शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

काहीही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे हे नेहमीच झालंय : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

खेड : निसर्ग चक्रीवादळामुळे काेकणात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मात्र, गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही़ हे ...

खेड : निसर्ग चक्रीवादळामुळे काेकणात माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ मात्र, गेल्यावर्षीची काहीच मदत अजून मिळालेली नाही़ हे सरकार आत्मविश्वासी नव्हे तर आत्मघातकी सरकार आहे़ काहीही झाले की केंद्राकडे बाेट दाखवायचे हे नेहमीचं झालय, अशी टीका विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली़

ताैक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गुरुवारी खेड दाैऱ्यावर आले हाेते़ यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला़ पत्रकारांशी बाेलताना त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली़ ते म्हणाले की, मागील निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजून पूर्णपणे मिळालेली नाही़ किमान आता तरी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. सलग दुसऱ्या वर्षी चक्रीवादळाचा दणका कोकणाला बसला आहे. या वादळामुळे कोकणाचं मोठं नुकसान झाले आहे, मात्र, गेल्यावर्षी जाहीर केलेली मदत जनतेपर्यंत पाेहाेचलेली नाही. केवळ काहीही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं हेच काम आघाडी सरकारकडून सुरू असल्याचे फडणवीस म्हणाले़

तालुक्यातील बोरज-घोसाळकरवाडी नजीक सोमवारी (१७ मे) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वादळामुळे तुटलेल्या ३३ केव्हीच्या विद्युत भारीत तारेचा स्पर्श झाल्याने प्रकाश गोपाळराव घोसाळकर व वंदना प्रकाश घोसाळकर या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला होता. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू़ तसेच कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असलेल्या सदस्याला नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.