शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरीसाठी नाटे ग्रामपंचायत सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. किनारपट्टीवरच मुबलक प्रमाणात जागा ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. किनारपट्टीवरच मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, नाटे ग्रामपंचायतीने आयलॉग जेटीसाठी प्रस्तावित असलेली दीड हजार एकर व लगतच्या परिसरातील जागेत रिफायनरी प्रकल्प उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा, यासाठी राजापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हावासीय जोरदार प्रयत्न करत असताना शासन मात्र आपली भूमिका ठामपणे जाहीर करत नव्हते. अशातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रिफायनरीबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मौन सोडत रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून, तो राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका मांडली. मात्र, तो नाणारला न होता अन्य ठिकाणी होईल, असेही स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने रिफायनरी प्रकल्प नाटे परिसरात राबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रिफायनरी प्रकल्पाची संपूर्ण माहिती राजापूरवासीयांना मागील काही वर्षात झालेली आहे. नाणार येथील अधिसूचना रद्द झाल्यानंतर नुकतेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक जनतेची जेथे मागणी असेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल, असे जाहीर केले होते. रिफायनरी प्रकल्प गावच्या, तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणारा असून, अशा प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो. नाटे येथे यापूर्वी आयलॉग जेटीसाठी दीड हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जागेसह आजुबाजूच्या जागेत रिफायनरी राबवावा, त्याकरिता आवश्यक सहकार्य ग्रामपंचायतीकडून मिळेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नाटे ग्रामपंचायतीने तसा ठरावही पारीत केला असून, त्याच्या प्रतीही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

आंबोळगड - नाटे परिसरात शासनाचा आयलॉग हा जेटी प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी होत असून, त्या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर आता मुख्यमंत्री त्याला कसा प्रतिसाद देतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.