शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पूरमुक्त राजापूरसाठी विकासात्मक दृष्टिकाेनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

विनाेद पवार राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना ...

विनाेद पवार

राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात किमान चार ते पाच वेळा पूर येतो आणि राजापूरकरांची तारांबळ उडते. एकेकाळी ऐतिहासिक बंदर असलेल्या आणि भलीमोठी गलबते लागणाऱ्या राजापूर बंदराच्या झालेल्या या अवस्थेत बदल घडवून आणण्याची इच्छा व दूरदृष्टीच राजापुरातील लोकप्रतिनिधींकडे नसल्याने दरवर्षीच राजापूरकरांच्या डोक्यावर अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.

राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रांमध्ये साचलेला गाळ उपसल्यास भविष्यात निश्चितच राजापूरवासीयांवरील पुराची टांगती तलवार काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूर हा राजापूरवासीयांच्या पाचवीला पूजलेलाच आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राजापूर शहराला या पुराच्या दृष्टचक्रातून सोडविण्यासाठी १९८३ साली पूररेषा आखण्यात आली. तर शहरातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पुनर्वसन धोरण आखण्यात आले. या धोरणाप्रमाणे पूररेषेतील बांधकामांना काही निर्बंध घालण्यात आले. मात्र, काही पूरग्रस्तांना मिळालेले भूखंड वगळता आज ३८ वर्षांनंतर समस्या जैसे थे आहे. राजापुरात दरवर्षी येणारा हा पूर राजापूरच्या विकासातील प्रमुख अडसर ठरत आहे. प्रशासनाने पूररेषा आखून आपले काम केले. त्यानंतर पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, त्यातही अनेक खरे पूरग्रस्त आजही भूखंंडापासून वंचित राहिले आहेत.

तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी आपल्या कारकिर्दीत या पूरसमस्येवर उपाय म्हणून नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नदीपात्रातील गाळ काही अंशी काढण्यात आला. मात्र, त्यानंतर पूरसमस्येबाबत कोणताही विचार शासन वा लोकप्रतिनिधींकडून न झाल्याने पुराची टांगती तलवार कायम आहे.

--------------------

गेल्या काही वर्षांत नव्याने झालेले धरण प्रकल्प, शहर विकासाच्या दृष्टीने नव्याने बांधलेले पूल आणि चौपदरीकरणात अर्जुना नदीवरील पूल आणि भविष्यात कोदवली नदीवर होणारे सुमारे १० कोटी खर्चाचे नवे धरण या गोष्टी राजापूरच्या मूळ पूरसमस्येत नव्याने भर घालणाऱ्या ठरणार आहेत. शहराच्या उशाला पूर्वेला असलेला करक पांगरी अर्जुना धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. या धरणाला प्रस्तावित असलेले कालवेच न काढल्याने धरणातील अतिरिक्त पाणी हे अर्जुना नदीमार्गेच खाडीला मिळत होते. त्यामुळे पुराची तीव्रता वाढण्यास या धरणाच्या पाण्याचाही हातभार असल्याची चर्चा आहे.

-----------------------------------

राजापूर शहर हे अर्जुना आणि कोदवली नदीच्या संगमावर वसलेले आहे. या ठिकाणी या दोन्ही नद्या जैतापूर खाडीला मिळतात. पावसाळ्यात अनेकदा समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे दोन्ही नद्यांचे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरते. तर अर्जुना नदीवर चिंचबांध आणि कोेंढेतड जोडणारा नवीन पूल, मुंबई - गोवा महामार्गावर चौपदरीकरणासाठी बांधला जाणारा पूल यामुळे नदीपात्राचे पाणी ज्या वेगाने वाहून जाणे आवश्यक आहे, त्यालाच अडसर निर्माण हाेत आहे.