शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

भाट्ये खाडीचे मुख भरले गाळाने, मच्छिमारांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी ...

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी असलेला हा मार्ग मच्छिमारांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा गाळ उपसावा, अशी मागणी मच्छिमारांकडून पुढे येत आहे.

जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे अवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करून ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छिमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न नेहमीच मच्छिमारांना सतावत राहिलेला आहे.

भाट्ये खाडीच्या आसपास असलेल्या राजीवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमध्ये मच्छिमार राहतात. या गावांमध्ये हजारो लोक मच्छिमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील कुटुंबीय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे.

मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गेली कित्येक वर्षे गाळच उपसलेला नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छिमारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. मासेमारी नौका बुडाल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते.

या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणूनही डोळेझाक केली जात आहे.

काेट

भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे तसेच येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मच्छिमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मासेमारीसाठी जाण्याचा मार्गच बंद होणार आहे.

- शब्बीर भाटकर

माजी चेअरमन, रत्नागिरी मच्छिमार सहकारी सोसायटी, राजीवडा.