शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कामगार संघटनांचे आंदोलन १८पासून

By admin | Updated: September 7, 2014 23:56 IST

कोळशाचा तुटवडा : भारनियमनाचा धोका अटळ

रत्नागिरी : कोळशाचा तुटवडा भासत असतानाच कोल इंडिया कंपनीच्या कामगार संघटनांनी १८ सप्टेंबरपासून नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारनियमनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.देशातील वीजनिर्मिती कोळसा व पाण्यावर सुरु आहे. वीजनिर्मिती करणारे एकूण १०० प्रकल्प आहेत. ८० वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. ५६ प्रकल्पांमध्ये केवळ सात दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व्यवस्थापन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. देशातील वीज प्रकल्पांना कोल इंडिया कंपनीतून वीजपुरवठा केला जातो. या कंपनीच्या कोळशाच्या खाणी मोकळ्या जागेमध्ये असल्याने सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी खाणीमध्ये जमा झाले आहे. परिणामी कोळसा पुरवठा करणे कंपनीस अशक्य झाले आहे.छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड, ओरिसा या वीज प्रकल्पांची अवस्था कोळशाअभावी विदारक बनली आहे. ३४ प्रकल्पांमध्ये २१ दिवसांचा साठा शिल्लक आहे. उर्वरित ५६ प्रकल्पांमध्ये सात दिवसांचा साठा शिल्लक राहिला आहे. विदेशातून कोळसा खरेदी आर्थिक भुर्दंडास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे देशासमोर वीजनिर्मितीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच अपुरा कोळसासाठा यामुळे कोल इंडिया कंपनीच्या कामगारांनी १८ सप्टेंबरपासून नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वीजनिर्मिती करणारे १४ प्रकल्प आहेत. त्यातील सात प्रकल्प महानिर्मितीचे आहेत. या प्रकल्पांमध्ये वीस दिवसांचा कोळसा साठा आवश्यक असताना अत्यल्प कोळसा साठा असल्याने वीजनिर्मितीचे संच वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे राज्याची विजेची मागणी पूर्ण करताना महावितरणला फार मोठी कसरत करावी लागत आहेकामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कोळसा काढण्याच्या कामावर परिणाम होणार आहे. त्यामुळे भीषणता जाणवणार असून, देशापुढे विजेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे भारनियमनाचे संकट अटळ आहे. (प्रतिनिधी)