शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३,२४९ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

रत्नागिरी : न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित असतात. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. हे वाद निकाली ...

रत्नागिरी : न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित असतात. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. हे वाद निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या लाेकअदालतीत रत्नागिरी जिल्ह्यातून २,९८९ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १४,८९१ वादपूर्व प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यातील ३२४९ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले. यावेळी एकूण ८,५५,३७,१६० रुपये एवढ्या रकमेची वसुली आणि वाद सामंजस्याने निर्णित झाले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशावरून २५ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय लाेकअदालतीचे आयाेजन करण्यात आले हाेते.

मोठ्या संख्येने प्रकरणे विधी सेवा प्राधिकरणकडे दाखल झाल्यामुळे लोकन्यायालयापूर्वी सतत पाच दिवस पूर्वबैठकांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वबैठकांच्या दरम्यान एस. बी. कीर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी अमित वायकुळ, अथर्व देसाई, पूर्वा जोगळेकर, सिद्धी शिंदे, दिव्या लिंगायत, अवंती गुरव, आश्विनी कदम, कृपा परुळेकर, सलोनी शेडगे, रिया माने, नीलम शिंदे, जान्हवी पाटील, निरामय साळवी, तन्मय दाते यांनी सहकार्य केले.

या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे २९८९ एवढी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४२३ प्रकरणांमध्ये निवाडा झाला. यामध्ये २,१०,३७,३६९ रुपये एवढ्या रकमेसंदर्भात वादाचे निवारण झाले. तसेच १४,८९१ वादपूर्व प्रकरणांपैकी २,८२६ प्रकरणांमध्ये निवाडे झाले. वादपूर्व प्रकरणांमध्ये बँकांच्या कर्जवसुली प्रकरणात ५,५७,८३,३१० रुपयांची कर्ज प्रकरणे न्यायालयात वाद दाखल करण्यापूर्वीच वसुली झाली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि इतर प्रकरणांमध्ये ८७,१६,३८१ रुपये एवढ्या रकमेचे वाद सामोपचाराने मिटविण्यात आले.