शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँका बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते वादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात असलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारी कामावर येताना येणाऱ्या अडचणी तसेच रविवारपासून वीजपुरवठा तसेच ...

रत्नागिरी : तौक्ते वादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात असलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारी कामावर येताना येणाऱ्या अडचणी तसेच रविवारपासून वीजपुरवठा तसेच इंटरनेटची समस्या असल्याने त्याचा कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच खासगी आणि व्यापारी बँका सोमवारी बंद ठेवण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक नंदकिशोर पाटील यांनी दिली. सोमवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये लाॅकडाऊन असल्याने बॅंक बंदचा परिणाम तसा फारसा जाणवला नाही.

तौेक्ते वादळाचे आगमन जिल्ह्यात रविवारपासून होणार होते. मात्र, त्याच्या प्रभावामुळे शनिवारपासूनच जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर वाऱ्याच्या जोरदार माऱ्यासह दुपारनंतर मुसळधार पाऊस होता. वारा आणि संततधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक मार्गांवर झाडे उन्मळून पडल्याने मार्ग बंद झाले. वीजवाहिन्यांवरही झाडाच्या फांद्या पडल्याने तसेच काही ठिकाणी पोलही कोसळून पडल्याने जिल्ह्यातील वीजपुरवठाही खंडित झाला.

सोमवारी सकाळपर्यंत वारा आणि पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे काही ठिकाणी सोमवारी दुपारपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक मार्ग बंद असल्याने बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना कामावर येताना विशेषत: ग्रामीण भागातील बँंकांना अधिक अडचणी होत्या. त्याचप्रमाणे खंडित वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवेत येणाऱ्या अडचणींचा परिणाम बॅंकांच्या कामकाजावर होणार होता. त्यामुळे राज्य स्तरावरील बॅंकर्स कमिटीच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय आणि व्यापारी बॅंका सोमवारी बंद ठेवण्यासाठी विशेष परवानगी मागितली होती. त्यानुसार बॅंकांना सोमवारी बंद ठेवण्यास जिल्हा प्रशासनाकडून विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आल्याने सोमवारी जिल्ह्यातील राष्ट्रीय, खासगी तसेच व्यापारी अशा सुमारे ३३० बॅंका बंद होत्या.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ताैक्ते वादळाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून रत्नागिरी, राजापूर, गुहागर, मंडणगड आणि दापोली या पाच तालुक्यांमध्ये रविवार आणि सोमवार असे दोन दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर केले होते. त्यामुळे बॅंक बंद असल्याचा परिणाम फारसा जाणवला नाही. तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखा तसेच सहकारी बॅंका मात्र सोमवारी सुरू होत्या.