शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

चौपदरीकरण पूर्ण झाल्याखेरीज नव्या प्रकल्पांना मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे ११ वर्षे रखडलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याखेरीज अन्य कोणत्याही कामाला परवानी मिळणार नाही, अशा स्पष्ट ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे ११ वर्षे रखडलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याखेरीज अन्य कोणत्याही कामाला परवानी मिळणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

चिपळूण येथील ॲड. ओवेस पेचकर यांनी महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. याआधीही न्यायालयाने नाराजी व्यक्त करून सरकारला टोलवसुली न करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी या याचिकेवर पुढील सुनावणी झाली. २०१० साली मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर झाले. मात्र, अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. या मूलभूत हक्कावर राज्य सरकारच गदा आणत आहे. आता राज्य सरकार मुंबई ते सिंधुदुर्ग हा ७०० कोटी रुपयांचा नवा प्रकल्प करीत आहे. ही बाब याचिकाकर्ते पेचकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही नवीन प्रकल्पाला मंजुरी देणार नाही, अशी स्पष्ट सूचना केली. सध्या खड्ड्यांमुळे महामार्गाची चाळण झाली आहे. त्याचीही दखल न्यायालयाने गंभीरपणे घेतली आहे. हे खड्डे बुजविण्याबाबतचा अहवाल सरकारने तीन आठवड्यांत सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचवेळी महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा अहवालही डिसेंबरपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

.................................

महामार्गावरील खड्डे बुजविण्याची हमी राज्य सरकारकडून न्यायालयाला देण्यात आली होती. मात्र, खड्डे अजूनही तसेच असल्याचे ॲड. पेचकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विशेषत: चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील खड्ड्यांबाबत यावेळी ऊहापोह करण्यात आला. मात्र, हे काम करताना जुलै महिन्यात अतिवृष्टी, दरड कोसळणे यासारखे नैसर्गिक अडथळे येत असल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.

................

सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. तीन कंत्राटदारांना महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम देण्यात आले होते. त्यातील एमईपी सांजोस या कंपनीकडे देण्यात आलेला ४० किलोमीटरचा पट्टा अजूनही पूर्ण झालेला नाही. आता त्यांना देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले असून, नव्याने ई-निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी न्यायालयासमाेर सांगितले.

................

खड्ड्यांबाबत अधिक नाराजी

गेली अनेक वर्षे आपण खड्ड्यांबाबत फक्त चर्चाच करीत दरवर्षी खड्डे पडत असूनही त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निर्णय घेतला जात नाही. खड्ड्यांबाबत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीमधील काही अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपाय सुचविले आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही समस्या का सोडविली जात नाही, असा प्रश्न न्यायालयाने केला. हा प्रश्न सर्वसामान्य लोकांशी निगडित असल्याने त्याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले. तीन आठवड्यांत उपाययोजनांबाबतची माहिती देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.