शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

हंगामी पिकांना माकडांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

राजापूर : तालुक्यातील मळे शेती व आंबा, काजू बागेमध्ये माकडांच्या सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले ...

राजापूर : तालुक्यातील मळे शेती व आंबा, काजू बागेमध्ये माकडांच्या सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. या माकडांचा उपद्रव थांबविण्यासाठी शासकीय पातळीवरून उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सद्यस्थितीत अनेक गावांमधील शेतकऱ्यांची कुळीथ काढणी, झोडणी संपत आली आहे, तर काही गावात तर ती अंतिम टप्प्यावर आली आहे. यावर्षी पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे आंबा व काजू उत्पादन मुळातच कमी झाले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले शेतकरी माकडांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत.

भात कापणी पूर्ण झाल्यावर शेतमळे पूर्ण रिकामे होतात. मात्र ग्रामीण भागात शेतजमिनीला कुंपण करून मळ्यामध्ये अन्य हंगामी पिके घेतली जातात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदावलेली आर्थिक स्थिती व परिसीमा गाठलेली महागाई पाहता, शेतकरी कुळीथ व अन्य भाजीपाल्याचे पीक घेण्यासाठी सरसावले आहेत. या कालावधीत कुळीथ पिकासह, चवळी, कडवे, मूग, मटकी, वाल, मुळा, पावटा आदी पिकांचे उत्पादन घेतलेजाते. मात्र माकडांचा उपद्रव ही त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.