शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

किल्ले, जलदुर्गांचे संवर्धन होणे काळाची गरज

By admin | Updated: February 23, 2015 00:21 IST

सत्येंद्र राजे : निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक

चिपळूण : कोकणच्या विकासामध्ये किल्ले, जलदुर्ग, लेणी, पर्यटन स्थळे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. येथील शेती सध्या धोक्यात आली आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत किल्ले व जलदुर्ग यांचे जतन, संवर्धन केल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल, असे रत्नागिरी व्हिस्टोरियनचे प्रमुख प्रा. सत्येंद्र राजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिवकालीन ऐतिहासिक गडकोट हिच छत्रपती शिवरायांची खरी स्मारके आहेत. घेरापालगड (ता. खेड), महिपतगड (ता. संगमेश्वर) आणि बाणकोट (ता. मंडणगड) किल्ला तसेच लेणी, क्रांती स्थळे यांचे जतन व संवर्धन केल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या ३ किल्ल्यांना संरक्षित स्मारक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. घेरापालगड हा किल्ला कान्होजी आंग्रे यांनी इ. स. १७२९ मध्ये जिंकला होता. घेरापालगडसह महिपतगड व बाणकोट किल्ल्यांवर बुरुज, मंदिरे, पाण्याची टाकी, तलाव, तोफा आदी अनेक अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत. काळाच्या ओघात या किल्ल्यांची पडझड होऊ नये आणि पुढील काळात अनेक पिढ्यांना या प्राचीन वास्तूंमधून प्रेरणा मिळावी, यासाठी या किल्ल्यांना संरक्षित स्मारके म्हणून मंत्री तावडे यांनी मान्यता दिली असल्याने खऱ्या अर्थाने पर्यावरण व सागरी सुरक्षेचा गंभीर प्रश्न मिटेल, असा विश्वासही राजे यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक वारसा जतन व पर्यटन विकास या दृष्टीने कोकणातील जलदुर्ग व प्रमुख पर्यटनस्थळे एकमेकांना रेल्वे मार्गाने जोडणे, किल्ले जलदुर्ग, लेणी यांची डागडुजी करावी, आवश्यक तेथे सुशोभिकरण करावे, पाणी व विद्युत व्यवस्था करावी, किल्ल्यांच्या ठिकाणी शासकीय व्यवस्थापक, सुरक्षारक्षक, स्वच्छता कामगार, माळी यांची नियुक्ती करावी. किल्ल्यापर्यंत रस्ते, रोपवे आदी दर्जेदार सुविधा पुरवाव्यात. पर्यटकांसाठी किल्ल्यांवर भोजनगृह, विश्रामकक्ष, प्रथमोपचार सुविधा, किल्ल्यांवर शासकीय वस्तू भांडाराची निर्मिती करावी अथवा स्थानिक बेरोजगार तरुणांना उत्पादने विकण्यास शासनाने भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करुन द्यावी. प्रत्येक तालुक्यात किमान १ किल्ला सांस्कृतिक वारसा व पर्यटनाच्या दृष्टीने निवडून तेथे डागडूजी, सुशोभिकरण करावे. जलदुर्ग, पर्यटन व सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सेवा सुविधांनी सुसज्ज करावे आदी मागण्यांबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असल्याचे राजे यांनी सांगितले. या भागाचा विकास करण्यासाठी पर्यटन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने अशा भागाला आता चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा राजे यांनी व्यक्त केली आहे. अशा गोष्टींसाठी इतिहासप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी जिल्ह्यातील घेरापालगड (खेड), महिपतगड ( संगमेश्वर) व बाणकोट ( मंडणगड) या तीन किल्ल्यांच्या डागडुजीचा विषय लक्षात घेऊन व एतिहासिक वास्तूंचे तजन व्हावे, हे गृहीत धरून या तिन्ही किल्ल्यांच्या विकासाचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यामुळे या भागाच्या एतिहासिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील तीन किल्ले राज्यशासनाने संरक्षीत केले आहेतसत्येंद्र राजे यांनी मांडले गडसंरक्षणासंबंधीचे विचार सुशोभिकरण करणे गरजेचे सोबत सुरक्षितता सर्वात महत्वाची सांस्कृतिक वारसा जतन व पर्यटन विकास महत्वाचा इतिहासाची साक्ष