शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भाट्ये खाडीचे मुख भरले गाळाने, मच्छिमारांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी ...

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी असलेला हा मार्ग मच्छिमारांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा गाळ उपसावा, अशी मागणी मच्छिमारांकडून पुढे येत आहे.

जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे अवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करून ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छिमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न नेहमीच मच्छिमारांना सतावत राहिलेला आहे.

भाट्ये खाडीच्या आसपास असलेल्या राजीवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमध्ये मच्छिमार राहतात. या गावांमध्ये हजारो लोक मच्छिमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील कुटुंबीय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे.

मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गेली कित्येक वर्षे गाळच उपसलेला नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छिमारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. मासेमारी नौका बुडाल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते.

या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणूनही डोळेझाक केली जात आहे.

काेट

भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे तसेच येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मच्छिमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मासेमारीसाठी जाण्याचा मार्गच बंद होणार आहे.

- शब्बीर भाटकर

माजी चेअरमन, रत्नागिरी मच्छिमार सहकारी सोसायटी, राजीवडा.