी अवलंबू, असा इशारा ॲड. पटवर्धन यांनी दिला आहे.