शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सहकार्य, सामंजस्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ ...

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. साहजिकच गर्दी कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र नाहक बाहेर पडणारे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर फिरणारे वाहनधारक कमी झालेले नाहीत. यावर कारवाई म्हणून दंड करून महसूल वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई करण्यामागचे कारण नागरिकांनी घरात थांबणे हेच होते; परंतु अनेक महाभागांनी दंड भरला, परंतु शासकीय नियमावलीचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आजही चालत्या गाडीवरून थुंकणे, रस्त्यावर उभे राहून थुंकण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याचा विचार केला तर थुंकण्याची सवय नक्कीच मोडता येईल. आवश्यकता नसताना बाहेर पडून, कोण काय करणार आहे, असा खोटा आविर्भाव दाखविण्यापेक्षा थोडेसे सामंजस्य राखले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी करण्यास आपलाही हातभार लागेल.

कोरोना रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा असो वा सुरक्षिततेसाठी झटणारी पोलीस यंत्रणा असो; जिल्ह्यातील कोरोना हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन यंत्रणा अहोरात्र धडपडत आहे, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. उद्योग, व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेकांचे रोजगार बुडाल्याने कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही आस्थापनांनी कामगारांना कामावर तर ठेवले आहे; परंतु वेतनाचा पत्ता नाही, तर कित्येकांचे वेतन निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च, कर्ज व त्यांचे हप्ते परतफेड, आदी विविध प्रश्नांनी बेजार मंडळी डिप्रेशनमध्ये आहेत. वास्तविक समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनाचे पडसाद भोगावे लागत आहेत. कित्येक परदेशी भारतीयांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत. गतवर्षीपासून कोरोना संकटाचा सामना करीत असताना सर्वांनी शासनाची नियमावली अवलंबली तर नक्कीच कोरोनारूपी संकट पळवून लावणे शक्य होईल. नाहक कायद्याचे उल्लंघन करण्यापेक्षा प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविणे योग्य राहील. सर्वांनी जर प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी होऊन व्यवहारांची गाडी रुळांवर येण्यास मदत होईल. निव्वळ स्वार्थ किंवा फाजील आत्मविश्वास बाळगण्यापेक्षा सहकार्य व सामंजस्य राखणे नेहमीच चांगले !