शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र मोहरम शांततेत साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

रत्नागिरी : मुस्लिम हिजरी नववर्षाला मोहरमपासून प्रारंभ होत असल्याने हिजरी १४४३ मोहरमला दि. ९ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. ...

रत्नागिरी : मुस्लिम हिजरी नववर्षाला मोहरमपासून प्रारंभ होत असल्याने हिजरी १४४३ मोहरमला दि. ९ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून दररोज रात्री इमामे हसन, हुसेन, कासम यांच्या बलिदानाच्या आख्यायिकेचे वाचन मुस्लिम मोहल्ल्यात सुरू होते. आख्यायिकेची समाप्ती गुरुवार दि. १९ रोजी रात्री झाली. शुक्रवार दि. २० रोजी सर्वत्र ‘यौमे-आशुरा’ पाळण्यात आला.

मोहरमपासून इस्लाम नववर्षास प्रारंभ होत असल्याने मोहरम महिन्याच्या चंद्रदर्शनापासून दररोज रात्री मुस्लिम मोहल्ल्यातून इमामे हसन, हुसेन, कासम यांच्या बलिदानाच्या आख्यायिकेचे (मजलीस) वाचन केले जाते. इमामे हसन, हुसेन, कासम यांचे प्रतीकात्मक पंजे सातव्या रात्री अर्थात सोमवारी (दि. १६) ठिकठिकाणी बसविण्यात आले होते. दहावी रात्र गुरुवारी असल्याने त्यादिवशी आख्यायिका वाचन समाप्ती करण्यात आली. दहाव्या दिवशी अर्थात शुक्रवारी यौमे आशुरा पाळण्यात आला. मुस्लिम बांधवांनी यौमे आशुरानिमित्त सलग दोन दिवस रोजे ठेवले होते. काही गावांतून कुराणपठण करण्यात आले.

गतवर्षीपासून कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार, आख्यायिकावाचनही प्रमुख एकाच व्यक्तीच्या माध्यमातून करण्यात आले. ताबूत मिरवणुकांना बंदी असल्याने मुस्लिम भाविकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करीत ताबूत व पंजे विसर्जन शांततेत व मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत केले.