शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

आई, ऑनलाइन नको, शाळेतच जायचंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

रत्नागिरी : गेल्या मार्च महिन्यापासून म्हणजे जवळजवळ सव्वा वर्ष कोरोना संकटामुळे घरात अडकलेल्या बालकांना आता घरात बसून कंटाळा आला ...

रत्नागिरी : गेल्या मार्च महिन्यापासून म्हणजे जवळजवळ सव्वा वर्ष कोरोना संकटामुळे घरात अडकलेल्या बालकांना आता घरात बसून कंटाळा आला आहे. त्यांना खेळायलाही बाहेर जाता येत नाही. ज्यांचे आई-वडील नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसभर बाहेर असतात, अशांची मुले आता घरात राहून कंटाळली असून त्यांना आता आपल्या शाळेतील दोस्तांची आठवण प्रकर्षाने येऊ लागली आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने त्यांना नव्या दफ्तर आणि रेनकोट, छत्रीच्या खरेदीचेही वेध लागले आहेत.

गेल्या वर्षापासून शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. त्यातच नर्सरीपासून ते चौथी-पाचवी या लहान वर्गातील मुले वर्षभर घरातच अडकली आहेत. सध्या ऑनलाइन वर्ग घेण्यात येत असले तरी काहींना त्यात फारसा रस वाटत नाही. आपल्या दोस्त मंडळींना त्यांना आता भेटायचे आहे, त्यांच्यासोबत शाळेत खेळायचे आहे, दंगा करायचा आहे, दप्तरे, नवीन पुस्तके एकमेकांना दाखवायची आहेत.

आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पुस्तकांची खरेदी काहींची झाली असली तरीही काहींना दफ्तरे, रेनकोट छत्र्या नव्या हव्या आहेत आणि त्या खरेदी करायला स्वत:च आई-बाबांसोबत जायचे आहे. त्यामुळे खरेदीचाच लकडा सुरू आहे. शाळांपासून दूर राहिलेल्या या बालकांना आता शाळा सुरू होण्याचे वेध लागले असून आपण शाळेत मास्क आणि सॅनिटायझर घेऊन जाणार असल्याचेही ते सांगतात.

शाळेत मला अभ्यास करण्यासाठी तसेच माझ्या मित्रांना भेटण्यासाठी मला शाळेत जायचे आहे. मला नवीन दप्तरही आणायचे आहे. सध्या कोरोना आहे. त्यामुळे शाळेत जाताना मास्क आणि सॅनिटायझरची बाटली घेऊन जाणार.

- शर्विल मंगेश साळवी (४थी), गणेशनगर, रत्नागिरी

मला ऑनलाइन शाळाही आवडते. पण आता मला शाळेत जायचंय. मला बाबांनी पुस्तके आणून दिलीत. दप्तरही आहे. रेनकोटही हवाय, पण बाहेर कसे जाणार? कोरोना आहे ना. शाळेत जाताना मास्क लावून जाणार, सॅनिटायझरची छोटी बाटली घेऊन जाणार.

- अथर्व अतुल कांबळे (३री), कुवारबाव, रत्नागिरी

कोरोना फार बदमाश आहे. आता तो जाऊ दे. मला घरात फार कंटाळा येतो. आई-बाबा घरात नसतात, त्यामुळे माझ्यासोबत खेळायला कुणीच नाहीत. म्हणून मला आता शाळेत जायचंय. ऑनलाइन शाळा मला नाही आवडत.

- विदिशा महेंद्र गावडे (२री), रत्नागिरी

मला शाळेत जाऊन मैत्रिणींना भेटायचे आहे. त्यांच्यासोबत खेळायचे आहे. अभ्यासही करायचा आहे. गावात माझ्यासोबत खेळायला कुणीच नाही. त्यामुळे आता मला फार कंटाळा आला आहे. शाळेत कधी जाते, असे झाले आहे.

- मनवा ऋषिकेश जोशी (४थी), शिरगांव, शिवरेवाडी, ता. रत्नागिरी