शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अनेक ठिकाणचे नैसर्गिक जलस्रोत बुजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून ...

शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून खऱ्या अर्थाने कडक उन्हाला सुरुवात होते. ते मार्च महिन्याच्या अखेरच्या पंधरा दिवसांत प्रखर उन्हाची तीव्रता एवढी भयानक स्वरूपाची होते की, पाण्याशिवाय शेती-भाती करपून जाते, तर तहानेने जीव व्याकूळ होतो. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील उकाड्याने पाण्याची तीव्र टंचाई भासून पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची झळ कमी झाली आहे.

विहीर, बोअरवेल याशिवाय तळी, झरे यासारखे नैसर्गिक जलस्रोत काळाच्या ओघात बुजले जात आहेत. प्रत्येक गावात एक-दोन तरी जलस्रोत असायचे; परंतु या नैसर्गिक जलस्रोतांची जी देखभाल केली जात होती ती योग्य प्रमाणात न केल्याने सद्य:स्थितीने बरेचशे जलस्रोत बुजून गेलेले दिसतात. १० वर्षांपूर्वी याच नैसर्गिक स्रोतावर शेतकरी शेती करायचे, पिण्यासाठीसुद्धा या जलस्रोतांमधून पाणी आणले जायचे; परंतु आज मात्र विविध कारणांनी हे जलस्रोत मोठ्या प्रमाणावर बुजले गेल्याने त्याचा परिणाम पाणीटंचाई भेडसावण्यावर होत आहे.

आज बऱ्याच ठिकाणी पाण्याची भीषणता दिसून येते. मात्र, शासकीयदृष्ट्या ती गावे, वाड्या टंचाईग्रस्तांमध्ये समावेश नसल्याने त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत नाही. तेथील लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असले तरी पिण्याशिवाय इतर वापरासाठी पाणी टँकरने विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर काही भाग पाण्याने संपन्न असून, होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबला पाहिजे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे.