शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण ...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत़. त्यामुळे अनेक कुटुंबीयांसमोर जगावं कसं, असा प्रश्न उभा राहिला आहे. एकेका कुटुंबावर तीन-चार व्यक्ती गमावण्याची वेळ आली़. त्यामध्ये कुटुंबातील कमावता व्यक्तीच गेल्यावर पुढे काय? त्यांच्या मुलाबाळांचे कसं होणार? अनेकांनी व्यवसाय व अन्य कारणासाठी बँका, खासगी वित्तीय संस्था, पतपेढ्या तसेच खासगी व्यक्तींकडून कर्जे उचलली असतील तर अशा व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्यावर असलेल्या कर्जाचे काय? होणार? त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कसा उतरणार? परिस्थिती नसल्यास त्यांचे कर्ज फेडणार कोण? असे अनेक प्रश्न, समस्या कोरोनामध्ये अशी व्यक्ती दगावलेल्यांच्या नातेवाईकांसमोर आ वासून उभे राहिले आहेत. त्यामुळे कोरोनाने कमावता व्यक्ती दगावल्यावर त्यांच्या घरच्यांची अवस्था काय होते, हे ज्याचे जाते त्यालाच कळते, असेच म्हणावे लागेल़.

सुरुवातीला कोरोनावरील लस केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाशी लढा देणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात आली होती़. त्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली होती़. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो लोकांना या लसीकरणाचा फायदा झाला आहे. मात्र, जिल्ह्याची लोकसंख्या पाहता शासनाकडून येणाऱ्या लसीचे प्रमाण फार कमी असल्याची ओरड कायम सुरु आहे. तरीही जशी लस येईल त्या प्रमाणात आरोग्य विभागाकडून जास्तीत जास्त लोकांना देण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाकडून येणाऱ्या लसीचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभाग तरी किती जणांना लस देणार, असा प्रश्न कायमचाच आहे. लस घेतलेल्यांची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्याने कोरोना झालेले अनेकजण बरे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपल्याला लस कशी मिळेल, यासाठी धडपडत आहेत. सुरुवातीच्या काळात लसीकरणाबाबत अनेक चुकीच्या बाबींचा प्रसार केला गेल्याने लोक लसीकरण केंद्रावर जाण्यास तयार नव्हते. मात्र, लस घेतल्याचे महत्त्व समजू लागल्यावर लोकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली. एकीकडे लसीचा पुरवठा कमी तर दुसरीकडे लस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना लसीचे महत्त्व उशिरा समजले असले तरी शासनाने त्याचा पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे.

सध्या काही ठिकाणी लसीकरणामध्ये राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एका राजकीय पक्षाने प्रयत्न करुन लसीकरण करण्याचे आयोजन केल्यानंतर त्याच्या बरोबरच्या राजकीय पक्षाने लसीकरण केंद्र बदलून जवळच्या अन्य ठिकाणी नेल्याने कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आपापसात भांडू लागले आहेत. त्यासाठी राजकारण खेळून लोकांना वेठीस न धरता सर्वांनाच लसीचा फायदा कसा होईल, याकडे राजकारण खेळणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.