शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोकणातील मोठा उत्सव म्हणजे शिमगा. होळीच्या सणासाठी कोरोनाचे ‘हाॅटस्पाॅट’ असलेल्या मुंबई- पुणे यांसारख्या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे ...

रत्नागिरी : कोकणातील मोठा उत्सव म्हणजे शिमगा. होळीच्या सणासाठी कोरोनाचे ‘हाॅटस्पाॅट’ असलेल्या मुंबई- पुणे यांसारख्या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. या वाढत्या संख्येने जिल्ह्याची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणेची पुन्हा रात्रंदिवस धावपळ सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी येणार, त्यामुळे रुग्ण वाढणार, ही शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त होत होती. तसेच कामानिमित्त पुणे-मुंबई या शहरांमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. होळीसाठी कोकण रेल्वे, तसेच एस.टी. बस, खासगी गाड्यांमधून आलेल्या नागरिकांमुळे आता काेरोना रुग्णांची संख्या वाढली असून १५ दिवसांत ८०० रुग्ण वाढले आहेत.

बाहेरगावातून येणारे चाचणीबाबत उदासीन

* कोकण रेल्वेने येणाऱ्या लोकांची रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकावर सुरुवातीला चाचणी करण्यात येत होती. मात्र, होळीच्या काळात कुठल्याही स्थानकावर चाचणी होत नाही.

* बसमधून येणाऱ्या नागरिकांबाबतही हीच स्थिती आहे. त्यामुळे एस स्थानकांवरही कुठेच चाचणी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकर थेट आपल्या घरी विनाचाचणी पोहोचले.

* खासगी वाहने तसेच ट्रॅव्हलर्समधून येणाऱ्या नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या सर्च नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून त्याबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही.

मुंबई-पुणे आदी भागातून दररोज सुमारे ४५०० प्रवासी जिल्हाभरात आले

एसटी बस

एस.टी. महामंडळाने होळीसाठी १६५ गाड्या सोडल्या होत्या. यातून सुमारे १०,००० व्यक्ती जिल्ह्यात आल्या.

ट्रॅव्हल्स, खासगी वाहने

आवडत्या होळी सणासाठी खासगी वाहने तसेच टॅव्हलर्स यामधून येणाऱ्यांची संख्या १२ ते १५ हजार इतकी होती.

कोकण रेल्वे

शिमगोत्सवात कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्याने या गाड्यांमधून सुमारे २० हजार नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले.