शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात, परीक्षांच्या तारखांचा लागला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षाच घेण्यात ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षाच घेण्यात आलेल्या नाहीत. शासकीय वर्ग १ व २ पदासाठी तयारी करणारे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असले तरी परीक्षेला विलंब होत असल्याने चिंताग्रस्त झाले आहेत.

कोरोनामुळे गेले दीड वर्षे स्पर्धा परीक्षा न घेता, तारखा जाहीर करण्यात आल्या. अभ्यासासाठी मार्गदर्शन वर्ग ऑनलाईन सुरू आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या भासत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गाचा फायदा होत नाही. शिक्षणात सातत्य राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन वेळेवर होत नाही. एकतर्फी शिक्षण शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

स्पर्धा परीक्षांच्या वेळोवेळी तारखा बदलण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय मात्र वाढत आहे. शासकीय अधिकारी पदाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा होत नसल्याने वाढत्या वयामुळे चिंतेने ग्रासले आहे. त्यामुळे मुलांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गरीब, होतकरू विद्यार्थी बेताच्या परिस्थितीमुळे तसेच वाढत्या खर्चामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने स्पर्धा परीक्षांच्या तारखा घोषित करून ऑफलाईन वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी होत आहे.

तारखा केव्हा जाहीर होणार

- पीएसआय, एसटीआय असिस्टंट, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक

- कर सहाय्यक, लिपिक, टंकलेखक

- सरळसेवा भरतीअंतर्गत महिला व बालविकास विभागातील समाजकल्याण निरीक्षक

- पोलीस भरती, परिवहन अधिकारी

शासकीय नोकरी मिळविण्याच्या ओढ्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत. मर्यादित पदांसाठी हजारो विद्यार्थी परीक्षा देत असतात. काही नैराश्यामुळे ग्रासले जातात. वास्तविक संविधानिक आयोग असताना स्पर्धा परीक्षेत राजकारण आणलं जात आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा, मुलाखती वेळेवर व्हाव्यात.

- प्रा. इंदुमती मलुष्टे

स्पर्धा परीक्षांना जेवढा विलंब होईल तेवढाच मुलांमधील आत्मविश्वासही कमी होण्याचा धोका आहे. स्पर्धा परीक्षा आयोगावरील विश्वास कमी झाला तर मुलांमध्ये नैराश्य निर्माण होईल. वास्तविक शासकीय नोकरीत अनेक पदे रिक्त असून सरळ सेवा भरती, किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जावीत. यासाठी परीक्षा होणे गरजेचे आहे.

- प्रा. आर. आर. पाटील

एमपीएससीद्वारे होणारी पदभरती असो वा शिक्षक, पोलीस, तलाठी, ग्रमासेवक या पदांसाठी भरती होईल या आशेवर मुले अभ्यास करत आहेत. मात्र, पद भरती न करता शासन ‘तारीख पे तारीख’ जाहीर करत आहे. शिक्षक भरती प्रक्रिया तब्बल तीन वर्षे रखडली असल्याने तरुणांत नैराश्य आले आहे.

- भाग्यश्री रेवडेकर, परीक्षार्थी

कोरोना, आरक्षण, बिंदू नामावली तर कधी निधी शिल्लक नाही, अशी कारणे देऊन पद भरतीसाठी शासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे उमेदवारांची वयोमर्यादा उलटून जात असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये नैराश्य वाढले आहे. काही उमेदवार आत्महत्येचा मार्ग कवटाळत आहेत. एमपीएएसीद्वारे महिनाअखेर पदभरतीचे आश्वासन शासन पाळेल का?

- राहुल खरात, परीक्षार्थी

स्पर्धा परीक्षेसाठी रत्नागिरी शहर व जिल्ह्यात मोजकेच वर्ग असून सध्या ऑनलाईन मार्गदर्शन सुरू आहे. जिल्ह्यातून अडीच ते तीन हजार विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत.

रत्नागिरी शहरात स्पर्धा परीक्षेसाठी मोजकेच वर्ग असल्याने काही विद्यार्थी पुणे, मुंबई, कोल्हापूरसारखे शहर गाठत असून तेथे वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. घराबाहेर राहून खर्च वाढत आहे.

कोरोनामुळे गेले दीड वर्ष ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. त्यामुळे शहराबाहेर गेलेले विद्यार्थी घरी परतले आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्यामुळे मुलांचे नुकसान होत आहे.

नेटवर्कअभावी मार्गदर्शन वर्गात खंड पडत आहे. इंटरनेट, वायफायसाठीचा खर्च वाढत आहे. शासनाने आता तरी स्पर्धा परीक्षा वेळेवर घेऊन पदभरती करावी तसेच ऑफलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देऊन मुलांचे नुकसान टाळावे.