शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

राजापूर, दापोलीत ग्रामस्थांना नोटीस

By admin | Updated: July 1, 2016 23:41 IST

डोंगर खचण्याचा धोका : धोपेश्वरातील २३; तर दापोलीतील ८९८ कुटुंबांना धोका

राजापूर : पावसाळी दिवसात लगतचे डोंगर खचून घरावर पडण्याचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धोपेश्वरातील गुरववाडी व खंडेवाडीतील सुमारे २३ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याची नोटीस राजापूरच्या तहसीलदारांनी दिली आहे. यामुळे या भागातील स्थलांतरीत होण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे.पावसाळी दिवसात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांपैकी धोपेश्वर गुरववाडी व खंडेवाडी परिसराला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धोकादायक डोंगर लक्षात घेता ते खालील घरांवर केव्हाही कोसळू शकतात. याबाबत स्वत: तहसीलदारांसह सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, राजापूर यांच्याकडील तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी ही सर्व घरे दरडीला लागून असल्याचे निदर्शनास आल्याने या दोन वाड्यांतील घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या. सुरक्षित जागा कोणती ते मात्र तालुका प्रशासनाने सांगितले नाही. त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबियांपुढील समस्या आणखीनच वाढली आहे.आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षेची संभाव्य ठिकाणे म्हणून शासनाने यापूर्वी त्या परिसरातील शाळा, ग्रामपंचायत कार्यालये व अन्य ठिकाणे निश्चित केलेली असायची. पण, समस्त धोपेश्वरवासीयांना अशी कुठलीच सुरक्षित जागा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या कुटुंबियांनी जायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.राजापूर तालुक्यातील वडदहसोळ गावातील हळदीची फांदी, गोपाळवाडी व अन्य ठिकाणीही धोक्याची परिस्थिती आहे. तेथील जनतेलाही स्थलांतरीत होण्याच्या नोटीस राजापूर तहसीलदारांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र, या ग्रामस्थांनी अद्याप त्याठिकाणाहून स्थलांतर केलेले नाही. (प्रतिनिधी)दरडग्रस्त ग्रामस्थांना सूचना : दापोलीतील ग्रामस्थांसाठी सुरक्षित ठिकाणची निश्चितीया प्रश्नी समस्त धोपेश्वरवासीयांनी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडताच आमदार साळवींनी तत्काळ राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याशी संपर्क साधला व माहिती घेतली. प्रथम त्या कुटुंबीयांची व्यवस्था करा, अशी त्यांनी सूचना केली. त्याचवेळी समस्त दरडग्रस्त ग्रामस्थांनाही काळजी घ्या, अशीही सूचना केली. यावेळी रत्नागिरी शिवसेना रिक्षासेनेचे उपाध्यक्ष सुभाष गुरव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. समुद्रकिनारी नोटीस नाहीसंभाव्य धोका असलेल्या गावांमध्ये मुरूड येथील १२५ कुटुंब समुद्रकिनारी वास्तव्यास असली तरी दरड कोसळण्याचा धोका नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही. बुरोंडी येथील २५५ कुटुंबांना धोका नसल्याने त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली नाही. पावसाची संततधार सुरू राहिल्यास कुटुंबांनी तातडीने जी सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन केले आहे.