शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुस्लिम समाजाचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

By admin | Updated: October 18, 2016 23:56 IST

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी

रत्नागिरी : मराठा समाजाप्रमाणेच आता मुस्लिम समाजही आरक्षणासाठी जागरूक झाला आहे. मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय मुस्लिम समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात मागे राहिल्याने या समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने न्या. राजेंद्र सच्चर आयोग, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्त केलेली महमुर्दर रहेमान कमिटी या सर्व आयोग व कमिट्यांनी मुस्लिम समाजाच्या स्थितीची पाहणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची शिफारस केली होती. या शिफारशींची दखल घेत शासनाने मराठा समाजासाठी १६ टक्के आणि मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची निश्चिती केली होती. उच्च न्यायालयाने कायद्याच्या कसोटीवर पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजासाठी वैध ठरविले होते; परंतु या आरक्षणासंदर्भात अध्यादेशाची कालमर्यादा संपूनदेखील शासनाने कुठलीही पावले उचलली नाहीत. मुस्लिम समाज शिक्षण प्रवाहापासून वंचित असून, हलाखीचे जीवन जगत आहे. म्हणून आम्हाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यासाठी जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मुस्लिम बांधवांनी केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मुफ्ती तौफीक आणि मौलाना ठाकूर यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात रत्नागिरी शहर आणि परिसरातील शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात अशरफ नाईक, अशफाक काझी, बशीर मुर्तुजा, शकील मजगावकर, अलिमियाँ काझी, शकील मुर्तुजा, शकूर मौलाना, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)