शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एक सामान्य फल उत्पादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

‘उन्हाळ्याच्या सुट्या’ सुरू झाल्या की ओढ लागते ती कोकणात येण्याची. उन्हाळ्याची सुटी आणि कोकण मेवा हे काहीसे अतूट समीकरणच ...

‘उन्हाळ्याच्या सुट्या’ सुरू झाल्या की ओढ लागते ती कोकणात येण्याची. उन्हाळ्याची सुटी आणि कोकण मेवा हे काहीसे अतूट समीकरणच झाले आहे. रत्नागिरीकर येथे आलेल्या प्रत्येकाला तृप्त करतात. ते इथल्या रसाळ आणि गोड फळांनी. एप्रिल-मे महिन्यात रत्नागिरीत जणूकाही सोनेच पिकते असे म्हटले तरीदेखील ते काही अयोग्य ठरणार नाही. आंबा, काजू, फणस, करवंद, अशा प्रत्येकाच्या जिभेला व हृदयाला संतुष्ट करणारा कोकणमेवा मिळतो तो या उन्हाळी सुटीतच. मग या दोन महिन्यांच्या उत्पादनावर वर्षभर टिकतील असे पदार्थ तयार करण्याची मौजही सुरू होते. हा कोकण मेवा म्हणजे कोकणी लोकांचे वैभव आहे. कोकणकर फल उत्पादक वर्षभराची पुंजी कमावतो ते या कालावधीतच. त्यामुळे कोकणकरांसाठी आंबा, काजू व त्यांचा उदरनिर्वाहाचे एक साधनच आहे.

दरवर्षीच आपल्या कष्टाचं फळ म्हणजेच आंबा, काजू उत्पान हे अगदी भरघोस येते. पण यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा, काजू या दोन्हींचे प्रमाण कमी आहे आणि त्यात भर म्हणून की काय दोन दिवस झालेल्या गारपिठीसह अवकाळी पावसामुळे आंबा पीक घेण्यात आले आहे. या आकस्मिक पावसामुळे फळांवर बुरशी येऊन काळे ढग पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच जोरदार पावसातील गारांचा फुटण्यामुळे फळ काळे पडून पिकण्यास अडचण निर्माण होत आहे. या साऱ्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली दिसून येते. पावसाच्या काहीच दिवस अगोदर केलेली फवारणी पूर्णत: वाया गेली आहे. त्यावर इलाज म्हणून आता पुन्हा दोनदा फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्याच्या या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत आंबा, काजूस योग्य ती बाजारपेठही उपलब्ध होत नाही. त्यामुळे जे काही फळ हाती लागले आहे त्याची योग्य त्या भावात विक्री करणे अशक्य होऊन बसले आहे. त्या सर्व परिस्थितीत भडला जातोय तो एक सामान्य फल उत्पादक.

आंबा, काजू ही हंगामी फळे असल्याने वर्षभर मेहनत घेऊन त्याचे पीक येते. ते विशिष्ट कालावधीपुरतेच पण योग्यवेळीच जर त्याची विक्री नाही झाली तर मात्र वर्षभर घेतलेली सारी मेहनत व खर्च हा वाया जातो आणि मग एक निराशाजनक परिस्थिती ओढवते. साºया परिस्थितीचा अंदाज घेऊन फल उत्पादकांवर त्यांचे फळ हे कमी किमतीत पिकावे लागते. म्हणजे त्यांच्या फळाला योग्य तो भाव मिळत नाही. यावर्षी पण कोपलेला निसर्ग व कोरोना यामुळे आंबा व काजूचे गाव हे उतरले आहेत. आंबा फळ हे ३००० प्रति पेटी बाजारात मिळत आहे.

अशी ही कठीण परिस्थिती पाहिली की मग नवउत्पादकदेखील फळ लागवडीकडे न वळण्याचा निर्णय घेताना दिसतात. असे झाले तर कोकणचे वैभव असणारी ही फळे काही दिवसांनी सोन्याचा गावात पिकतांना दिसतील तर काही काळाने नामशेषदेखील होतील. हे सारे थांबवायचे असेल तर सरकारकडून योग्य ती आर्थिक मदत व आपणा सगळ्यांकडून साहाय्य व नवउत्तेजन मिळणे गरजेचे आहे. तरच ही कोकणाकडे असलेली वैभवशाली परंपरा अबाधित राहील.