शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

बारा वर्षात वाढले तब्बल दीड लाख ग्राहक

By admin | Updated: February 25, 2015 00:13 IST

महावितरण कंपनी : महसुली उत्पादनातही झाली अडीचपट वाढ

मेहरून नाकाडे-  रत्नागिरी   जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी इमारतींची संख्या वाढत असल्याने नवीन घरांसाठी विजेच्या मीटरची मागणी वाढत आहे. २००२ साली जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या ३ लाख ६५ हजार २५० इतकी होती. २०१४ अखेर वीज ग्राहकांची संख्या ४ लाख ५७ हजार ४२८ इतकी झाली आहे. गेल्या बारा वर्षात १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असलेली दिसून येत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये महावितरणचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अपार्टमेंटसची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात सन २००२ मध्ये घरगुती ग्राहक ३ लाख २५ हजार ५२१, कृषिपंप १०,७८१, औद्योगिक ५४२५, सार्वजनिक पथदीप ८१८, तर अन्य ग्राहक १२६० इतके होते. २०१४मध्ये ही संख्या वाढलेली दिसून येत आहे. २०१४ मध्ये घरगुती ग्राहक ४ लाख ४ हजार ६९९, वाणिज्य २८ हजार २०३, औद्योगिक ५५३७, कृषिपंप १२९५, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २०८३ ग्राहक आहेत. १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक बारा वर्षात वाढलेले दिसून येत आहेत. ग्राहकांकडून वीज मीटरची मागणी वाढत असल्यामुळे २००२मध्ये जिल्ह्याला १४७ मेगावॅट इतकी वीज लागत असे. परंतु आता जिल्ह्याला १८० ते १८५ मेगावॅट इतकी वीज लागत आहे.वीज ग्राहक वाढल्यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलातही वाढ झालेली दिसून येत आहे. सन २००२मध्ये वर्षाला १७० कोटी असलेला महसूल आता ४९८ कोटी इतका झाला आहे. एकूणच महावितरणचा विस्तार वाढत असल्याचे दिसून येत आहे.सेकंड होम्स्च्या संकल्पनेमुळे जिल्ह्यात घरांची संख्या वाढत आहे. घरे वाढल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्षाला साडेतीन ते चार हजाराने ग्राहकांची संख्या वाढत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.महावितरणकडून महिन्याला वीजबिल देण्यात येत असल्याने दरमहा आॅनलाईन, एटीपी तसेच वीजबिल केंद्रावर वीजबिल भरले जाते. त्यामुळे महावितरणचा दरमहा कोट्यवधीचा महसूल गोळा होतो. वीजबिल थकबाकीदारांवर कारवाई करताना वीजपुरवठाच खंडित केला जातो. शिवाय ग्राहकांकडून दंडही वसूल केला जातो. मार्चअखेरीस वसूली पूर्ण करण्यासाठी तर खास पथक कार्यरत असते.शेतीपंपाची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कृषिपंपाचे १४ हजार ७२४ इतके ग्राहक आहेत. २००२ ते २००७ पर्यंतची कृषिपंपाची आकडेवारी महावितरण कंपनीकडून उपलब्ध झालेली नाही. मात्र, २००८पासून शेतीपंप जोडणी मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचे दिसून येते.वर्ष जोडण्या२००८११८३८२००९३८०२०१०३९३२०११४१४२०१२६२८२०१३५४५२०१४७९२