शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

...यापुढे कोणाचीही दहशत चालवून घेणार नाही

By admin | Updated: October 18, 2015 23:57 IST

राजन तेली : वेंगुर्लेतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी नितेश राणेंची सारवासारव

वैभववाडी : केंद्रात आणि राज्यात भाजप, शिवसेनेची सत्ता असल्याने नगरपंचायतीचा विकास आम्हीच करु शकतो. आम्ही कोणाचीही दहशत जिल्ह्यात चालू देणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापा आणि दहशतीला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन करत वेंगुर्ले राड्याच्या परिणामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमदार नितेश राणे व्यापाऱ्यांना बोलावून सारवासारव करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.येथील भाजप कार्यालयात तेलींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे, सज्जनराव रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र्र राणे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, राजन चिके, मंगेश लोके आदी उपस्थित होते.तेली म्हणाले की, वेंगुर्लेतील राड्याची किंमत काँग्रेसला सावंतवाडी पालिकेतही मोजावी लागली होती. त्यामुळे तशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून काहीतरी वदवून घेतले गेले. परंतु, पोलीस आणि प्रशासनाने सज्जनरावांच्या धमकी प्रकरणाची योग्य दखल घेतली आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी, अशी आमची इच्छा आहे. ७0 वर्षीय सज्जनराव बालिश? की त्यांना धमकवायला लावणारे बालिश? याचे उत्तर येथील जनता नक्कीच देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांना नगरविकासाची नस माहीत आहे. त्यामुळे नगरांच्या विकासाला पैसे कमी पडणार नाहीत असे धोरण राज्य सरकारने आणले आहे. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतींचा विकास व्हायचा असेल तर युतीच्या हातात येथील सत्ता असली पाहिजे. प्रत्येक वर्षात मिळणारे २ कोटी २00 गावांना वाटून आमदार राणे वैभववाडी नगरपंचायतीचा विकास कसा करणार? १५ वर्षे काँग्रेसची सत्ता असताना कणकवली नगरपंचायतीची किती आरक्षणे काँग्रेसने विकसित केली, असा सवाल करत सत्ता असताना जे शक्य झाले नाही ते विरोधी बाकांवर बसून विकास कसा करणार आहेत. याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहन तेली यांनी यावेळी बोलताना केले. (प्रतिनिधी)...तर आश्चर्य वाटायला नको !प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार कोंडीबा काळे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांवर काँग्रेस दबाव टाकत आहे. त्यामुळे काळे कुटुंबिय सध्या दडपणाखाली आहे. परंतु, काळेंचे वडील जिल्हा बँकेचे कर्मचारी असल्याने तक्रार देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोंडीबा काळे यांनी उद्या नामनिर्देशनपत्र मागे घेतले तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीप्पणी राजन तेली यांनी केली.