शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्ग रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:00 IST

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व ...

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व खेडमध्येही जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीनमालकांनी चौपदरीकरणाच्या कामाला विरोध केल्याने अनेक ठिकाणी काम बंद पडलेले आहे. निवडणुकीच्या काळात चौपदरीकरण कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. अपूर्ण स्थितीत भराव ओढलेला असून, पावसाळ्यात ओढ्यांच्या येणाऱ्या पाण्याला वाव करून दिलेला नाही. त्यामुळे पाणी मुख्य रस्त्यावर येणार आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात महामार्ग वाहनचालकांना रडविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील खेड व चिपळूण विभागात काही भागवगळता वेगाने काम सुरू झाले. रत्नागिरी विभागातील आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमध्ये वर्षभर काम रखडले. आता रस्ता रुंद करण्याचे, कटिंग्ज काढण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणासाठी कापलेल्या डोंगराच्या कडांमुळे माती महामार्गावर आली आहे. ही माती रुंदीकरणासाठी पसरण्यात आली आहे. कटिंग्ज काढली असली तरी पावसाळ्यात माती फुगून दरडी रस्त्यावर कोसळण्याची भीती आहे.उपाययोजना आवश्यकमहामार्ग चौपदरीकरणाचे अपुरे काम, पसरलेली माती, महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्यात अपघात होऊ नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना चौपदरीकरणातील ठेकेदार तसेच महामार्ग विभागाने कराव्यात, अशी मागणी होत आहे.आरवली ते वाकेडपर्यंत केवळ १० टक्केचजिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कांटे व बावनदी ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांचे काम खूपच रेंगाळले आहे. जेमतेम १० टक्के काम झाले आहे. जिल्ह्यात अन्यत्र ५० टक्के काम झाले आहे. हे काम वेग कधी घेणार? असा सवाल आता करण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी विभागातील मंद कामामुळे या दोन टप्प्यांच्या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्शन घेण्यात आली आहेत.जमीनमालकांचा इशारामहामार्ग प्रकल्पासाठी जमीनमालकांना आतापर्यंत खेडमध्ये ३५० कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र, अद्याप १०० कोटींचा मोबदला देणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांनी आपल्या जमिनीमध्ये ठेकेदाराला काम करू देण्यास विरोध केला आहे. जमीन मालकांच्या विरोधामुळे भरणे, भोस्ते, लोटे, वेरळ भागात चौपदरीकरण काम रखडले आहे. मुसळधार पडणाºया पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.