शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुंबईकर यावर्षीही गावापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काेकणात येणाऱ्यांना ई - पास बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांची ॲन्टिजेन ...

रत्नागिरी : काेराेनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काेकणात येणाऱ्यांना ई - पास बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत असून, क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. त्यातच रेल्वे प्रशासनाने गाड्याही रद्द केल्याने मुंबईकरांना गावी येणे सहजशक्य हाेणार नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईकरांना उन्हाळ्याची सुट्टी मुंबईतच घालवावी लागणार आहे.

मुलांच्या परीक्षा संपल्या की, उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर माेठ्या संख्येने गावी येतात. मुंबईकरांना गावी येण्यासाठी रेल्वेचा प्रवास सुखकर वाटत असल्याने या हंगामात रेल्वे गाड्यांचे आरक्षणही फुल्ल हाेऊन जाते. काेकण रेल्वे मार्गावरील गाड्याही प्रवाशांनी भरून वाहतात. मात्र, गेल्यावर्षीपासून राज्यात आलेल्या काेराेनाच्या संकटामुळे मुंबईकरांना गावी येणे शक्य झाले नव्हते. गावी येण्यासाठी अनेक निर्बंधांचे अडथळे पार करावे लागल्याने मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली हाेती. त्यातच गावी आल्यानंतर क्वारंटाईन व्हावे लागल्याने वादाचे प्रसंग निर्माण झाले हाेते.

कोरोनामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणात येण्यासाठीही कडक बंधने घालण्यात आली आहेत. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास बंधनकारक असून, जिल्ह्याच्या सीमेवर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणीही केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची, प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. तसेच कोकणात प्रवेश केल्यानंतर हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारत १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरही आता ठराविक गाड्या धावत असल्याने प्रवाशांची संख्याही घटली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या चार गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. काेकणात येताना निर्बंधांची शर्यत पार करावी लागणार आहे. या निर्बंधांमुळे मुंबईकरांनी गावी न येण्याचा निर्णय घेतला आहे.

गाड्या रद्द

एच निजामुद्दीन-मडगाव जंक्शन राजधानी सुपरफास्ट (गाडी क्रमांक ०२४१४) ही साप्ताहिक गाडी ३० एप्रिलपासून रद्द केली आहे. एच मडगाव जंक्शन-निजामुद्दीन सुपरफास्ट (क्रमांक ०२४१३) २ मेपासून, करमाळी-मुंबई सीएसएमटी तेजस सुपरफास्ट (क्रमांक ०२१२०) २८ एप्रिलपासूनच, मुंबई सीएसएमटी-करमाळी तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक ०२११९), मंगळूर-लोकमान्य टिळक टर्मिनस डेली सुपरफास्ट स्पेशल गाडी (क्रमांक ०२६२०), मडगाव जंक्शन-मंगळूर सेंट्रल आरक्षित गाडी एक्स्प्रेस विशेष गाडी (क्रमांक ०७१०७) आणि मंगळूर- मडगाव जंक्शन राखीव विशेष गाडी (क्रमांक ०७१०८) २९ एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर सेंट्रल डेली सुपरफास्ट गाडी (क्रमांक ०२६१९) ३० एप्रिलपासून रद्द केली आहे.