शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

राजकारण नको, समाजकारण गरजेचे (फेरफटका)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, बेडस्, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची उपलब्धता याबाबत नियोजन सुरू ...

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, बेडस्, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची उपलब्धता याबाबत नियोजन सुरू आहे. सद्य:स्थितीत शासकीय रुग्णालये फुल्ल असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने उपाययोजनांबाबत सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. वास्तविक गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी परिस्थिती गंभीर झाली आहे. आणीबाणीच्या काळात विविध राजकीय पक्षांची वरिष्ठ मंडळी एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत. यामुळे मनोरंजन न होता, जनमानसात एक प्रकारची चीड निर्माण होण्याची शक्यता आहे. काळ कठीण आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यापेक्षा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जनतेच्या हितार्थ कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सत्ता कोणाची असो, ही वेळ एकमेकांवर आगपाखड करायची नाही, तर जनतेच्या आरोग्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे. रुग्णसंख्या वाढीबरोबर मृत्यूचे प्रमाणही जिल्ह्यात वाढू लागले आहे. अशावेळी जनतेचे मनोबळ वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल्सअभावी अन्य जिल्ह्यात रुग्णांना जावे लागते. अशावेळी पैशाचा चुराडा तर होतोच, शिवाय तेथेही सद्य:स्थितीत बेडस् उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने आता वसतिगृह, हॉटेल्स् ताब्यात घेण्याचा निर्णय सुरू आहे. सौम्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी ठेवण्याचे प्रयोजन आहे. आरोग्य यंत्रणेपुढेही मनुष्यबळाचे आव्हान उभे ठाकले असल्याने प्रशासनाने खासगी डॉक्टर्सची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. एकूण कोरोनामुळे निर्माण झालेल्या कठीण काळात तरी जनतेच्या हितार्थ विविध राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकत्र येऊन हातात हात घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. राजकारण करण्यापेक्षा समाजकारणाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. जनतेच्या मनात किल्मिष निर्माण करण्याऐवजी सहानुभूती, आदर निर्माण होईल अशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे.

शहराबरोबर गावपातळीवरही कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गावोगावी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसंकलन करणे गरजेचे आहे. कोरोनारुरूग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांना औषधोपचार वेळेवर उपलब्ध होतो, यावर कटाक्ष असणे आवश्यक आहे. जनतेमधून लोकप्रतिनिधी निवडून येत असतात, तेव्हा विश्वासाने त्यांना निवडून दिले जाते. त्यामुळे आता पक्ष व पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी तत्त्वे बाजूला सारून जर कोविड रुग्णांना पाठबळ देऊ केले, तर ते लवकर बरे होऊ शकतात.

मेहरून नाकाडे