शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नीलेश राणेंनी दोन चिमुकल्यांना घेतले दत्तक

By admin | Updated: June 11, 2016 00:55 IST

मायेचा हात : मुलाचा शिक्षणाचा, तर मुलीचा विवाह होईपर्यंतचा सर्व खर्च उचलणार

देवरूख : वडिलांचे छत्र अचानक हरपल्यानंतर दोन चिमुकल्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना मायेचा आधार देण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे सरसावले आहेत. आठ वर्षांच्या सुजलचे संपूर्ण शिक्षण आणि दहा वर्षांच्या तनयाचे शिक्षण आणि विवाह होईपर्यंतचा सर्व खर्च नीलेश राणे उचलणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील सायले गावाचे सरपंच दयानंद सोनाजी कदम यांचे ३८व्या वर्षी अकाली निधन झाले. अत्यंत गरीब परिस्थितीतून झगडत मुलांचे पालन पोषण ते करत होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नीलेश राणे यांनी कदम कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दयानंद कदम यांचे भाऊ शरद कदम, आई निर्मला कदम आणि पत्नी दिशा कदम यांचे सांत्वन केले. यावेळी दयानंद कदम यांची दोन्ही मुलं तेथे होती. नीलेश राणे यांनी त्यांचीही विचारपूस केली आणि संपूर्ण कुटुंबाला मदतीचा हात देऊ केला. दयानंद कदम यांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी घेतो, असे सांगतानाच सुजल याचा शाळेचा संपूर्ण खर्च आणि तनया हिचा शाळा व विवाह होईपर्यंतचा सर्व खर्च मी स्वत: करणार असल्याचे सांगितले. दयानंदचे कुटुंब माझे कुटुंब आहे, त्याच्या पाठीशी कायम उभे राहणार अशा शब्दांत त्यांनी कदम कुटुंबियांना आधार दिला. गुरुवर्य अ. वि. जाधव यांच्याही कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्या आकस्मिक निधानाने संगमेश्वर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील हिरा गमावला, असे ते म्हणाले. त्यांनी जाधव यांचा मुलगा अरुण, पत्नी संगमित्रा जाधव यांची विचारपूस केली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच याच गावातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसन शंकर पांचाळ यांचेही निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला आणि विचारपूस केली. यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासोबत दीपक सावंत, समीर खामकर, गंगाराम केसरकर, बंटी वणजु आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कुटुंबियांना दिलासानिधन पावलेल्या विविध ग्रामस्थांच्या कुटुंबियांचे नीलेश राणे यांनी संगमेश्वर तालुक्यातील आपल्या दौऱ्यात सांत्वन केले. सायले सरपंच दयानंद कदम यांचे अवघ्या ३८व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. त्यामुळे राणे यांनी केवळ त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले असे नाही, तर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचाही निर्णय घेतला. राणे यांनी दयानंद कदम यांच्या मुलांची विचारपूस करून या मुलांच्या आर्थिक खर्चाची जबाबदारी उचलली.