शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

रिफायनरीसाठी नाटे ग्रामपंचायत सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. किनारपट्टीवरच मुबलक प्रमाणात जागा ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. किनारपट्टीवरच मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, नाटे ग्रामपंचायतीने आयलॉग जेटीसाठी प्रस्तावित असलेली दीड हजार एकर व लगतच्या परिसरातील जागेत रिफायनरी प्रकल्प उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा, यासाठी राजापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हावासीय जोरदार प्रयत्न करत असताना शासन मात्र आपली भूमिका ठामपणे जाहीर करत नव्हते. अशातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रिफायनरीबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मौन सोडत रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून, तो राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका मांडली. मात्र, तो नाणारला न होता अन्य ठिकाणी होईल, असेही स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने रिफायनरी प्रकल्प नाटे परिसरात राबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रिफायनरी प्रकल्पाची संपूर्ण माहिती राजापूरवासीयांना मागील काही वर्षात झालेली आहे. नाणार येथील अधिसूचना रद्द झाल्यानंतर नुकतेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक जनतेची जेथे मागणी असेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल, असे जाहीर केले होते. रिफायनरी प्रकल्प गावच्या, तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणारा असून, अशा प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो. नाटे येथे यापूर्वी आयलॉग जेटीसाठी दीड हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जागेसह आजुबाजूच्या जागेत रिफायनरी राबवावा, त्याकरिता आवश्यक सहकार्य ग्रामपंचायतीकडून मिळेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नाटे ग्रामपंचायतीने तसा ठरावही पारीत केला असून, त्याच्या प्रतीही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

आंबोळगड - नाटे परिसरात शासनाचा आयलॉग हा जेटी प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी होत असून, त्या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर आता मुख्यमंत्री त्याला कसा प्रतिसाद देतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.