शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

मोकाट जनावरे, हतबल प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील शहरे, महामार्ग येथील माेकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त कोण करणार? असा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील शहरे, महामार्ग येथील माेकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त कोण करणार? असा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. रस्त्याच्या मधोमध उभा असलेला मोकाट जनावरांचा कळप, त्यांच्याकडून होणारा दुकानदारांना त्रास तसेच वाहनांचे होणारे अपघात, असे अनेक प्रकार सतत सुरू असतात. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यापलीकडे काय करणार, असेच म्हणावे लागेल. लोकांचे जीव गेले तरी चालतील, पण मोकाट जनावरांचा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवणार, अशी शपथच घेतली आहे की काय, असे प्रशासनाच्या भूमिकेमुळे वाटू लागले आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार की नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जाणार?

मोकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने ठाेस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिक, दुकानदार त्रस्त, ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी, मध्येच जनावरांमध्ये टक्कर सुरू, वाहतुकीचा खोळंबा, ही बाब रत्नागिरीकरांसाठी नित्याचीच झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास कुणीही पुढे येत नाही. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविलीच तर ती दिखाव्यापुरतीची असते. त्यामुळे पुन्हा जनावरे मोकाट सुटलेली असतात. शहराच्या मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही मोकाट जनावर दिसले की काढता पाय घेतात.

शहरासह महामार्गावरही ठिकठिकाणी मोकाट जनावरांचे कळप दिसून येतात. काही ठिकाणी जनावरे चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन आंदोलन केल्यासारखे बसलेले असतात. वाहनचालकांनी कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाहीत. बसस्थानक परिसर व बाजारपेठेत अशा गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा सतत वावर असतो. या जनावरांना कोणी हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर चालून येण्याची भीतीही असते. मोकाट जनावंरामुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाज्या, फळे विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. विक्रेत्याचे थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी जनावर भाजी, फळांवर ताव मारतात. तसेच ऐन गर्दीच्या होणाऱ्या टकरींमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जीवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघातही घडत असतात. त्यामध्ये लोक जखमी होत असतात. हे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. जनावरांना कोंडवाड्यात टाकले तर मालकही न्यायला येत नाहीत. आलाच तर एखाद दुसरा मालक येतो. जनावरांच्या मालकांचाही शोध घेतला जात नाही.

शहर परिसरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराच्या अनेक भागांत रात्रीच्या वेळी भटके श्वान घोळका करून बसलेले असतात. रात्रीच्या वेळी कोणी जात असल्यास त्यांच्या अंगावर धावून जातात. यातून अपघात होणे, वाहनचालक पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात. श्वानदंशाने जखमी झालेल्यांचेही प्रमाण कमी नाही. रात्रीच्या वेळी कामावरून उशिरा येणाऱ्यांना भटक्या श्वानांचा कायमचा त्रास आहे. अनेकदा श्वानदंशामुळे बालके मृत्यूच्या घटनाही घडलेल्या आहेत. याला जबाबदार कोण, तर त्याचे उत्तर कोणाकडे आहे का? तर नाही. कारण यांचा बंदोबस्त करणाऱ्यांचेही नेहमीच कानावर हात असतात आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. त्यामुळे लोक तरी काय करणार, आपले रत्नागिरीकर केवळ बघ्याची भूमिका घेतात.