शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी पिकांना माकडांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

राजापूर : तालुक्यातील मळे शेती व आंबा, काजू बागेमध्ये माकडांच्या सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले ...

राजापूर : तालुक्यातील मळे शेती व आंबा, काजू बागेमध्ये माकडांच्या सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. या माकडांचा उपद्रव थांबविण्यासाठी शासकीय पातळीवरून उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सद्यस्थितीत अनेक गावांमधील शेतकऱ्यांची कुळीथ काढणी, झोडणी संपत आली आहे, तर काही गावात तर ती अंतिम टप्प्यावर आली आहे. यावर्षी पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे आंबा व काजू उत्पादन मुळातच कमी झाले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले शेतकरी माकडांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत.

भात कापणी पूर्ण झाल्यावर शेतमळे पूर्ण रिकामे होतात. मात्र ग्रामीण भागात शेतजमिनीला कुंपण करून मळ्यामध्ये अन्य हंगामी पिके घेतली जातात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदावलेली आर्थिक स्थिती व परिसीमा गाठलेली महागाई पाहता, शेतकरी कुळीथ व अन्य भाजीपाल्याचे पीक घेण्यासाठी सरसावले आहेत. या कालावधीत कुळीथ पिकासह, चवळी, कडवे, मूग, मटकी, वाल, मुळा, पावटा आदी पिकांचे उत्पादन घेतलेजाते. मात्र माकडांचा उपद्रव ही त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.