शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लसीकरणात राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण ...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत़. त्यामुळे अनेक कुटुंबीयांसमोर जगावं कसं, असा प्रश्न उभा राहिला आहे. एकेका कुटुंबावर तीन-चार व्यक्ती गमावण्याची वेळ आली़. त्यामध्ये कुटुंबातील कमावता व्यक्तीच गेल्यावर पुढे काय? त्यांच्या मुलाबाळांचे कसं होणार? अनेकांनी व्यवसाय व अन्य कारणासाठी बँका, खासगी वित्तीय संस्था, पतपेढ्या तसेच खासगी व्यक्तींकडून कर्जे उचलली असतील तर अशा व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्यावर असलेल्या कर्जाचे काय? होणार? त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कसा उतरणार? परिस्थिती नसल्यास त्यांचे कर्ज फेडणार कोण? असे अनेक प्रश्न, समस्या कोरोनामध्ये अशी व्यक्ती दगावलेल्यांच्या नातेवाईकांसमोर आ वासून उभे राहिले आहेत. त्यामुळे कोरोनाने कमावता व्यक्ती दगावल्यावर त्यांच्या घरच्यांची अवस्था काय होते, हे ज्याचे जाते त्यालाच कळते, असेच म्हणावे लागेल़.

सुरुवातीला कोरोनावरील लस केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाशी लढा देणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना देण्यात आली होती़. त्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतरच्या टप्प्यात ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली होती़. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो लोकांना या लसीकरणाचा फायदा झाला आहे. मात्र, जिल्ह्याची लोकसंख्या पाहता शासनाकडून येणाऱ्या लसीचे प्रमाण फार कमी असल्याची ओरड कायम सुरु आहे. तरीही जशी लस येईल त्या प्रमाणात आरोग्य विभागाकडून जास्तीत जास्त लोकांना देण्यावर भर देण्यात येत आहे. शासनाकडून येणाऱ्या लसीचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभाग तरी किती जणांना लस देणार, असा प्रश्न कायमचाच आहे. लस घेतलेल्यांची प्रतिकारशक्ती वाढलेली असल्याने कोरोना झालेले अनेकजण बरे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपल्याला लस कशी मिळेल, यासाठी धडपडत आहेत. सुरुवातीच्या काळात लसीकरणाबाबत अनेक चुकीच्या बाबींचा प्रसार केला गेल्याने लोक लसीकरण केंद्रावर जाण्यास तयार नव्हते. मात्र, लस घेतल्याचे महत्त्व समजू लागल्यावर लोकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली. एकीकडे लसीचा पुरवठा कमी तर दुसरीकडे लस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना लसीचे महत्त्व उशिरा समजले असले तरी शासनाने त्याचा पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे.

सध्या काही ठिकाणी लसीकरणामध्ये राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एका राजकीय पक्षाने प्रयत्न करुन लसीकरण करण्याचे आयोजन केल्यानंतर त्याच्या बरोबरच्या राजकीय पक्षाने लसीकरण केंद्र बदलून जवळच्या अन्य ठिकाणी नेल्याने कार्यकर्त्यांमध्ये आपापसात वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आपापसात भांडू लागले आहेत. त्यासाठी राजकारण खेळून लोकांना वेठीस न धरता सर्वांनाच लसीचा फायदा कसा होईल, याकडे राजकारण खेळणाऱ्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.