शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

रिफायनरीसाठी नाटे ग्रामपंचायत सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. किनारपट्टीवरच मुबलक प्रमाणात जागा ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातून बाहेर जाऊ नये, यासाठी आता तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. किनारपट्टीवरच मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, नाटे ग्रामपंचायतीने आयलॉग जेटीसाठी प्रस्तावित असलेली दीड हजार एकर व लगतच्या परिसरातील जागेत रिफायनरी प्रकल्प उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा, यासाठी राजापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हावासीय जोरदार प्रयत्न करत असताना शासन मात्र आपली भूमिका ठामपणे जाहीर करत नव्हते. अशातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रिफायनरीबाबत आपली भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मौन सोडत रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून, तो राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका मांडली. मात्र, तो नाणारला न होता अन्य ठिकाणी होईल, असेही स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने रिफायनरी प्रकल्प नाटे परिसरात राबविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

रिफायनरी प्रकल्पाची संपूर्ण माहिती राजापूरवासीयांना मागील काही वर्षात झालेली आहे. नाणार येथील अधिसूचना रद्द झाल्यानंतर नुकतेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक जनतेची जेथे मागणी असेल तेथे रिफायनरी प्रकल्प होईल, असे जाहीर केले होते. रिफायनरी प्रकल्प गावच्या, तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावणारा असून, अशा प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो. नाटे येथे यापूर्वी आयलॉग जेटीसाठी दीड हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जागेसह आजुबाजूच्या जागेत रिफायनरी राबवावा, त्याकरिता आवश्यक सहकार्य ग्रामपंचायतीकडून मिळेल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नाटे ग्रामपंचायतीने तसा ठरावही पारीत केला असून, त्याच्या प्रतीही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

आंबोळगड - नाटे परिसरात शासनाचा आयलॉग हा जेटी प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवरच रिफायनरी प्रकल्प मार्गी लागावा, अशी मागणी होत असून, त्या पार्श्वभूमीवर नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीनंतर आता मुख्यमंत्री त्याला कसा प्रतिसाद देतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.