शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षात वाढले तब्बल दीड लाख ग्राहक

By admin | Updated: February 25, 2015 00:13 IST

महावितरण कंपनी : महसुली उत्पादनातही झाली अडीचपट वाढ

मेहरून नाकाडे-  रत्नागिरी   जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी इमारतींची संख्या वाढत असल्याने नवीन घरांसाठी विजेच्या मीटरची मागणी वाढत आहे. २००२ साली जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या ३ लाख ६५ हजार २५० इतकी होती. २०१४ अखेर वीज ग्राहकांची संख्या ४ लाख ५७ हजार ४२८ इतकी झाली आहे. गेल्या बारा वर्षात १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असलेली दिसून येत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये महावितरणचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अपार्टमेंटसची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात सन २००२ मध्ये घरगुती ग्राहक ३ लाख २५ हजार ५२१, कृषिपंप १०,७८१, औद्योगिक ५४२५, सार्वजनिक पथदीप ८१८, तर अन्य ग्राहक १२६० इतके होते. २०१४मध्ये ही संख्या वाढलेली दिसून येत आहे. २०१४ मध्ये घरगुती ग्राहक ४ लाख ४ हजार ६९९, वाणिज्य २८ हजार २०३, औद्योगिक ५५३७, कृषिपंप १२९५, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २०८३ ग्राहक आहेत. १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक बारा वर्षात वाढलेले दिसून येत आहेत. ग्राहकांकडून वीज मीटरची मागणी वाढत असल्यामुळे २००२मध्ये जिल्ह्याला १४७ मेगावॅट इतकी वीज लागत असे. परंतु आता जिल्ह्याला १८० ते १८५ मेगावॅट इतकी वीज लागत आहे.वीज ग्राहक वाढल्यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलातही वाढ झालेली दिसून येत आहे. सन २००२मध्ये वर्षाला १७० कोटी असलेला महसूल आता ४९८ कोटी इतका झाला आहे. एकूणच महावितरणचा विस्तार वाढत असल्याचे दिसून येत आहे.सेकंड होम्स्च्या संकल्पनेमुळे जिल्ह्यात घरांची संख्या वाढत आहे. घरे वाढल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्षाला साडेतीन ते चार हजाराने ग्राहकांची संख्या वाढत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.महावितरणकडून महिन्याला वीजबिल देण्यात येत असल्याने दरमहा आॅनलाईन, एटीपी तसेच वीजबिल केंद्रावर वीजबिल भरले जाते. त्यामुळे महावितरणचा दरमहा कोट्यवधीचा महसूल गोळा होतो. वीजबिल थकबाकीदारांवर कारवाई करताना वीजपुरवठाच खंडित केला जातो. शिवाय ग्राहकांकडून दंडही वसूल केला जातो. मार्चअखेरीस वसूली पूर्ण करण्यासाठी तर खास पथक कार्यरत असते.शेतीपंपाची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कृषिपंपाचे १४ हजार ७२४ इतके ग्राहक आहेत. २००२ ते २००७ पर्यंतची कृषिपंपाची आकडेवारी महावितरण कंपनीकडून उपलब्ध झालेली नाही. मात्र, २००८पासून शेतीपंप जोडणी मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचे दिसून येते.वर्ष जोडण्या२००८११८३८२००९३८०२०१०३९३२०११४१४२०१२६२८२०१३५४५२०१४७९२