शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात पावसाळी पर्यटन वाढवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

गुहागर / संकेत गोयथळे : तालुक्याला लाभलेले समुद्रकिनारे, पुरातन मंदिरे आदींमुळे पर्यटन वाढत आहे. तरीही या पर्यटनाला अनेक मर्यादा ...

गुहागर / संकेत गोयथळे : तालुक्याला लाभलेले समुद्रकिनारे, पुरातन मंदिरे आदींमुळे पर्यटन वाढत आहे. तरीही या पर्यटनाला अनेक मर्यादा येत आहेत. तालुक्यात बारमाही पर्यटन होण्यासाठी पावसाळी पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. तालुक्यातील छाेटी-छाेटी धबधब्यांची ठिकाणे विकसित केली, तर पर्यटन व्यवसायात वाढ होऊ शकते.

तालुक्याचा विचार करता, तालुक्यात सवतसडा (ता. चिपळूण) आदींसारखा मोठा धबधबा नाही. मात्र, छोट्या नद्यांवर तसेच ग्रामपंचायतीने नद्यांवर बांधलेले बंधारे, छोटी धरणे आदीं ठिकाणांवर स्थानिक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतात. तालुक्यात प्राधान्याने यासाठी वेलदूर येथील सिद्धेश्वर मंदिराशेजारील धबधबा सर्वपरिचित आहे. वेलदूर नवानगर ग्रामपंचायतीने पाणी पिण्यासाठी काँक्रिट भिंत बांधून अडवलेल्या पाण्यामुळे मोठे तळे निर्माण झाले आहे. या भिंतीवरून जाणाऱ्या पाण्यामध्ये अनेक स्थानिक पावसाळ्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेतात. अंजनवेल ग्रामपंचायतीने अशाच प्रकारे केलेल्या बंधाऱ्यावरील पाण्यात अनेक तालुकावासीय मौजमजा करण्यासाठी जातात. अशाचप्रकारे पानशेत पोमेंडी जंगल भागात नैसर्गिकरित्या नदीच्या पाण्याचे सर्वांना आकर्षण आहे. गुहागर शहरातील रेव्याची नदीसुद्धा यासाठी परिचित आहे.

तालुक्यात अशाचप्रकारे अनेक छोट्या-मोठ्या नद्या-नाले पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाही होतात. त्या परिसरातील लोक या पाण्याची मजा घेतात. तालुक्यात अद्यापही बारमाही पावसाळी पर्यटन रुजलेले नाही. इतरवेळी सुट्ट्यांमध्ये येणारे पर्यटक पावसाळ्यामध्ये तालुक्यात आल्यास येथील बारमाही पर्यटनाला चालना मिळू शकते.

----------------------------

ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

आजच्या स्थितीत पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत नसले, तरी पुढील काळात याला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. धबधब्यांवर जाण्यासाठी चांगला मार्ग व जंगलात असलेल्या ठिकाणांची माहिती देणारे मोठे फलक रस्त्यावर लावल्यास भविष्यात स्थानिकांसह मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. ही ठिकाणे विकसित झाल्यास त्याठिकाणी वडापाव, भेळ तसेच इतर खाद्यांचा छोट्या प्रमाणात व्यवसाय होतो. त्यामुळे पर्यटनाबराेबरच स्थानिकांना राेजगाराचीही संधी मिळू शकेल.