शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

सहकार्य, सामंजस्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ ...

कोरोनामुळे शासकीय कार्यालयातून २५ टक्के उपस्थितीचा निकष पाळण्यात येत आहे. अनलॉकमध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाजारपेठ खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. साहजिकच गर्दी कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र नाहक बाहेर पडणारे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यांवर फिरणारे वाहनधारक कमी झालेले नाहीत. यावर कारवाई म्हणून दंड करून महसूल वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई करण्यामागचे कारण नागरिकांनी घरात थांबणे हेच होते; परंतु अनेक महाभागांनी दंड भरला, परंतु शासकीय नियमावलीचे पालन करण्यात ते अयशस्वी ठरले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आजही चालत्या गाडीवरून थुंकणे, रस्त्यावर उभे राहून थुंकण्याचे प्रकार कमी झालेले नाहीत. स्वत:बरोबर इतरांच्या आरोग्याचा विचार केला तर थुंकण्याची सवय नक्कीच मोडता येईल. आवश्यकता नसताना बाहेर पडून, कोण काय करणार आहे, असा खोटा आविर्भाव दाखविण्यापेक्षा थोडेसे सामंजस्य राखले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी करण्यास आपलाही हातभार लागेल.

कोरोना रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा असो वा सुरक्षिततेसाठी झटणारी पोलीस यंत्रणा असो; जिल्ह्यातील कोरोना हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासन यंत्रणा अहोरात्र धडपडत आहे, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. उद्योग, व्यवसायावर परिणाम झाल्याने अनेकांचे रोजगार बुडाल्याने कित्येकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षीपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही आस्थापनांनी कामगारांना कामावर तर ठेवले आहे; परंतु वेतनाचा पत्ता नाही, तर कित्येकांचे वेतन निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च, कर्ज व त्यांचे हप्ते परतफेड, आदी विविध प्रश्नांनी बेजार मंडळी डिप्रेशनमध्ये आहेत. वास्तविक समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनाचे पडसाद भोगावे लागत आहेत. कित्येक परदेशी भारतीयांच्याही नोकऱ्या गेल्या आहेत. गतवर्षीपासून कोरोना संकटाचा सामना करीत असताना सर्वांनी शासनाची नियमावली अवलंबली तर नक्कीच कोरोनारूपी संकट पळवून लावणे शक्य होईल. नाहक कायद्याचे उल्लंघन करण्यापेक्षा प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविणे योग्य राहील. सर्वांनी जर प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर नक्कीच कोरोना संक्रमण कमी होऊन व्यवहारांची गाडी रुळांवर येण्यास मदत होईल. निव्वळ स्वार्थ किंवा फाजील आत्मविश्वास बाळगण्यापेक्षा सहकार्य व सामंजस्य राखणे नेहमीच चांगले !