शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ठिकाणचे नैसर्गिक जलस्रोत बुजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून ...

शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून खऱ्या अर्थाने कडक उन्हाला सुरुवात होते. ते मार्च महिन्याच्या अखेरच्या पंधरा दिवसांत प्रखर उन्हाची तीव्रता एवढी भयानक स्वरूपाची होते की, पाण्याशिवाय शेती-भाती करपून जाते, तर तहानेने जीव व्याकूळ होतो. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील उकाड्याने पाण्याची तीव्र टंचाई भासून पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची झळ कमी झाली आहे.

विहीर, बोअरवेल याशिवाय तळी, झरे यासारखे नैसर्गिक जलस्रोत काळाच्या ओघात बुजले जात आहेत. प्रत्येक गावात एक-दोन तरी जलस्रोत असायचे; परंतु या नैसर्गिक जलस्रोतांची जी देखभाल केली जात होती ती योग्य प्रमाणात न केल्याने सद्य:स्थितीने बरेचशे जलस्रोत बुजून गेलेले दिसतात. १० वर्षांपूर्वी याच नैसर्गिक स्रोतावर शेतकरी शेती करायचे, पिण्यासाठीसुद्धा या जलस्रोतांमधून पाणी आणले जायचे; परंतु आज मात्र विविध कारणांनी हे जलस्रोत मोठ्या प्रमाणावर बुजले गेल्याने त्याचा परिणाम पाणीटंचाई भेडसावण्यावर होत आहे.

आज बऱ्याच ठिकाणी पाण्याची भीषणता दिसून येते. मात्र, शासकीयदृष्ट्या ती गावे, वाड्या टंचाईग्रस्तांमध्ये समावेश नसल्याने त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत नाही. तेथील लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असले तरी पिण्याशिवाय इतर वापरासाठी पाणी टँकरने विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर काही भाग पाण्याने संपन्न असून, होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबला पाहिजे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे.