शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

कृषी पर्यटनावर अधिक भर

By admin | Updated: October 4, 2014 23:55 IST

विधानसभा निवडणूक : प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे जाहीरनामे प्रसिध्द

सुभाष कदम ल्ल चिपळूण चिपळूण विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार यंत्रणा रंगात आली असून उमेदवारांनी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. जवळजवळ सर्वच प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यात कृषी पर्यटनावर अधिक भर देण्यात आला आहे. चिपळूण विधानसभा मतदार संघात आता १० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, बहुजन समाजपक्ष, रिपब्लिकन सेना यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माधव गवळी, शिवसेनेचे उमेदवार आमदार सदांनद चव्हाण व रिपब्लिकन सेनेचे उमेदवार सुशांत जाधव हे उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत. पैकी राष्ट्रवादीचे निकम व भाजपाचे गवळी हे कृषी खात्याचे पदवीधर आहेत. आमदार चव्हाण हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. गवळी व निकम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यावर अधिक भर दिला आहे. कोकणात असलेल्या विपुल साधनसंपत्तीचा व नैसर्गिक वातावरणाचा पर्यटकांना आस्वाद घेता यावा. येथील पांरपारिक शेतीचा विकास व त्यातून होणारे पर्यटन शेतकऱ्याला पैसे मिळवून देतील यासाठी भाजपाचे माधव गवळी यांचे प्रयत्न आहेत. या भागात मगरींची संख्या वाढली आहे. यासाठी मगर संरक्षण प्रकल्प, ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संरक्षण, पुरातन मंदिरांचा विकास आदी बाबींवरही भाजपाचे गवळी यांनी भर दिला आहे. फळे व भाजीपाला प्रक्रिया महासंघाच्या विविध योजना कोकण रत्नभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी गावागावात पोहचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे गवळी यांची विकासाची दृष्टी शेतकऱ्यांना व मतदारांना आकृष्ट करणारी आहे. राष्ट्रवादीचे शेखर निकम यांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम आहे. शिक्षणाबरोबरच कृषी व कला महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. भविष्यातही या मतदारसंघाचा विकास करण्याबाबत आपल्या संकल्पना त्यांनी जाहीरनाम्यात मांडल्या आहेत. आमदार चव्हाण यांनी गेल्या ५ वर्षात केलेली विकासकामे, मतदार संघातील नव्याने करण्यात येणाऱ्या कामांवर प्रकाश टाकला आहे. परंतु, त्यांचा सारा भर आजही विकास कामांवर आहे. रिपब्लिकन सेनेच्या सुशांत जाधव यांनी बेरोजगारांना उद्योगधंदे करण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, मुली, महिला व वयोवृद्धांसाठी सुरक्षा व जनकल्याणकारी योजना, पुरुष बचतगटांसाठी आर्थिक सबलीकरण, शेतकऱ्यांसाठी प्रतिमहा पेन्शन, सुशिक्षित बेरोजगारांना बेकारी भत्ता याशिवाय बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक याचा पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले आहे. काँग्रेसच्या रश्मी कदम यांनीही आघाडी सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा ऊहापोह आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व कृषी पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दहाही उमेदवारांनी कृषी पर्यटन, शेती विकास, भौतिक गरजा व ग्रामीण विकासावर भर दिला आहे.