शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

हंगामी पिकांना माकडांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

राजापूर : तालुक्यातील मळे शेती व आंबा, काजू बागेमध्ये माकडांच्या सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले ...

राजापूर : तालुक्यातील मळे शेती व आंबा, काजू बागेमध्ये माकडांच्या सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. या माकडांचा उपद्रव थांबविण्यासाठी शासकीय पातळीवरून उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सद्यस्थितीत अनेक गावांमधील शेतकऱ्यांची कुळीथ काढणी, झोडणी संपत आली आहे, तर काही गावात तर ती अंतिम टप्प्यावर आली आहे. यावर्षी पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे आंबा व काजू उत्पादन मुळातच कमी झाले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले शेतकरी माकडांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत.

भात कापणी पूर्ण झाल्यावर शेतमळे पूर्ण रिकामे होतात. मात्र ग्रामीण भागात शेतजमिनीला कुंपण करून मळ्यामध्ये अन्य हंगामी पिके घेतली जातात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदावलेली आर्थिक स्थिती व परिसीमा गाठलेली महागाई पाहता, शेतकरी कुळीथ व अन्य भाजीपाल्याचे पीक घेण्यासाठी सरसावले आहेत. या कालावधीत कुळीथ पिकासह, चवळी, कडवे, मूग, मटकी, वाल, मुळा, पावटा आदी पिकांचे उत्पादन घेतलेजाते. मात्र माकडांचा उपद्रव ही त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.