शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संघटनांचे आंदोलन १८पासून

By admin | Updated: September 7, 2014 23:56 IST

कोळशाचा तुटवडा : भारनियमनाचा धोका अटळ

रत्नागिरी : कोळशाचा तुटवडा भासत असतानाच कोल इंडिया कंपनीच्या कामगार संघटनांनी १८ सप्टेंबरपासून नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारनियमनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.देशातील वीजनिर्मिती कोळसा व पाण्यावर सुरु आहे. वीजनिर्मिती करणारे एकूण १०० प्रकल्प आहेत. ८० वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. ५६ प्रकल्पांमध्ये केवळ सात दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व्यवस्थापन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. देशातील वीज प्रकल्पांना कोल इंडिया कंपनीतून वीजपुरवठा केला जातो. या कंपनीच्या कोळशाच्या खाणी मोकळ्या जागेमध्ये असल्याने सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी खाणीमध्ये जमा झाले आहे. परिणामी कोळसा पुरवठा करणे कंपनीस अशक्य झाले आहे.छत्तीसगड, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, बिहार, झारखंड, ओरिसा या वीज प्रकल्पांची अवस्था कोळशाअभावी विदारक बनली आहे. ३४ प्रकल्पांमध्ये २१ दिवसांचा साठा शिल्लक आहे. उर्वरित ५६ प्रकल्पांमध्ये सात दिवसांचा साठा शिल्लक राहिला आहे. विदेशातून कोळसा खरेदी आर्थिक भुर्दंडास कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे देशासमोर वीजनिर्मितीचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यातच अपुरा कोळसासाठा यामुळे कोल इंडिया कंपनीच्या कामगारांनी १८ सप्टेंबरपासून नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात वीजनिर्मिती करणारे १४ प्रकल्प आहेत. त्यातील सात प्रकल्प महानिर्मितीचे आहेत. या प्रकल्पांमध्ये वीस दिवसांचा कोळसा साठा आवश्यक असताना अत्यल्प कोळसा साठा असल्याने वीजनिर्मितीचे संच वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे राज्याची विजेची मागणी पूर्ण करताना महावितरणला फार मोठी कसरत करावी लागत आहेकामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कोळसा काढण्याच्या कामावर परिणाम होणार आहे. त्यामुळे भीषणता जाणवणार असून, देशापुढे विजेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे भारनियमनाचे संकट अटळ आहे. (प्रतिनिधी)