शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर ...

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक बाधित सापडणारी गावे, वाड्या उद्रेकजन्य म्हणून जाहीर करून ती कोरोनाप्रतिबंधित क्षेत्रे केली जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने वाडीवस्तीवर हातपाय पसरल्यामुळे तेथपर्यंत पोहोचून बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील निर्बंध शिथिल करू नयेत, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच नियंत्रणासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मायक्रो नियोजनावर भर दिला गेला. त्यात पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यांच्या खाली आणण्याचे नियोजन केले आहे. अधिक बाधित असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ती गावे किंवा वाड्या उद्रेकजन्य भाग म्हणून जाहीर केल्या जात आहेत. तो भाग १४ दिवस कंटेन्मेंट केला जात असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत ही गावे उद्रेकजन्य म्हणून जाहीर केली जात आहेत. दाटीवाटीची लोकवस्ती, उद्योग वसाहतींच्या ठिकाणी असलेल्यांवर लक्ष केंद्रित केले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य भाग म्हणून घोषित केली आहेत. त्या भागात कोरेाना प्रतिबंधित क्षेत्रातील नियम लागू राहणार आहेत. या गावातील अत्यावश्यक सेवाच कार्यरत राहणार आहे. बाधित भागातील १०० टक्के लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर निगेटिव्ह लोकांची संख्या पाहूनच निर्बंध हटविण्यात येणार आहेत.