शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

राजापूर, दापोलीत ग्रामस्थांना नोटीस

By admin | Updated: July 1, 2016 23:41 IST

डोंगर खचण्याचा धोका : धोपेश्वरातील २३; तर दापोलीतील ८९८ कुटुंबांना धोका

राजापूर : पावसाळी दिवसात लगतचे डोंगर खचून घरावर पडण्याचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धोपेश्वरातील गुरववाडी व खंडेवाडीतील सुमारे २३ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याची नोटीस राजापूरच्या तहसीलदारांनी दिली आहे. यामुळे या भागातील स्थलांतरीत होण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे.पावसाळी दिवसात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांपैकी धोपेश्वर गुरववाडी व खंडेवाडी परिसराला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धोकादायक डोंगर लक्षात घेता ते खालील घरांवर केव्हाही कोसळू शकतात. याबाबत स्वत: तहसीलदारांसह सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, राजापूर यांच्याकडील तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी ही सर्व घरे दरडीला लागून असल्याचे निदर्शनास आल्याने या दोन वाड्यांतील घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या. सुरक्षित जागा कोणती ते मात्र तालुका प्रशासनाने सांगितले नाही. त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबियांपुढील समस्या आणखीनच वाढली आहे.आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षेची संभाव्य ठिकाणे म्हणून शासनाने यापूर्वी त्या परिसरातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालये व अन्य ठिकाणे निश्चित केलेली असायची. पण, समस्त धोपेश्वरवासीयांना अशी कुठलीच सुरक्षित जागा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या कुटुंबियांनी जायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.राजापूर तालुक्यातील वडदहसोळ गावातील हळदीची फांदी, गोपाळवाडी व अन्य ठिकाणीही धोक्याची परिस्थिती आहे. तेथील जनतेलाही स्थलांतरीत होण्याच्या नोटीस राजापूर तहसीलदारांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र, या ग्रामस्थांनी अद्याप त्याठिकाणाहून स्थलांतर केलेले नाही. (प्रतिनिधी)दरडग्रस्त ग्रामस्थांना सूचना : दापोलीतील ग्रामस्थांसाठी सुरक्षित ठिकाणची निश्चितीया प्रश्नी समस्त धोपेश्वरवासीयांनी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडताच आमदार साळवींनी तत्काळ राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याशी संपर्क साधला व माहिती घेतली. प्रथम त्या कुटुंबीयांची व्यवस्था करा, अशी त्यांनी सूचना केली. त्याचवेळी समस्त दरडग्रस्त ग्रामस्थांनाही काळजी घ्या, अशीही सूचना केली. यावेळी रत्नागिरी शिवसेना रिक्षासेनेचे उपाध्यक्ष सुभाष गुरव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. समुद्रकिनारी नोटीस नाहीसंभाव्य धोका असलेल्या गावांमध्ये मुरूड येथील १२५ कुटुंब समुद्रकिनारी वास्तव्यास असली तरी दरड कोसळण्याचा धोका नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. बुरोंडी येथील २५५ कुटुंबांना धोका नसल्याने त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली नाही. पावसाची संततधार सुरू राहिल्यास कुटुंबांनी तातडीने जी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन केले आहे.