शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

पहिल्या अपत्यासाठी मातांना मिळणार पाच हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ सन २०१७ पासून देशभर राबविण्यात येत आहे. माता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ सन २०१७ पासून देशभर राबविण्यात येत आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेच्या लाभार्थी मातेच्या पहिल्या अपत्यासाठी बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या या योजनेअंतर्गत १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहात तब्बल ३३८ माता या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री मातृ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना या योजनेची माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३,३४० आणि शहरी भागातील २६,५५७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

मातृ वंदना सप्ताहाचा लाभ देण्यासाठी आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन कागदपत्रे गोळा करीत आहेत.

तीन टप्प्यात मिळणार पैसे

गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळतो. प्रसूतिपूर्व किमान एकदा तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये जमा होतात.

प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यावर २ हजार रुपयांचा तिसरा हप्ता जमा केला जातो.

पात्रतेचे निकष काय...

- शासकीय सेवेत असणाऱ्या महिलांना वगळता समाजातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

- पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील. पहिल्या जीवित अपत्यापुरताच या योजनेचा लाभ घेता येतो.

लाभासाठी कोठे करायचा संपर्क...

- योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका किंवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधता येतो.

- लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधारकार्डशी जोडलेले बँक खाते आवश्यक आहे.

- गरोदरपणाची नोंदणी शासकीय आरोग्य संस्थेत १०० दिवसांच्या आत, तसेच बाळाची जन्मनोंदणी दाखल व प्राथमिक लसीकरण नोंदणी केल्यावर योजनेचा पूर्ण लाभ घेता येतो.

मातृवंदना योजना केंद्र सरकारतर्फे राबविली जाते. ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागातही राबविण्यात येत आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१७ किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली असेल, अशा मातांना या योजनेचा लाभ दिला जातो. गेल्या ४ वर्षात ग्रामीण भागात २३,३४० मातांना ९ कोटी ९४ लाख ३ हजार, तर शहरी भागात २६,४५७ मातांना ११ कोटी २६ लाख ५४ हजार, इतका लाभ देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृ वंदना योजना सप्ताह राबविला जात आहे. ही योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण डुब्बेवार प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आरोग्य सभापती उदय बने यांचे सहकार्य लाभत आहे.

लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृ वंदना विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रे याठिकाणी माहितीपत्रके ठेवण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा.

- डाॅ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी