शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर ...

रत्नागिरी : चाचण्या वाढवूनही रोज ५०० च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक बाधित सापडणारी गावे, वाड्या उद्रेकजन्य म्हणून जाहीर करून ती कोरोनाप्रतिबंधित क्षेत्रे केली जात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने वाडीवस्तीवर हातपाय पसरल्यामुळे तेथपर्यंत पोहोचून बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांतील परिस्थिती गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील निर्बंध शिथिल करू नयेत, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच नियंत्रणासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मायक्रो नियोजनावर भर दिला गेला. त्यात पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यांच्या खाली आणण्याचे नियोजन केले आहे. अधिक बाधित असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ती गावे किंवा वाड्या उद्रेकजन्य भाग म्हणून जाहीर केल्या जात आहेत. तो भाग १४ दिवस कंटेन्मेंट केला जात असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत ही गावे उद्रेकजन्य म्हणून जाहीर केली जात आहेत. दाटीवाटीची लोकवस्ती, उद्योग वसाहतींच्या ठिकाणी असलेल्यांवर लक्ष केंद्रित केले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य भाग म्हणून घोषित केली आहेत. त्या भागात कोरेाना प्रतिबंधित क्षेत्रातील नियम लागू राहणार आहेत. या गावातील अत्यावश्यक सेवाच कार्यरत राहणार आहे. बाधित भागातील १०० टक्के लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर निगेटिव्ह लोकांची संख्या पाहूनच निर्बंध हटविण्यात येणार आहेत.