शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

दापाेलीतील नारगोली धरण पूर्णत: सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धरणाला गळती लागणे व धरण गळतीमुळे फुटण्याच्या घटना घडत आहेत. मात्र दापोली ...

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धरणाला गळती लागणे व धरण गळतीमुळे फुटण्याच्या घटना घडत आहेत. मात्र दापोली तालुक्यातील नारगोली धरण पूर्णत: सुरक्षित असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव शेडगे यांनी दिली.

दापोली नगरपंचायत मालकीच्या दापोली शहरामध्ये नियमित भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नारगोली येथील धरणाचे खोलीकरण लोकसहभागातून एप्रिल, मे २०१९ मध्ये करण्यात आले. या धरणाची महादेव टाेळे यांनी पाहणी केली. यावेळी लेखापाल दीपक सावंत, नळपाणी पुरवठा विभागाचे स्वप्नील महाकाळ, सरपंच प्रभाकर लाले उपस्थित होते. मागील २ वर्षे दापोली शहराची नियमित भासणारी पाणीटंचाई कमी झाली. खोलीकरणामुळे निघालेला गाळ, माती, मुरूम, खडक यापासून धरणाच्या भिंतीचे व भिंतीच्या पायाचे मजबुतीकरण करण्यात आले. यामुळे ४२ वर्षे जुन्या व दुर्लक्षित असलेल्या धरणाचे प्रथम एखाद्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने लोकसहभागातून पाणी टंचाईवर तर मात केलीच, त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण केले आहे.

कामाचे मेरी, नाशिक येथील धरण सुरक्षा संस्थेच्या पथकानेही लोकसहभागाचे कामाचे काैतुक केले आहे. लोकसहभागातून धरणातील ७८६६० क्युबिक मीटर गाळ व माती काढण्यात आली. याद्वारे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये ०.०७८ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढला आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पूर्वी ०.३५ होता, तो आता एकूण ०.४३ एमसीएम (दशलक्ष घनमीटर) झाला आहे. वाढलेल्या पाण्यामुळेच शहरामध्ये एप्रिल व मेमध्ये नियमित पाणी पुरवठा करण्यात आला.

धरणामध्ये खोलीकरण, रुंदीकरण, दगडी बंधारे, मातीची संरक्षक भिंत उभारणे, जमीन तयार करणे, ओढ्याचे रुंदीकरण, श्रमदान आदीचे अंदाजित मूल्य हे ३६९.६७ लाख होत आहे. धरणाच्या कामाकरिता नगरपंचायतीने डंपर, इंधन व इतरकरिता एकूण ३६.६३ लाख खर्च केला आहे. शासनाच्या अलोरे येथील जलसंपदा विभागाने फक्त गाळ काढण्यासाठी मे १,८३,०९,३०८ इतके अंदाजपत्रक केले होते. नगरपंचायतीने लोकसहभागातून फक्त गाळच काढला नाही, तर खोली करणे, रुंदीकरण, बंधारे व जमीन तयार केली आहे. यामुळे शासनाची सुमारे ३ कोटी इतक्या निधीची बचत केली आहे.

धरणाच्या खालील शेतकऱ्यांचे पुरामुळे होणारे नुकसान कमी झाले. तसेच नदीमध्ये बारमाही पाणी राहिल्यामुळे शेतीमध्ये दुबार पीक घेणे शक्य आहे. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.