शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोकणातील मोठा उत्सव म्हणजे शिमगा. होळीच्या सणासाठी कोरोनाचे ‘हाॅटस्पाॅट’ असलेल्या मुंबई- पुणे यांसारख्या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे ...

रत्नागिरी : कोकणातील मोठा उत्सव म्हणजे शिमगा. होळीच्या सणासाठी कोरोनाचे ‘हाॅटस्पाॅट’ असलेल्या मुंबई- पुणे यांसारख्या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. या वाढत्या संख्येने जिल्ह्याची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणेची पुन्हा रात्रंदिवस धावपळ सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी येणार, त्यामुळे रुग्ण वाढणार, ही शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त होत होती. तसेच कामानिमित्त पुणे-मुंबई या शहरांमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. होळीसाठी कोकण रेल्वे, तसेच एस.टी. बस, खासगी गाड्यांमधून आलेल्या नागरिकांमुळे आता काेरोना रुग्णांची संख्या वाढली असून १५ दिवसांत ८०० रुग्ण वाढले आहेत.

बाहेरगावातून येणारे चाचणीबाबत उदासीन

* कोकण रेल्वेने येणाऱ्या लोकांची रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकावर सुरुवातीला चाचणी करण्यात येत होती. मात्र, होळीच्या काळात कुठल्याही स्थानकावर चाचणी होत नाही.

* बसमधून येणाऱ्या नागरिकांबाबतही हीच स्थिती आहे. त्यामुळे एस स्थानकांवरही कुठेच चाचणी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकर थेट आपल्या घरी विनाचाचणी पोहोचले.

* खासगी वाहने तसेच ट्रॅव्हलर्समधून येणाऱ्या नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या सर्च नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून त्याबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही.

मुंबई-पुणे आदी भागातून दररोज सुमारे ४५०० प्रवासी जिल्हाभरात आले

एसटी बस

एस.टी. महामंडळाने होळीसाठी १६५ गाड्या सोडल्या होत्या. यातून सुमारे १०,००० व्यक्ती जिल्ह्यात आल्या.

ट्रॅव्हल्स, खासगी वाहने

आवडत्या होळी सणासाठी खासगी वाहने तसेच टॅव्हलर्स यामधून येणाऱ्यांची संख्या १२ ते १५ हजार इतकी होती.

कोकण रेल्वे

शिमगोत्सवात कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्याने या गाड्यांमधून सुमारे २० हजार नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले.