शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर ...

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक बाधित सापडणारी गावे, वाड्या उद्रेकजन्य म्हणून जाहीर करून ती कोरोनाप्रतिबंधित क्षेत्रे केली जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने वाडीवस्तीवर हातपाय पसरल्यामुळे तेथपर्यंत पोहोचून बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील निर्बंध शिथिल करू नयेत, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच नियंत्रणासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मायक्रो नियोजनावर भर दिला गेला. त्यात पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यांच्या खाली आणण्याचे नियोजन केले आहे. अधिक बाधित असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ती गावे किंवा वाड्या उद्रेकजन्य भाग म्हणून जाहीर केल्या जात आहेत. तो भाग १४ दिवस कंटेन्मेंट केला जात असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत ही गावे उद्रेकजन्य म्हणून जाहीर केली जात आहेत. दाटीवाटीची लोकवस्ती, उद्योग वसाहतींच्या ठिकाणी असलेल्यांवर लक्ष केंद्रित केले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य भाग म्हणून घोषित केली आहेत. त्या भागात कोरेाना प्रतिबंधित क्षेत्रातील नियम लागू राहणार आहेत. या गावातील अत्यावश्यक सेवाच कार्यरत राहणार आहे. बाधित भागातील १०० टक्के लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर निगेटिव्ह लोकांची संख्या पाहूनच निर्बंध हटविण्यात येणार आहेत.