शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दापाेलीतील नारगोली धरण पूर्णत: सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धरणाला गळती लागणे व धरण गळतीमुळे फुटण्याच्या घटना घडत आहेत. मात्र दापोली ...

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धरणाला गळती लागणे व धरण गळतीमुळे फुटण्याच्या घटना घडत आहेत. मात्र दापोली तालुक्यातील नारगोली धरण पूर्णत: सुरक्षित असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव शेडगे यांनी दिली.

दापोली नगरपंचायत मालकीच्या दापोली शहरामध्ये नियमित भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नारगोली येथील धरणाचे खोलीकरण लोकसहभागातून एप्रिल, मे २०१९ मध्ये करण्यात आले. या धरणाची महादेव टाेळे यांनी पाहणी केली. यावेळी लेखापाल दीपक सावंत, नळपाणी पुरवठा विभागाचे स्वप्नील महाकाळ, सरपंच प्रभाकर लाले उपस्थित होते. मागील २ वर्षे दापोली शहराची नियमित भासणारी पाणीटंचाई कमी झाली. खोलीकरणामुळे निघालेला गाळ, माती, मुरूम, खडक यापासून धरणाच्या भिंतीचे व भिंतीच्या पायाचे मजबुतीकरण करण्यात आले. यामुळे ४२ वर्षे जुन्या व दुर्लक्षित असलेल्या धरणाचे प्रथम एखाद्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने लोकसहभागातून पाणी टंचाईवर तर मात केलीच, त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण केले आहे.

कामाचे मेरी, नाशिक येथील धरण सुरक्षा संस्थेच्या पथकानेही लोकसहभागाचे कामाचे काैतुक केले आहे. लोकसहभागातून धरणातील ७८६६० क्युबिक मीटर गाळ व माती काढण्यात आली. याद्वारे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये ०.०७८ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढला आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पूर्वी ०.३५ होता, तो आता एकूण ०.४३ एमसीएम (दशलक्ष घनमीटर) झाला आहे. वाढलेल्या पाण्यामुळेच शहरामध्ये एप्रिल व मेमध्ये नियमित पाणी पुरवठा करण्यात आला.

धरणामध्ये खोलीकरण, रुंदीकरण, दगडी बंधारे, मातीची संरक्षक भिंत उभारणे, जमीन तयार करणे, ओढ्याचे रुंदीकरण, श्रमदान आदीचे अंदाजित मूल्य हे ३६९.६७ लाख होत आहे. धरणाच्या कामाकरिता नगरपंचायतीने डंपर, इंधन व इतरकरिता एकूण ३६.६३ लाख खर्च केला आहे. शासनाच्या अलोरे येथील जलसंपदा विभागाने फक्त गाळ काढण्यासाठी मे १,८३,०९,३०८ इतके अंदाजपत्रक केले होते. नगरपंचायतीने लोकसहभागातून फक्त गाळच काढला नाही, तर खोली करणे, रुंदीकरण, बंधारे व जमीन तयार केली आहे. यामुळे शासनाची सुमारे ३ कोटी इतक्या निधीची बचत केली आहे.

धरणाच्या खालील शेतकऱ्यांचे पुरामुळे होणारे नुकसान कमी झाले. तसेच नदीमध्ये बारमाही पाणी राहिल्यामुळे शेतीमध्ये दुबार पीक घेणे शक्य आहे. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.