शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

राष्ट्रीय पशुधन अभियानास रत्नागिरीत प्रारंभ : म्हस्के

By admin | Updated: July 10, 2014 00:00 IST

राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू

रत्नागिरी : केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शिवाय गवताच्या ठोंबांचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. म्हस्के यांनी दिली.वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, संस्था, मंडळांना एक हेक्टरपेक्षा जमीन अधिक आहेत, त्यांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून आतापर्यंत ६७ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, १०० ते ११० प्रस्ताव जमा झाल्यास ते एकत्रित करून पाठविण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. प्रस्ताव मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ३० हजार ते एक लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. १०० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. या निधीतून शेतकरी कुंपण, बियाणे, सिंचन, जमिनीची पातळी सुधारणे इत्यादी कामासाठी वापरू शकतात. शेतकरी स्वत:च्या जनावरांसाठी चारा ठेऊन उर्वरित चाऱ्याची विक्री करता येऊ शकते. गतवर्षी किलोला साडेतीन रूपये दर देण्यात आला होता. पडिक जमीन, कलमांच्या बागेत, भात जमिनीच्या बांधावर गवताची लागवड करण्यात येते. यावर्षी सहा लाख ‘यशवंत-जयवंत’ गवताचे ठोंब वितरीत करण्यात येणार आहे. एक लाख चार हजार गवताचे ठोंब रत्नागिरी तालुक्यात वाटप करण्यात आले. जांभरूण, वेतोशी, खरवते, मालगुंड, जाकादेवी, फणसवळे, वाटद-खंडाळा, हरचेरी, डोर्ले, पावस येथे गवताचे ठोंब वितरीत करण्यात आले.(प्रतिनिधी)