शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाने उडवली दाणादाण

By admin | Updated: June 12, 2017 01:19 IST

रस्ते जलमय : अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हावासीयांची दाणादाण उडवली आहे. पावसाच्या दणक्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेकठिकाणी झाडे मोडून रस्त्यावर पडल्याने वाहतूक खोळंबली आहे. वादळी वाऱ्याने काही गोठ्यांचेही नुकसान झाले. चिपळूण-मिरजोळी ग्रामपंचायत कार्यालयाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात कागदपत्रे जळून खाक झाली. रत्नागिरीसह अनेक शहरांमधील रस्ते जलमय झाले असून, येत्या आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १ जूनआधीच मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर अधिक होता. १ जून ते ११ जून या कालावधीत जिल्ह्यात २१२४.६० तर सरासरी २३६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीहून अधिक आहे. मंडणगड तालुक्यातील केळवद घाट रस्त्यावर १० जून रोजी दुपारी ३.२० वाजता झाड कोसळले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड रस्त्यावरून हटवत मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दापोली येथील मोरेश्वर दाबके यांच्या गोठ्याचे वादळी वाऱ्याने अंशत: २२ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील शिवरेवाडी येथील उदय दाते यांच्या घरावर वडाचे झाड कोसळून घराचे अंशत: नुकसान झाले. रविवारी या नुकसानाची आमदार उदय सामंत यांनी पाहणी केली. दाते यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे तातडीने करण्याची सूचना आमदारांनी यावेळी केली.