शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

बारा वर्षात वाढले तब्बल दीड लाख ग्राहक

By admin | Updated: February 25, 2015 00:13 IST

महावितरण कंपनी : महसुली उत्पादनातही झाली अडीचपट वाढ

मेहरून नाकाडे-  रत्नागिरी   जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी इमारतींची संख्या वाढत असल्याने नवीन घरांसाठी विजेच्या मीटरची मागणी वाढत आहे. २००२ साली जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या ३ लाख ६५ हजार २५० इतकी होती. २०१४ अखेर वीज ग्राहकांची संख्या ४ लाख ५७ हजार ४२८ इतकी झाली आहे. गेल्या बारा वर्षात १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असलेली दिसून येत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये महावितरणचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अपार्टमेंटसची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात सन २००२ मध्ये घरगुती ग्राहक ३ लाख २५ हजार ५२१, कृषिपंप १०,७८१, औद्योगिक ५४२५, सार्वजनिक पथदीप ८१८, तर अन्य ग्राहक १२६० इतके होते. २०१४मध्ये ही संख्या वाढलेली दिसून येत आहे. २०१४ मध्ये घरगुती ग्राहक ४ लाख ४ हजार ६९९, वाणिज्य २८ हजार २०३, औद्योगिक ५५३७, कृषिपंप १२९५, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २०८३ ग्राहक आहेत. १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक बारा वर्षात वाढलेले दिसून येत आहेत. ग्राहकांकडून वीज मीटरची मागणी वाढत असल्यामुळे २००२मध्ये जिल्ह्याला १४७ मेगावॅट इतकी वीज लागत असे. परंतु आता जिल्ह्याला १८० ते १८५ मेगावॅट इतकी वीज लागत आहे.वीज ग्राहक वाढल्यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलातही वाढ झालेली दिसून येत आहे. सन २००२मध्ये वर्षाला १७० कोटी असलेला महसूल आता ४९८ कोटी इतका झाला आहे. एकूणच महावितरणचा विस्तार वाढत असल्याचे दिसून येत आहे.सेकंड होम्स्च्या संकल्पनेमुळे जिल्ह्यात घरांची संख्या वाढत आहे. घरे वाढल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्षाला साडेतीन ते चार हजाराने ग्राहकांची संख्या वाढत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.महावितरणकडून महिन्याला वीजबिल देण्यात येत असल्याने दरमहा आॅनलाईन, एटीपी तसेच वीजबिल केंद्रावर वीजबिल भरले जाते. त्यामुळे महावितरणचा दरमहा कोट्यवधीचा महसूल गोळा होतो. वीजबिल थकबाकीदारांवर कारवाई करताना वीजपुरवठाच खंडित केला जातो. शिवाय ग्राहकांकडून दंडही वसूल केला जातो. मार्चअखेरीस वसूली पूर्ण करण्यासाठी तर खास पथक कार्यरत असते.शेतीपंपाची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कृषिपंपाचे १४ हजार ७२४ इतके ग्राहक आहेत. २००२ ते २००७ पर्यंतची कृषिपंपाची आकडेवारी महावितरण कंपनीकडून उपलब्ध झालेली नाही. मात्र, २००८पासून शेतीपंप जोडणी मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचे दिसून येते.वर्ष जोडण्या२००८११८३८२००९३८०२०१०३९३२०११४१४२०१२६२८२०१३५४५२०१४७९२