शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरे, हतबल प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील शहरे, महामार्ग येथील माेकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त कोण करणार? असा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील शहरे, महामार्ग येथील माेकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त कोण करणार? असा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. रस्त्याच्या मधोमध उभा असलेला मोकाट जनावरांचा कळप, त्यांच्याकडून होणारा दुकानदारांना त्रास तसेच वाहनांचे होणारे अपघात, असे अनेक प्रकार सतत सुरू असतात. तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याबद्दल खेद व्यक्त करण्यापलीकडे काय करणार, असेच म्हणावे लागेल. लोकांचे जीव गेले तरी चालतील, पण मोकाट जनावरांचा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवणार, अशी शपथच घेतली आहे की काय, असे प्रशासनाच्या भूमिकेमुळे वाटू लागले आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार की नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले जाणार?

मोकाट जनावरे, उनाड श्वान यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने ठाेस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिक, दुकानदार त्रस्त, ग्राहकांच्या पिशव्यांमध्ये तोंड घालणारी, मध्येच जनावरांमध्ये टक्कर सुरू, वाहतुकीचा खोळंबा, ही बाब रत्नागिरीकरांसाठी नित्याचीच झाली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या जनावरांमुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास कुणीही पुढे येत नाही. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविलीच तर ती दिखाव्यापुरतीची असते. त्यामुळे पुन्हा जनावरे मोकाट सुटलेली असतात. शहराच्या मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार सुरू आहे. जनावरांचा हैदोस एवढा वाढला आहे की, नागरिकही मोकाट जनावर दिसले की काढता पाय घेतात.

शहरासह महामार्गावरही ठिकठिकाणी मोकाट जनावरांचे कळप दिसून येतात. काही ठिकाणी जनावरे चक्क रस्त्याच्या मधोमध ठिय्या देऊन आंदोलन केल्यासारखे बसलेले असतात. वाहनचालकांनी कितीही हाकलले तरी उठायचे नाव घेत नाहीत. बसस्थानक परिसर व बाजारपेठेत अशा गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा सतत वावर असतो. या जनावरांना कोणी हाकलण्याचा प्रयत्न केला तर अंगावर चालून येण्याची भीतीही असते. मोकाट जनावंरामुळे विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर हातगाडीवर भाज्या, फळे विकणाऱ्यांना तर या जनावरांचा हमखास त्रास असतो. विक्रेत्याचे थोडे जरी लक्ष विचलित झाले तरी जनावर भाजी, फळांवर ताव मारतात. तसेच ऐन गर्दीच्या होणाऱ्या टकरींमुळे वाहनधारकांची त्रेधा उडते. जीवाच्या भीतीने वाहनधारक सैरावैरा पळतात. त्यातून अपघातही घडत असतात. त्यामध्ये लोक जखमी होत असतात. हे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. जनावरांना कोंडवाड्यात टाकले तर मालकही न्यायला येत नाहीत. आलाच तर एखाद दुसरा मालक येतो. जनावरांच्या मालकांचाही शोध घेतला जात नाही.

शहर परिसरामध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराच्या अनेक भागांत रात्रीच्या वेळी भटके श्वान घोळका करून बसलेले असतात. रात्रीच्या वेळी कोणी जात असल्यास त्यांच्या अंगावर धावून जातात. यातून अपघात होणे, वाहनचालक पडणे, वाहनांचे नुकसान होणे असे प्रकार घडतात. श्वानदंशाने जखमी झालेल्यांचेही प्रमाण कमी नाही. रात्रीच्या वेळी कामावरून उशिरा येणाऱ्यांना भटक्या श्वानांचा कायमचा त्रास आहे. अनेकदा श्वानदंशामुळे बालके मृत्यूच्या घटनाही घडलेल्या आहेत. याला जबाबदार कोण, तर त्याचे उत्तर कोणाकडे आहे का? तर नाही. कारण यांचा बंदोबस्त करणाऱ्यांचेही नेहमीच कानावर हात असतात आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. त्यामुळे लोक तरी काय करणार, आपले रत्नागिरीकर केवळ बघ्याची भूमिका घेतात.