शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

पूरमुक्त राजापूरसाठी विकासात्मक दृष्टिकाेनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

विनाेद पवार राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना ...

विनाेद पवार

राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात किमान चार ते पाच वेळा पूर येतो आणि राजापूरकरांची तारांबळ उडते. एकेकाळी ऐतिहासिक बंदर असलेल्या आणि भलीमोठी गलबते लागणाऱ्या राजापूर बंदराच्या झालेल्या या अवस्थेत बदल घडवून आणण्याची इच्छा व दूरदृष्टीच राजापुरातील लोकप्रतिनिधींकडे नसल्याने दरवर्षीच राजापूरकरांच्या डोक्यावर अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.

राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रांमध्ये साचलेला गाळ उपसल्यास भविष्यात निश्चितच राजापूरवासीयांवरील पुराची टांगती तलवार काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूर हा राजापूरवासीयांच्या पाचवीला पूजलेलाच आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राजापूर शहराला या पुराच्या दृष्टचक्रातून सोडविण्यासाठी १९८३ साली पूररेषा आखण्यात आली. तर शहरातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पुनर्वसन धोरण आखण्यात आले. या धोरणाप्रमाणे पूररेषेतील बांधकामांना काही निर्बंध घालण्यात आले. मात्र, काही पूरग्रस्तांना मिळालेले भूखंड वगळता आज ३८ वर्षांनंतर समस्या जैसे थे आहे. राजापुरात दरवर्षी येणारा हा पूर राजापूरच्या विकासातील प्रमुख अडसर ठरत आहे. प्रशासनाने पूररेषा आखून आपले काम केले. त्यानंतर पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, त्यातही अनेक खरे पूरग्रस्त आजही भूखंंडापासून वंचित राहिले आहेत.

तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी आपल्या कारकिर्दीत या पूरसमस्येवर उपाय म्हणून नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नदीपात्रातील गाळ काही अंशी काढण्यात आला. मात्र, त्यानंतर पूरसमस्येबाबत कोणताही विचार शासन वा लोकप्रतिनिधींकडून न झाल्याने पुराची टांगती तलवार कायम आहे.

--------------------

गेल्या काही वर्षांत नव्याने झालेले धरण प्रकल्प, शहर विकासाच्या दृष्टीने नव्याने बांधलेले पूल आणि चौपदरीकरणात अर्जुना नदीवरील पूल आणि भविष्यात कोदवली नदीवर होणारे सुमारे १० कोटी खर्चाचे नवे धरण या गोष्टी राजापूरच्या मूळ पूरसमस्येत नव्याने भर घालणाऱ्या ठरणार आहेत. शहराच्या उशाला पूर्वेला असलेला करक पांगरी अर्जुना धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. या धरणाला प्रस्तावित असलेले कालवेच न काढल्याने धरणातील अतिरिक्त पाणी हे अर्जुना नदीमार्गेच खाडीला मिळत होते. त्यामुळे पुराची तीव्रता वाढण्यास या धरणाच्या पाण्याचाही हातभार असल्याची चर्चा आहे.

-----------------------------------

राजापूर शहर हे अर्जुना आणि कोदवली नदीच्या संगमावर वसलेले आहे. या ठिकाणी या दोन्ही नद्या जैतापूर खाडीला मिळतात. पावसाळ्यात अनेकदा समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे दोन्ही नद्यांचे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरते. तर अर्जुना नदीवर चिंचबांध आणि कोेंढेतड जोडणारा नवीन पूल, मुंबई - गोवा महामार्गावर चौपदरीकरणासाठी बांधला जाणारा पूल यामुळे नदीपात्राचे पाणी ज्या वेगाने वाहून जाणे आवश्यक आहे, त्यालाच अडसर निर्माण हाेत आहे.