शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

राष्ट्रीय पशुधन अभियानास रत्नागिरीत प्रारंभ : म्हस्के

By admin | Updated: July 10, 2014 00:00 IST

राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू

रत्नागिरी : केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शिवाय गवताच्या ठोंबांचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. म्हस्के यांनी दिली.वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, संस्था, मंडळांना एक हेक्टरपेक्षा जमीन अधिक आहेत, त्यांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून आतापर्यंत ६७ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, १०० ते ११० प्रस्ताव जमा झाल्यास ते एकत्रित करून पाठविण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. प्रस्ताव मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ३० हजार ते एक लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. १०० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. या निधीतून शेतकरी कुंपण, बियाणे, सिंचन, जमिनीची पातळी सुधारणे इत्यादी कामासाठी वापरू शकतात. शेतकरी स्वत:च्या जनावरांसाठी चारा ठेऊन उर्वरित चाऱ्याची विक्री करता येऊ शकते. गतवर्षी किलोला साडेतीन रूपये दर देण्यात आला होता. पडिक जमीन, कलमांच्या बागेत, भात जमिनीच्या बांधावर गवताची लागवड करण्यात येते. यावर्षी सहा लाख ‘यशवंत-जयवंत’ गवताचे ठोंब वितरीत करण्यात येणार आहे. एक लाख चार हजार गवताचे ठोंब रत्नागिरी तालुक्यात वाटप करण्यात आले. जांभरूण, वेतोशी, खरवते, मालगुंड, जाकादेवी, फणसवळे, वाटद-खंडाळा, हरचेरी, डोर्ले, पावस येथे गवताचे ठोंब वितरीत करण्यात आले.(प्रतिनिधी)