शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

नाेकरी, व्यवसायाच्या संधीमुळे पाॅलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमानंतर व्यवसाय/नोकरीची संधी तर उपलब्ध होते, शिवाय पदवीसाठी थेट दुसऱ्या ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमानंतर व्यवसाय/नोकरीची संधी तर उपलब्ध होते, शिवाय पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो. सीईटी देण्याची कटकटही भासत नसल्यानेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. जिल्ह्यात एकमेव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असून, ४८० प्रवेश क्षमता असताना ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, परंतु शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मात्र एकमेव आहे. इलेक्ट्रीक, काॅम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्राॅनिक्स अभ्यासक्रमाचे एकूण आठ वर्ग असून इलेक्ट्रिक, काॅम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. पदविका अभ्यासक्रमानंतर ९० टक्के विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळत असल्याने अनेक विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतात. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामुळे पदवीचा पायाही भक्कम होतो.

संगणक, इलेक्ट्रिककडे विद्यार्थ्यांचा ओढा

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रिक, काॅम्प्युटर, मेकॅनिक, सिव्हिल तसेच इलेक्ट्राॅनिक्स विषयाचे एकूण सहा वर्ग आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा हा इलेक्ट्रिक, काॅम्प्युटर, मेकॅनिक, सिव्हिलच्या अभ्यासक्रमासाठी अधिक आहे. या वर्षीपासून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ‘मेकॅट्राॅनिक्स’ हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. शिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयही तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी जणू नवी संधी उपलब्ध झाली आहे. नोकरी, व्यवसायाच्या संधीमुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे.

विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमानंतर पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. शिवाय तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामुळे पदवीच्या अभ्यासक्रमाचा पाया भक्कम होतो. दहा टक्के मुले मात्र नोकरी, व्यवसायाकडे वळतात.

- ए.एम. जाधव, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रत्नागिरी

व्यवसाय/नोकरीसह शिक्षणाचीही संधी

बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागते. सीईटीचे गुण ग्राह्य धरले जातात. त्यापेक्षा दहावीनंतर तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यास थेट पदवीच्या दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो. सीईटी परीक्षेपेक्षा हा मार्ग सोपा आहे. शिवाय पुढील अभ्यासक्रमही सोपा जातो.

- अमान फोंडू, पावस

पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसाय/नोकरीची संधी उपलब्ध होते. महाविद्यालय परिसरातच कॅम्पस मुलाखती होत असतात. विविध नामवंत कंपन्या मुलाखतीसाठी येत असल्याने नोकरीची संधी उपलब्ध होते. नोकरी, व्यवसायाऐवजी पुढील शिक्षणाचीही संधी असल्याने तंत्रनिकेतन अभ्यासक्रम योग्य मार्ग आहे.

- सिद्धेश पाटील, रत्नागिरी

रोजगार, काैशल्याभिमुख शिक्षण यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आयटी, ईएनटीसी अभ्यासक्रम फायदेशीर आहे. पदविका अभ्यासक्रमामुळे रोजगाराची संधी तर आहे, शिवाय कमी खर्चात पूर्ण होणारा अभ्यासक्रम आहे. लहानपणापासून अभियंता बनण्याचे स्वप्न भविष्यात या माध्यमातून पूर्ण होणार आहे.

- स्वप्नाली रसाळ, जयगड

रोजगाराची हमी

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात ऑनलाइन, डिजिटलचे महत्त्व वाढले आहे. भविष्याचा वेध घेत अनेक विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिक, संगणक, मेकॅट्राॅनिक्स विषयासाठी विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यानंतर मेकॅनिक, सिव्हिल अभ्यासक्रमासाठी पसंती दर्शविली आहे. एकूण ४८० जागांसाठी ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.

पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश सुलभ होतो. बारावीनंतर प्रवेश घेताना ‘सीईटी’ परीक्षा द्यावी लागते. बारावी परीक्षेत कितीही गुणवत्ता असली तरी सीईटीचे गुणांकन ग्राह्य धरले जात असल्यामुळे पदविकेनंतर थेट पदवीच्या दुसऱ्या वर्षालाच प्रवेश मिळतो. शिवाय तीन वर्षांत अभ्यासक्रम सुलभ होतो.

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एकूण वर्ग असून प्रत्येक वर्गासाठी ६० मिळून एकूण ४८० प्रवेश क्षमता आहे. ११२६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.