शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

भाट्ये खाडीचे मुख भरले गाळाने, मच्छिमारांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी ...

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचला आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी असलेला हा मार्ग मच्छिमारांसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा गाळ उपसावा, अशी मागणी मच्छिमारांकडून पुढे येत आहे.

जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे अवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करून ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छिमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार, असा प्रश्न नेहमीच मच्छिमारांना सतावत राहिलेला आहे.

भाट्ये खाडीच्या आसपास असलेल्या राजीवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमध्ये मच्छिमार राहतात. या गावांमध्ये हजारो लोक मच्छिमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील कुटुंबीय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे.

मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गेली कित्येक वर्षे गाळच उपसलेला नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छिमारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. मासेमारी नौका बुडाल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते.

या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणूनही डोळेझाक केली जात आहे.

काेट

भाट्ये खाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे तसेच येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत मच्छिमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मासेमारीसाठी जाण्याचा मार्गच बंद होणार आहे.

- शब्बीर भाटकर

माजी चेअरमन, रत्नागिरी मच्छिमार सहकारी सोसायटी, राजीवडा.