शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

एक सामान्य फल उत्पादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

‘उन्हाळ्याच्या सुट्या’ सुरू झाल्या की ओढ लागते ती कोकणात येण्याची. उन्हाळ्याची सुटी आणि कोकण मेवा हे काहीसे अतूट समीकरणच ...

‘उन्हाळ्याच्या सुट्या’ सुरू झाल्या की ओढ लागते ती कोकणात येण्याची. उन्हाळ्याची सुटी आणि कोकण मेवा हे काहीसे अतूट समीकरणच झाले आहे. रत्नागिरीकर येथे आलेल्या प्रत्येकाला तृप्त करतात. ते इथल्या रसाळ आणि गोड फळांनी. एप्रिल-मे महिन्यात रत्नागिरीत जणूकाही सोनेच पिकते असे म्हटले तरीदेखील ते काही अयोग्य ठरणार नाही. आंबा, काजू, फणस, करवंद, अशा प्रत्येकाच्या जिभेला व हृदयाला संतुष्ट करणारा कोकणमेवा मिळतो तो या उन्हाळी सुटीतच. मग या दोन महिन्यांच्या उत्पादनावर वर्षभर टिकतील असे पदार्थ तयार करण्याची मौजही सुरू होते. हा कोकण मेवा म्हणजे कोकणी लोकांचे वैभव आहे. कोकणकर फल उत्पादक वर्षभराची पुंजी कमावतो ते या कालावधीतच. त्यामुळे कोकणकरांसाठी आंबा, काजू व त्यांचा उदरनिर्वाहाचे एक साधनच आहे.

दरवर्षीच आपल्या कष्टाचं फळ म्हणजेच आंबा, काजू उत्पान हे अगदी भरघोस येते. पण यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा, काजू या दोन्हींचे प्रमाण कमी आहे आणि त्यात भर म्हणून की काय दोन दिवस झालेल्या गारपिठीसह अवकाळी पावसामुळे आंबा पीक घेण्यात आले आहे. या आकस्मिक पावसामुळे फळांवर बुरशी येऊन काळे ढग पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच जोरदार पावसातील गारांचा फुटण्यामुळे फळ काळे पडून पिकण्यास अडचण निर्माण होत आहे. या साऱ्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली दिसून येते. पावसाच्या काहीच दिवस अगोदर केलेली फवारणी पूर्णत: वाया गेली आहे. त्यावर इलाज म्हणून आता पुन्हा दोनदा फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्याच्या या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत आंबा, काजूस योग्य ती बाजारपेठही उपलब्ध होत नाही. त्यामुळे जे काही फळ हाती लागले आहे त्याची योग्य त्या भावात विक्री करणे अशक्य होऊन बसले आहे. त्या सर्व परिस्थितीत भडला जातोय तो एक सामान्य फल उत्पादक.

आंबा, काजू ही हंगामी फळे असल्याने वर्षभर मेहनत घेऊन त्याचे पीक येते. ते विशिष्ट कालावधीपुरतेच पण योग्यवेळीच जर त्याची विक्री नाही झाली तर मात्र वर्षभर घेतलेली सारी मेहनत व खर्च हा वाया जातो आणि मग एक निराशाजनक परिस्थिती ओढवते. साºया परिस्थितीचा अंदाज घेऊन फल उत्पादकांवर त्यांचे फळ हे कमी किमतीत पिकावे लागते. म्हणजे त्यांच्या फळाला योग्य तो भाव मिळत नाही. यावर्षी पण कोपलेला निसर्ग व कोरोना यामुळे आंबा व काजूचे गाव हे उतरले आहेत. आंबा फळ हे ३००० प्रति पेटी बाजारात मिळत आहे.

अशी ही कठीण परिस्थिती पाहिली की मग नवउत्पादकदेखील फळ लागवडीकडे न वळण्याचा निर्णय घेताना दिसतात. असे झाले तर कोकणचे वैभव असणारी ही फळे काही दिवसांनी सोन्याचा गावात पिकतांना दिसतील तर काही काळाने नामशेषदेखील होतील. हे सारे थांबवायचे असेल तर सरकारकडून योग्य ती आर्थिक मदत व आपणा सगळ्यांकडून साहाय्य व नवउत्तेजन मिळणे गरजेचे आहे. तरच ही कोकणाकडे असलेली वैभवशाली परंपरा अबाधित राहील.