शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

अनेक ठिकाणचे नैसर्गिक जलस्रोत बुजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून ...

शहरी किंवा ग्रामीण भागातील लोकांच्या पाचवीला पुजलेला प्रश्न म्हणजे एप्रिल ते मे या महिन्यादरम्यान उद्भवणारी पाण्याची टंचाई, फेब्रुवारी महिन्यापासून खऱ्या अर्थाने कडक उन्हाला सुरुवात होते. ते मार्च महिन्याच्या अखेरच्या पंधरा दिवसांत प्रखर उन्हाची तीव्रता एवढी भयानक स्वरूपाची होते की, पाण्याशिवाय शेती-भाती करपून जाते, तर तहानेने जीव व्याकूळ होतो. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील उकाड्याने पाण्याची तीव्र टंचाई भासून पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची झळ कमी झाली आहे.

विहीर, बोअरवेल याशिवाय तळी, झरे यासारखे नैसर्गिक जलस्रोत काळाच्या ओघात बुजले जात आहेत. प्रत्येक गावात एक-दोन तरी जलस्रोत असायचे; परंतु या नैसर्गिक जलस्रोतांची जी देखभाल केली जात होती ती योग्य प्रमाणात न केल्याने सद्य:स्थितीने बरेचशे जलस्रोत बुजून गेलेले दिसतात. १० वर्षांपूर्वी याच नैसर्गिक स्रोतावर शेतकरी शेती करायचे, पिण्यासाठीसुद्धा या जलस्रोतांमधून पाणी आणले जायचे; परंतु आज मात्र विविध कारणांनी हे जलस्रोत मोठ्या प्रमाणावर बुजले गेल्याने त्याचा परिणाम पाणीटंचाई भेडसावण्यावर होत आहे.

आज बऱ्याच ठिकाणी पाण्याची भीषणता दिसून येते. मात्र, शासकीयदृष्ट्या ती गावे, वाड्या टंचाईग्रस्तांमध्ये समावेश नसल्याने त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत नाही. तेथील लोक पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असले तरी पिण्याशिवाय इतर वापरासाठी पाणी टँकरने विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर काही भाग पाण्याने संपन्न असून, होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबला पाहिजे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे.