शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राजापुरातील पन्नासपेक्षा अधिक ग्रामपंचायतींचे रिफायनरीला समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : रिफायनरी प्रकल्पामध्ये राजापूर व देवगड तालुक्यांमधील तब्बल ४,०७४ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. राजापूर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : रिफायनरी प्रकल्पामध्ये राजापूर व देवगड तालुक्यांमधील तब्बल ४,०७४ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. राजापूर तालुक्यातील १०१पैकी तब्बल निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, यासाठी समर्थनपत्रे दिली आहेत. हे प्रकल्पाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाचे द्योतक आहे. आता शासन कोणता निर्णय घेते, यावर जसे प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे तसे ते तालुक्यात सक्रिय असलेल्या राजकीय पक्षांचेही आहे, अशी भूमिका रिफायनरी प्रकल्प समर्थक असलेल्या तीन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

त्यांनी म्हटले आहे की, प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी गेल्या पाच वर्षांत किती पर्यावरणपूरक उपक्रम आणले? कोणत्या पर्यटनपूरक योजना राबविल्या व कोकणात किती रोजगार निर्माण केला? पर्यावरणाची काळजी वाहणाऱ्या प्रकल्पविरोधकांनी मागील तीन ते पाच वर्षांत कोकणात किती वृक्ष लावले? अथवा पर्यावरण रक्षणाचे कोणते उपक्रम राबवले? फिनोलेक्स, जिंदल, अणुऊर्जा प्रकल्पासारख्या प्रकल्पांचे विरोधक तेथील जमीन अधिग्रहण पूर्ण झाल्यावर तिथली आंदोलने गुंडाळून रिफायनरी, आयलॉग जेटीविरोधी आंदोलनात का उतरले, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

रिफायनरी प्रकल्पांतर्गत नोकरी मिळण्यासाठी राजापूर व देवगड तालुक्यांमधील तब्बल ४,०७४ युवकांनी नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत. ही संख्या दररोज वाढत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी फुटकळ विरोधक घेणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. बारसू-सोलगाव भागात अजिबात विस्थापन नसताना व विस्तीर्ण कातळावर प्रकल्पासाठी पर्याय पुढे आलेला असताना ग्रामस्थांची घरे उठणार आहेत, हा जावईशोध कोणत्या लाकूडतोड प्रकल्प विरोधकाने लावला त्याने पुढे येऊन तालुक्याला सांगावे, असे आव्हानही या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

-----------------------------

विराेधकांना आव्हान

रिफायनरीमुळे सर्व परिसरात प्रदूषण होते, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर भारतात एकूण २३ रिफायनरी आहेत मग त्यांच्या नजीकच्या शहरांची नावे भारतातील प्रदूषित शहरांच्या यादीत का नाहीत? रिफायनरीमुळे मच्छीमारी संकटात सापडते, असे सांगितले जात आहे. मग भारतातील सर्व प्रमुख मच्छिमारी केंद्रे रिफायनरी असलेल्या बंदरातच कशी? रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे आंब्याच्या पिकाची अपरिमित हानी होईल, असे म्हणणाऱ्या विरोधकांनी जामनगर रिफायनरीच्या क्षेत्रात कोकणाच्या चारपट जास्त आंब्याचे उत्पादन कसे घेतले जाते, याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.