शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूरमुक्त राजापूरसाठी विकासात्मक दृष्टिकाेनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

विनाेद पवार राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना ...

विनाेद पवार

राजापूर : राजापूर आणि पूर हे जणू गेल्या कित्येक वर्षांचे एक समीकरणच झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना दरवर्षी पावसाळ्यात किमान चार ते पाच वेळा पूर येतो आणि राजापूरकरांची तारांबळ उडते. एकेकाळी ऐतिहासिक बंदर असलेल्या आणि भलीमोठी गलबते लागणाऱ्या राजापूर बंदराच्या झालेल्या या अवस्थेत बदल घडवून आणण्याची इच्छा व दूरदृष्टीच राजापुरातील लोकप्रतिनिधींकडे नसल्याने दरवर्षीच राजापूरकरांच्या डोक्यावर अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याची टांगती तलवार कायम आहे.

राजापूर शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रांमध्ये साचलेला गाळ उपसल्यास भविष्यात निश्चितच राजापूरवासीयांवरील पुराची टांगती तलवार काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात पूर हा राजापूरवासीयांच्या पाचवीला पूजलेलाच आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.

राजापूर शहराला या पुराच्या दृष्टचक्रातून सोडविण्यासाठी १९८३ साली पूररेषा आखण्यात आली. तर शहरातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी पुनर्वसन धोरण आखण्यात आले. या धोरणाप्रमाणे पूररेषेतील बांधकामांना काही निर्बंध घालण्यात आले. मात्र, काही पूरग्रस्तांना मिळालेले भूखंड वगळता आज ३८ वर्षांनंतर समस्या जैसे थे आहे. राजापुरात दरवर्षी येणारा हा पूर राजापूरच्या विकासातील प्रमुख अडसर ठरत आहे. प्रशासनाने पूररेषा आखून आपले काम केले. त्यानंतर पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, त्यातही अनेक खरे पूरग्रस्त आजही भूखंंडापासून वंचित राहिले आहेत.

तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी आपल्या कारकिर्दीत या पूरसमस्येवर उपाय म्हणून नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून नदीपात्रातील गाळ काही अंशी काढण्यात आला. मात्र, त्यानंतर पूरसमस्येबाबत कोणताही विचार शासन वा लोकप्रतिनिधींकडून न झाल्याने पुराची टांगती तलवार कायम आहे.

--------------------

गेल्या काही वर्षांत नव्याने झालेले धरण प्रकल्प, शहर विकासाच्या दृष्टीने नव्याने बांधलेले पूल आणि चौपदरीकरणात अर्जुना नदीवरील पूल आणि भविष्यात कोदवली नदीवर होणारे सुमारे १० कोटी खर्चाचे नवे धरण या गोष्टी राजापूरच्या मूळ पूरसमस्येत नव्याने भर घालणाऱ्या ठरणार आहेत. शहराच्या उशाला पूर्वेला असलेला करक पांगरी अर्जुना धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. या धरणाला प्रस्तावित असलेले कालवेच न काढल्याने धरणातील अतिरिक्त पाणी हे अर्जुना नदीमार्गेच खाडीला मिळत होते. त्यामुळे पुराची तीव्रता वाढण्यास या धरणाच्या पाण्याचाही हातभार असल्याची चर्चा आहे.

-----------------------------------

राजापूर शहर हे अर्जुना आणि कोदवली नदीच्या संगमावर वसलेले आहे. या ठिकाणी या दोन्ही नद्या जैतापूर खाडीला मिळतात. पावसाळ्यात अनेकदा समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे दोन्ही नद्यांचे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन राजापूर शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरते. तर अर्जुना नदीवर चिंचबांध आणि कोेंढेतड जोडणारा नवीन पूल, मुंबई - गोवा महामार्गावर चौपदरीकरणासाठी बांधला जाणारा पूल यामुळे नदीपात्राचे पाणी ज्या वेगाने वाहून जाणे आवश्यक आहे, त्यालाच अडसर निर्माण हाेत आहे.