शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

कामगार संघटनांचे आंदोलन १८पासून

By admin | Updated: September 7, 2014 23:56 IST

कोळशाचा तुटवडा : भारनियमनाचा धोका अटळ

रत्नागिरी : कोळशाचा तुटवडा भासत असतानाच कोल इंडिया कंपनीच्या कामगार संघटनांनी १८ सप्टेंबरपासून नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारनियमनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.देशातील वीजनिर्मिती कोळसा व पाण्यावर सुरु आहे. वीजनिर्मिती करणारे एकूण १०० प्रकल्प आहेत. ८० वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. ५६ प्रकल्पांमध्ये केवळ सात दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व्यवस्थापन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. देशातील वीज प्रकल्पांना कोल इंडिया कंपनीतून वीजपुरवठा केला जातो. या कंपनीच्या कोळशाच्या खाणी मोकळ्या जागेमध्ये असल्याने सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी खाणीमध्ये जमा झाले आहे. परिणामी कोळसा पुरवठा करणे कंपनीस अशक्य झाले आहे.छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड, ओरिसा या वीज प्रकल्पांची अवस्था कोळशाअभावी विदारक बनली आहे. ३४ प्रकल्पांमध्ये २१ दिवसांचा साठा शिल्लक आहे. उर्वरित ५६ प्रकल्पांमध्ये सात दिवसांचा साठा शिल्लक राहिला आहे. विदेशातून कोळसा खरेदी आर्थिक भुर्दंडास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे देशासमोर वीजनिर्मितीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच अपुरा कोळसासाठा यामुळे कोल इंडिया कंपनीच्या कामगारांनी १८ सप्टेंबरपासून नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वीजनिर्मिती करणारे १४ प्रकल्प आहेत. त्यातील सात प्रकल्प महानिर्मितीचे आहेत. या प्रकल्पांमध्ये वीस दिवसांचा कोळसा साठा आवश्यक असताना अत्यल्प कोळसा साठा असल्याने वीजनिर्मितीचे संच वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे राज्याची विजेची मागणी पूर्ण करताना महावितरणला फार मोठी कसरत करावी लागत आहेकामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कोळसा काढण्याच्या कामावर परिणाम होणार आहे. त्यामुळे भीषणता जाणवणार असून, देशापुढे विजेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे भारनियमनाचे संकट अटळ आहे. (प्रतिनिधी)