शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामच्या नावावर हिंसाचार; हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन...सर्वात मोठ्या मुस्लिम देशाने पाकिस्तानला सुनावले
2
NEET-PG परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे NBE ला आदेश; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3
Video: धाड पडताच ५०० च्या नोटांचे बंडल इंजिनिअरने खिडकीबाहेर फेकले; पैशांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले
4
एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?
5
शेपूट वाकडं ते वाकडंच! पाक सरकारचे मंत्री, हाफिज सईदचा मुलगा अन् पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड एकाच मंचावर...
6
"पाकिस्तानातून दहशतवादी नव्हे तर मुस्लीम आले अन्..."; ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचं मोठं विधान
7
अर्शद वारसी अडचणीत! 'पंप अँड डंप' प्रकरणात सेबीची मोठी कारवाई, पत्नीचाही सहभाग उघड
8
भारत आता तो भारत राहिलेला नाही, दहशतवाद नष्ट करणारच!, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये गर्जना
9
हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं
10
Numerology: जूनमध्ये लागणार बंपर लॉटरी! अडकलेले पैसे परत येतील, कमाईचे नवे मार्ग सापडतील!
11
नववी पास मुस्कानला वकील होऊन लढायची आहे स्वत:ची केस, जेलमध्ये घ्यायचंय LLB चं शिक्षण
12
आमदारकीचे तिकीट हवे असेल तर..; पीएम मोदींनी आपल्या नेत्यांसमोर ठेवली एक मोठी अट
13
"RCB फायनलमध्ये जिंकली नाही तर मी पतीला घटस्फोट देईन’’, सामन्यावेळी पोस्टर घेऊन आलेल्या महिलेचा फोटो व्हायरल 
14
Corona Virus : "कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?
15
‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास
16
प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत
17
पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रास्त्रांचा बार फुसका कसा निघाला? उत्तर देताना चिनी संरक्षण प्रवक्त्यांची उडाली फे फे
18
ATM आणि UPI द्वारे PF चे पैसे कसे काढायचे? जूनपासून प्रक्रिया सुरू! जाणून घ्या...
19
ट्रम्प प्रशासनातून 'बाहेर', पण गरिबीतून अब्जाधीश होण्याचा त्यांचा प्रवास अचंबित करणारा! एका निर्णयाने डाव पलटला
20
"अकबराचं लग्न 'राजकन्येशी' नव्हे, 'दासीकन्येशी' झालं होतं! जोधा संदर्भातील चित्रपट..."; हरिभाऊ बागडे यांचा मोठा दावा

सहकार्य, सामंजस्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ ...

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. साहजिकच गर्दी कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र नाहक बाहेर पडणारे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर फिरणारे वाहनधारक कमी झालेले नाहीत. यावर कारवाई म्हणून दंड करून महसूल वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई करण्यामागचे कारण नागरिकांनी घरात थांबणे हेच होते; परंतु अनेक महाभागांनी दंड भरला, परंतु शासकीय नियमावलीचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आजही चालत्या गाडीवरून थुंकणे, रस्त्यावर उभे राहून थुंकण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याचा विचार केला तर थुंकण्याची सवय नक्कीच मोडता येईल. आवश्यकता नसताना बाहेर पडून, कोण काय करणार आहे, असा खोटा आविर्भाव दाखविण्यापेक्षा थोडेसे सामंजस्य राखले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी करण्यास आपलाही हातभार लागेल.

कोरोना रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा असो वा सुरक्षिततेसाठी झटणारी पोलीस यंत्रणा असो; जिल्ह्यातील कोरोना हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन यंत्रणा अहोरात्र धडपडत आहे, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. उद्योग, व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेकांचे रोजगार बुडाल्याने कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही आस्थापनांनी कामगारांना कामावर तर ठेवले आहे; परंतु वेतनाचा पत्ता नाही, तर कित्येकांचे वेतन निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च, कर्ज व त्यांचे हप्ते परतफेड, आदी विविध प्रश्नांनी बेजार मंडळी डिप्रेशनमध्ये आहेत. वास्तविक समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनाचे पडसाद भोगावे लागत आहेत. कित्येक परदेशी भारतीयांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत. गतवर्षीपासून कोरोना संकटाचा सामना करीत असताना सर्वांनी शासनाची नियमावली अवलंबली तर नक्कीच कोरोनारूपी संकट पळवून लावणे शक्य होईल. नाहक कायद्याचे उल्लंघन करण्यापेक्षा प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविणे योग्य राहील. सर्वांनी जर प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी होऊन व्यवहारांची गाडी रुळांवर येण्यास मदत होईल. निव्वळ स्वार्थ किंवा फाजील आत्मविश्वास बाळगण्यापेक्षा सहकार्य व सामंजस्य राखणे नेहमीच चांगले !