शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

...यापुढे कोणाचीही दहशत चालवून घेणार नाही

By admin | Updated: October 18, 2015 23:57 IST

राजन तेली : वेंगुर्लेतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी नितेश राणेंची सारवासारव

वैभववाडी : केंद्रात आणि राज्यात भाजप, शिवसेनेची सत्ता असल्याने नगरपंचायतीचा विकास आम्हीच करु शकतो. आम्ही कोणाचीही दहशत जिल्ह्यात चालू देणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापा आणि दहशतीला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन करत वेंगुर्ले राड्याच्या परिणामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमदार नितेश राणे व्यापाऱ्यांना बोलावून सारवासारव करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.येथील भाजप कार्यालयात तेलींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे, सज्जनराव रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र्र राणे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, राजन चिके, मंगेश लोके आदी उपस्थित होते.तेली म्हणाले की, वेंगुर्लेतील राड्याची किंमत काँग्रेसला सावंतवाडी पालिकेतही मोजावी लागली होती. त्यामुळे तशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून काहीतरी वदवून घेतले गेले. परंतु, पोलीस आणि प्रशासनाने सज्जनरावांच्या धमकी प्रकरणाची योग्य दखल घेतली आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी, अशी आमची इच्छा आहे. ७0 वर्षीय सज्जनराव बालिश? की त्यांना धमकवायला लावणारे बालिश? याचे उत्तर येथील जनता नक्कीच देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांना नगरविकासाची नस माहीत आहे. त्यामुळे नगरांच्या विकासाला पैसे कमी पडणार नाहीत असे धोरण राज्य सरकारने आणले आहे. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतींचा विकास व्हायचा असेल तर युतीच्या हातात येथील सत्ता असली पाहिजे. प्रत्येक वर्षात मिळणारे २ कोटी २00 गावांना वाटून आमदार राणे वैभववाडी नगरपंचायतीचा विकास कसा करणार? १५ वर्षे काँग्रेसची सत्ता असताना कणकवली नगरपंचायतीची किती आरक्षणे काँग्रेसने विकसित केली, असा सवाल करत सत्ता असताना जे शक्य झाले नाही ते विरोधी बाकांवर बसून विकास कसा करणार आहेत. याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहन तेली यांनी यावेळी बोलताना केले. (प्रतिनिधी)...तर आश्चर्य वाटायला नको !प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार कोंडीबा काळे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांवर काँग्रेस दबाव टाकत आहे. त्यामुळे काळे कुटुंबिय सध्या दडपणाखाली आहे. परंतु, काळेंचे वडील जिल्हा बँकेचे कर्मचारी असल्याने तक्रार देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोंडीबा काळे यांनी उद्या नामनिर्देशनपत्र मागे घेतले तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीप्पणी राजन तेली यांनी केली.