शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या आयत्या निधीवर शिवसेनेचा नागोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST

संदीप बांद्रे / चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलासाठी केंद्र शासनाने निधी दिला असून, त्यासाठी केंद्रीय दळणवळण ...

संदीप बांद्रे / चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलासाठी केंद्र शासनाने निधी दिला असून, त्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व नारायण राणे यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. त्यांच्या या प्रयत्नातून झालेल्या या पुलाचे उद्घाटन करण्याचे अधिकार केवळ त्यांनाच आहेत. हा कोणत्याही पक्षाचा विषय नसून तो केंद्राचा विषय आहे. तेव्हा केंद्राच्या निधीवर शिवसेनेचा नागोबा कितीही वळवळला, तरी शिवसेनेने आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊ नये, असा टोला भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी लगावला आहे.

मुंबई - गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे चौपदरीकरणांतर्गत काम सुरू आहे. त्यातील एकेरी मार्ग नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत फित कापून शनिवारी हा मार्ग खुला करण्यात आला. यावेळी आमदार भास्कर जाधव, शेखर निकम तसेच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याला भाजपचे पदाधिकारी अनुपस्थित होते. त्यांना कोणत्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे वाशिष्ठी पुलाच्या उद्घाटनाविषयी भाजपकडून कडवी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाजप शहराध्यक्ष अशिष खातू व तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी शिवसेनेच्या या कार्यक्रमाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपला या कार्यक्रमातून जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप केला आहे. आता त्यानंतर भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. नातू यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत डॉ. नातू म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग हा विभाग पूर्णतः केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नारायण राणे यांनी केलेले प्रयत्न जनतेला ज्ञात आहेत. त्यामुळे या पुलाचे उद्घाटन करण्याचा अधिकार केवळ गडकरी व राणे यांनाच येतो. मात्र, शिवसेना केवळ श्रेयवाद लाटण्याच्या उद्देशाने परस्पर कार्यक्रम घेत असेल, तर तो आयजीच्या जीवावर बायजी उदार असेच म्हणावे लागेल. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने निधी दिला आहे. तो निधी योग्य पद्धतीने खर्च होत असताना या प्रकल्पाचा त्यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावाही केला जात आहे. मात्र, आता शिवसेनेला त्याचा विसर पडला आहे आणि केंद्राच्या निधीवर शिवसेनेचा नागोबा वळवळू पाहत आहे. मात्र, त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत. या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी व नारायण राणे यांच्याच हस्ते होऊ शकते, असेही डॉ. नातू यांनी सांगितले.

-----------------------------

केंद्रीय समितीचा अहवाल बाकी

मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात येत असलेल्या वाशिष्ठी पुलाच्या एकेरी मार्गाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, केंद्रीय समितीकडून या कामाविषयी कोणताही अहवाल देण्यात आलेला नाही तसेच अजूनही दुसऱ्या मार्गाचे काम अपूर्ण असून, येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करून तातडीने या कामाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, शिवसेना-भाजपमध्ये आतापासूनच या पुलावरून जोरदार राजकारण शिजू लागले आहे.