शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात नऊ जखमी; ४ गंभीर संगमेश्वरमध्ये सलग चौथ्या दिवशी चौथा अपघात

By admin | Updated: May 11, 2014 00:06 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात नऊजण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात नऊजण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे झायलो आणि पुंटो कार यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दोन्ही चालकांसह पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली तर देवरुख -संगमेश्वर मार्गावरील लोवले येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावर उन्हाळी सुट्टीमुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अपघातातील मृतांच्या संख्येसह जखमींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुट्टी घालविण्यासाठी संतोष बबन झोरे हे आपल्या कुटुंबासह झायलो (एमएच-०६-ए२-१४९९) घेऊन मुंबईहून सावंतवाडीच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी हातखंबा पेट्रोल पंपाजवळून चालली होती. त्यावेळी विलास सखाराम दवंत हा पुंटो कार (एमएच-०९-पीएक्स-२१५३) घेऊन बांबवडे (कोल्हापूर) येथून रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा पेट्रोलपंपासमोरील उतारावर दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की, मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. दोन्ही गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये झायलो चालक झोरे यांच्यासह त्याची पत्नी सारिका संतोष झोरे (३५), दीड वर्षाची मुलगी देविका, सुुनिता दादू कोकरे (३५), सविता गंगाराम कोकरे (३२) हे जखमी झाले. या पाचही जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करुन सोडून देण्यात आले. पुंटो कार चालक विलास दवंत याला मुका मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुसर्‍या अपघातात, सुपर स्प्लेंडर ही दुचाकी (एमएच-०८-पी-७७९१) घेऊन राजेंद्र महादेव कदम (४८) आंगवली हे संगमेश्वरातून आंगवलीला निघाले होते. यावेळी समोरुन येणारी मोटार सायकल (एमएच-०८-एए-२७१३) घेऊन लोवलेमधून मंगेश पड्ये (३९, लोवले) व दिलीप गोपाळ बाईत (२७) हे दोघे संगमेश्वरला जात होते. लोवलेदरम्यान त्यांची मोटारसायकल चुकीच्या बाजूला जाऊन कदम यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. दोघेही भरधाव असल्याने दोघांच्याही गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये राजेंद्र कदम व त्यांचा लहान मुलगा अथर्व कदम तसेच मंगेश पड्ये, दिलीप बाईत हे गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भोये यांनी केले. या चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातातील लहानग्या अथर्वची प्रकृती गंभीर आहे. संगमेश्वर तालुक्यात सलग चौथ्या दिवशी झालेला हा चौथा अपघात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवीराज फडणीस, हे. कॉ. एस. एम. लोटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी/शहर वार्ताहर)