शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्ग रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:00 IST

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व ...

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडवगळता चौपदरीकरण काम संथ गतीने सुरू आहे. चिपळूण व खेडमध्येही जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीनमालकांनी चौपदरीकरणाच्या कामाला विरोध केल्याने अनेक ठिकाणी काम बंद पडलेले आहे. निवडणुकीच्या काळात चौपदरीकरण कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. अपूर्ण स्थितीत भराव ओढलेला असून, पावसाळ्यात ओढ्यांच्या येणाऱ्या पाण्याला वाव करून दिलेला नाही. त्यामुळे पाणी मुख्य रस्त्यावर येणार आहे. अनेक ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात महामार्ग वाहनचालकांना रडविण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील खेड व चिपळूण विभागात काही भागवगळता वेगाने काम सुरू झाले. रत्नागिरी विभागातील आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमध्ये वर्षभर काम रखडले. आता रस्ता रुंद करण्याचे, कटिंग्ज काढण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरणासाठी कापलेल्या डोंगराच्या कडांमुळे माती महामार्गावर आली आहे. ही माती रुंदीकरणासाठी पसरण्यात आली आहे. कटिंग्ज काढली असली तरी पावसाळ्यात माती फुगून दरडी रस्त्यावर कोसळण्याची भीती आहे.उपाययोजना आवश्यकमहामार्ग चौपदरीकरणाचे अपुरे काम, पसरलेली माती, महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाळ्यात अपघात होऊ नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना चौपदरीकरणातील ठेकेदार तसेच महामार्ग विभागाने कराव्यात, अशी मागणी होत आहे.आरवली ते वाकेडपर्यंत केवळ १० टक्केचजिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कांटे व बावनदी ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांचे काम खूपच रेंगाळले आहे. जेमतेम १० टक्के काम झाले आहे. जिल्ह्यात अन्यत्र ५० टक्के काम झाले आहे. हे काम वेग कधी घेणार? असा सवाल आता करण्यात येत आहे. मात्र, रत्नागिरी विभागातील मंद कामामुळे या दोन टप्प्यांच्या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक ठिकाणी डायव्हर्शन घेण्यात आली आहेत.जमीनमालकांचा इशारामहामार्ग प्रकल्पासाठी जमीनमालकांना आतापर्यंत खेडमध्ये ३५० कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र, अद्याप १०० कोटींचा मोबदला देणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांनी आपल्या जमिनीमध्ये ठेकेदाराला काम करू देण्यास विरोध केला आहे. जमीन मालकांच्या विरोधामुळे भरणे, भोस्ते, लोटे, वेरळ भागात चौपदरीकरण काम रखडले आहे. मुसळधार पडणाºया पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.