शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

पाणीसंकट नाही

By admin | Updated: July 4, 2014 00:12 IST

एमआयडीसीचा दिलासा : कुवारबावसह सात ग्रामपंचायतींचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे औद्योगिक वसाहतीबरोबरच परिसरातील सात ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजनांना आणखी पंधरा दिवस पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, इतका पाणीसाठा हरचेरीसह अन्य धरणात आहे. त्यामुळे सध्यातरी पाणी कपातीचे कोणतेही संकट नाही, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता परशुराम करावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे कुवारबाव व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.औद्योगिक वसाहतीसह रत्नागिरीतील कुवारबाव, नाचणे, पोमेंडी, शिरगाव, मिरजोळे, कर्ला व मिऱ्या ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून पूर्ण तर रत्नागिरी नगरपरिषदेला अंशत: पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी हरचेरी धरणातील पाणीसाठा मे महिन्यातच संपुष्टात आल्याने या सर्वच नळपाणी योजना संकटात सापडल्या होत्या. त्यातील काही ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली होती, तर काहींनी या क्षेत्रातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. या पार्श्वभूमीवर यंदा हरचेरी धरणातील पाणी स्थिती काय आहे, याची विचारणा केल्यावर करावडे बोलत होते. येत्या १५ दिवसांत या सर्वच ग्रामपंचायतींच्या योजनांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. त्यानंतरही पावसाने पाठ फिरविल्याने पाणीसाठा कमी झालाच तर काही प्रमाणात पाणी कपातीचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, तशी स्थिती येईल, असे वाटत नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. एमआयडीसीमार्फत गेल्या वर्षीचे संकट लक्षात घेऊन त्यानंतर तातडीने पाणी साठवणुकीबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळेच यंदा पाणी स्थिती उत्तम राखता आली. सध्या रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्राला ४ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात असून, रत्नागिरी नगरपालिकेला १.७ दशलक्ष लीटर्स पाणी पुरविले जात आहे. ग्रामपंचायतींना एक हजार लीटरला ७.५० रुपये दर आकारला जात आहे. उद्योगांना एक हजार लीटरला २५ रुपये दर आकारला जात आहे. (प्रतिनिधी)